शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

लातूरमधील जलस्रोतांमध्ये मुबलक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 17:29 IST

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने रिचार्ज शाफ्टची संकल्पना राबविण्यात आली असून, जिल्ह्यात  ५५ गावांत ४३७ रिचार्ज शाफ्टमुळे  जलपुनर्भरणाचा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे.

संदीप शिंदे

लातूर : जिल्ह्याचा भूभाग बेसॉल्ट नावाच्या कठीण अग्निजन्य पाषाणाने व्यापलेला असून खडक, सच्छिद्र, विघटित, भेगायुक्त  या प्रकारात  सापडतो. त्यात पाणी साठविण्याची क्षमता फार कमी प्रमाणात असते. त्यामुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने रिचार्ज  शाफ्टची संकल्पना राबविण्यात आली असून, जिल्ह्यात ५५ गावांत ४३७ रिचार्ज शाफ्टमुळे जलपुनर्भरणाचा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे.

जिल्ह्यात ५५ गावांत ४३७ रिचार्ज शॉफ्ट उभारण्यात आले असून, लातूर तालुक्यातील ६ गावांत ४८, औसा तालुक्यातील ५ गावांत ४०, निलंगा तालुक्यातील ६ गावांत ४८, रेणापूर तालुक्यातील ७ गावांत ५६, अहमदपूर तालुक्यातील ५ गावांत ४०, उदगीर तालुक्यातील ७ गावांत ५६, देवणी तालुक्यातील ६ गावांत ४८, जळकोट तालुक्यातील ५ गावांत ३७, चाकूर तालुक्यातील ५ गावांत ४० तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील  तालुक्यातील ३ गावांत २४ शाफ्ट उभारण्यात आले आहेत.

रिचार्ज शाफ्ट ही उपाययोजना अत्यंत कमी खर्चाची असून, परिणामकारक आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी, यासाठी जलस्त्रोतांना पाणी उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यातील दहाही तालुक्यांत ही संकल्पना राबविण्यात  आली असून, २०१६-१७ मध्ये ७७ गावांत ३२७, २०१७-१८ मध्ये ६७ गावांत २७१ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

अनेक गावांत उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवते. जलस्त्रोत कोरडे पडतात. त्यामुळे पावसाळ्यातील पाण्याचे संवर्धन व्हावे, यासाठी रिचार्ज  शाफ्टची उभारणी केली जाते. परिणामी, रिचार्ज शाफ्टजवळील अनेक जलस्त्रोतांच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झाली असल्याचे जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भू-वैज्ञानिक डॉ. भालचंद्र संगनवार यांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाwater shortageपाणीकपात