शहरं
Join us  
Trending Stories
1
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
2
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
3
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
4
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
5
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
6
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
7
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
8
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
9
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
10
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
11
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
12
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
13
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
14
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
15
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
16
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
17
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
18
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
19
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
20
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

पावसापेक्षाही बेभरवशाची पीक विमा कंपनी; उत्पन्नात ६० टक्क्यांवर घट, पण अग्रीमची आशा धूसर!

By हरी मोकाशे | Updated: September 29, 2023 12:35 IST

शेतकरी चिंताग्रस्त, सोयाबीन उत्पन्नात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट

लातूर : ऑगस्टमध्ये पावसाने महिनाभर ताण दिल्याने जिल्ह्यातील सोयाबीनच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणाच्या अहवालावरून निष्पन्न झाले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरात २५ टक्के अग्रीम देण्याच्या सूचना पीक विमा कंपनीस केल्या. तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी झाला तरी अद्याप पीक विमा कंपनीकडून प्रशासनास कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने अग्रीम मिळण्याची आशा धुसर झाली आहे.

यंदा जिल्ह्यात विलंबाने पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्याही लांबल्या. जिल्ह्यात खरिपाचा ९८ टक्के पेरा झाला. त्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला. तो ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर आहे. तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी अशा अन्य पिकांचा पेरा ८८ हजार ७४६ हेक्टरवर झाला. दरम्यान, जेमतेम पाऊस झाल्याने पिके चांगली उगवली; मात्र जुलैच्या अखेरपासून ऑगस्ट अखेरपर्यंत पावसाने ताण दिला. त्यामुळे सोयाबीनचे नुकसान होत असल्याने हंगाम मध्य परिस्थिती सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ६० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादनात घट झाल्याचे स्पष्ट झाले.

पीक विमा कंपनीचा प्रतिसाद मिळेनाजिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळातील सोयाबीन पीक विमाधारकांना महिनाभरात २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याचे १ सप्टेंबर रोजी आदेश दिले. २६ दिवस उलटले तरी अद्याप पीक विमा कंपनीकडून कुठलीही हालचाल सुरू नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने शासनामार्फत पाठविलेला प्रस्ताव पीक विमा कंपनीने अद्याप मान्य अथवा अमान्य केल्याचे स्पष्ट केले नाही. एकूणच कुठलाही प्रतिसाद देत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे अग्रीम मिळेल का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

पावसापेक्षाही बेभरवशाची पीक विमा कंपनीयंदा पावसाने मोठा ताण दिल्याने खरिपातील सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. सध्या सण, उत्सव सुरू आहेत. त्यामुळे संभाव्य नुकसानीपोटीची २५ टक्के अग्रीम मिळेल, अशी आशा होती. त्यासाठी वारंवार बँकेकडे चौकशी केली; मात्र खात्यावर छदामही जमा झाला नाही. त्यामुळे आगामी सण कसे साजरे करावेत आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, अशी भ्रांत पडली आहे. पावसापेक्षाही पीक विमा कंपनी बेभरवशाची झाली आहे.- गुणवंतराव माने, शेतकरी.

पीक विमा कंपनीशी पत्रव्यवहारजिल्ह्यातील साठही महसूल मंडळातील सोयाबीनच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २५ टक्के अग्रीम शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना पीक विमा कंपनीस दिल्या आहेत. ही अग्रीम लवकर देण्यात यावी, म्हणून आम्ही कालच पीक विमा कंपनीशी पत्रव्यवहार केला आहे. नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- शिवसांब लाडके, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

पीक विम्यासाठी ८ लाख अर्जतालुका - एकूण अर्जअहमदपूर - १,१४,९९०औसा - १,२५,९००चाकूर - ७६,०८५देवणी - ४८,२७६जळकोट - ५७,४६०लातूर - ७२,७२९निलंगा - १,४६,२६९रेणापूर - ५२,०७५शिरुर अनं. - ३६,१५१उदगीर - १,००,५७०एकूण - ८,३०,५०५

टॅग्स :FarmerशेतकरीlaturलातूरRainपाऊस