शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पावसापेक्षाही बेभरवशाची पीक विमा कंपनी; उत्पन्नात ६० टक्क्यांवर घट, पण अग्रीमची आशा धूसर!

By हरी मोकाशे | Updated: September 29, 2023 12:35 IST

शेतकरी चिंताग्रस्त, सोयाबीन उत्पन्नात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट

लातूर : ऑगस्टमध्ये पावसाने महिनाभर ताण दिल्याने जिल्ह्यातील सोयाबीनच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणाच्या अहवालावरून निष्पन्न झाले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरात २५ टक्के अग्रीम देण्याच्या सूचना पीक विमा कंपनीस केल्या. तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी झाला तरी अद्याप पीक विमा कंपनीकडून प्रशासनास कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने अग्रीम मिळण्याची आशा धुसर झाली आहे.

यंदा जिल्ह्यात विलंबाने पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्याही लांबल्या. जिल्ह्यात खरिपाचा ९८ टक्के पेरा झाला. त्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला. तो ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर आहे. तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी अशा अन्य पिकांचा पेरा ८८ हजार ७४६ हेक्टरवर झाला. दरम्यान, जेमतेम पाऊस झाल्याने पिके चांगली उगवली; मात्र जुलैच्या अखेरपासून ऑगस्ट अखेरपर्यंत पावसाने ताण दिला. त्यामुळे सोयाबीनचे नुकसान होत असल्याने हंगाम मध्य परिस्थिती सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ६० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादनात घट झाल्याचे स्पष्ट झाले.

पीक विमा कंपनीचा प्रतिसाद मिळेनाजिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळातील सोयाबीन पीक विमाधारकांना महिनाभरात २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याचे १ सप्टेंबर रोजी आदेश दिले. २६ दिवस उलटले तरी अद्याप पीक विमा कंपनीकडून कुठलीही हालचाल सुरू नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने शासनामार्फत पाठविलेला प्रस्ताव पीक विमा कंपनीने अद्याप मान्य अथवा अमान्य केल्याचे स्पष्ट केले नाही. एकूणच कुठलाही प्रतिसाद देत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे अग्रीम मिळेल का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

पावसापेक्षाही बेभरवशाची पीक विमा कंपनीयंदा पावसाने मोठा ताण दिल्याने खरिपातील सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. सध्या सण, उत्सव सुरू आहेत. त्यामुळे संभाव्य नुकसानीपोटीची २५ टक्के अग्रीम मिळेल, अशी आशा होती. त्यासाठी वारंवार बँकेकडे चौकशी केली; मात्र खात्यावर छदामही जमा झाला नाही. त्यामुळे आगामी सण कसे साजरे करावेत आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, अशी भ्रांत पडली आहे. पावसापेक्षाही पीक विमा कंपनी बेभरवशाची झाली आहे.- गुणवंतराव माने, शेतकरी.

पीक विमा कंपनीशी पत्रव्यवहारजिल्ह्यातील साठही महसूल मंडळातील सोयाबीनच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २५ टक्के अग्रीम शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना पीक विमा कंपनीस दिल्या आहेत. ही अग्रीम लवकर देण्यात यावी, म्हणून आम्ही कालच पीक विमा कंपनीशी पत्रव्यवहार केला आहे. नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- शिवसांब लाडके, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

पीक विम्यासाठी ८ लाख अर्जतालुका - एकूण अर्जअहमदपूर - १,१४,९९०औसा - १,२५,९००चाकूर - ७६,०८५देवणी - ४८,२७६जळकोट - ५७,४६०लातूर - ७२,७२९निलंगा - १,४६,२६९रेणापूर - ५२,०७५शिरुर अनं. - ३६,१५१उदगीर - १,००,५७०एकूण - ८,३०,५०५

टॅग्स :FarmerशेतकरीlaturलातूरRainपाऊस