शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

खरीप हंगामाच्या कामाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:14 AM

लातूर : खरीप हंगाम सुरू झाला असून, शेतकऱ्यांच्या वतीने मशागतीची कामे केली जात आहेत. तसेच बियाणे, खतांचे नियोजन करण्यात ...

लातूर : खरीप हंगाम सुरू झाला असून, शेतकऱ्यांच्या वतीने मशागतीची कामे केली जात आहेत. तसेच बियाणे, खतांचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात ५ लाख ९३ हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा अपेक्षित असून, सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना पेरणीविषयी मार्गदर्शन केले जात आहे. बियाणांची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरवाढीने सामान्यांचे नियोजन कोलमडले

रेणापूर : पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे नियोजन कोलमडले आहे. पेट्रोल १०३ रुपये, तर डिझेल ९० रुपयांच्या पुढे सरकले आहे. दरम्यान, डिझेलच्या दरवाढीमुळे शेतीच्या मशागतीच्या दरातही वाढ झाली आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्वांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यातच महागाईने सर्वसामान्यांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. शासनाने तत्काळ दरवाढ कमी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

बँकांनी कर्जपुरवठा करण्याची मागणी

तांदुळजा : खरीप हंगामामध्ये शेती मशागतीसह बियाणे, खते आदी खरेदीसाठी पैशांची गरज असते. कोरोनामुळे शेतमालाला बाजारपेठ न मिळाल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा बहुतांश शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे जे शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत त्यांना तरी बँकांनी तत्काळ कर्जपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा

लातूर : जिल्ह्यातील १११ गावांत पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या वतीने अधिग्रहणासाठी पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. काही प्रस्तावांना उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने मंजुरीही देण्यात आली आहे. सध्या २२ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, अधिग्रहणाच्या उर्वरित प्रस्तावांना तत्काळ मंजुरी देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

एसटी मालवाहतूक उपक्रमाला प्रतिसाद

अहमदपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आर्थिक उत्पन्नवाढीसाठी मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाला जिल्ह्यातील व्यापारी, शेतकऱ्यांच्या वतीने चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक शेतकरी आपला शेतीमाल एसटीच्या मालवाहतूक ट्रकद्वारे विक्रीसाठी नेत आहेत. दरम्यान, गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत मालवाहतुकीच्या माध्यमातून लातूर विभागाला पावणेदोन काेटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले असल्याचे सांगण्यात आले.

वाहनधारक हैराण

लातूर : शहरातील एमआयडीसी भागातून कळंब रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसामुळे त्यात पाणी साचत असल्याने वाहनधारकांना अंदाज येत नाही.

विजेचा लपंडाव

चाकूर : तालुक्यातील डोंग्रज येथे विजेची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महावितरणच्या दुर्लक्षामुळे वीजपुरवठा सुरळीत होत नाही. परिणामी नागरिकांची अडचण होत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

खरिपाची तयारी

जळकोट : खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करीत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे अर्थचक्र कोलमडल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजीपाल्यास मागणी

निलंगा : शहरातील बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी होत असून, त्या तुलनेत मागणी अधिक आहे. त्यामुळे दरात किंचित वाढ झाली आहे. सोमवारपासून बाजारपेठ खुली होत आहे.