शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
2
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
3
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
4
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
5
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
6
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
7
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
8
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
9
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
10
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
11
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
12
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
13
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
14
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
15
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
16
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
17
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
18
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
19
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
20
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान

Killari Earthquake : २५ वर्षांत बसले भूकंपाचे ९९ धक्के, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतही घडली होती घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 4:19 AM

Killari Earthquake : २००७ मध्ये सर्वाधिक १७ वेळा भूकंप 

राजकुमार जोंधळे

लातूर : १९९३ च्या भूकंपानंतर मराठवाड्यात भूकंप कसा असतो, याची माहिती सर्वश्रुत झाली. २५ वर्षांत मराठवाड्यात भूकंपाचे ९९ धक्के बसले. त्यात सर्वाधिक २००७ मध्ये १७ वेळा भूकंप झाल्याची नोंद लातूरच्या भूकंप मापक केंद्रात झाली.

जमिनीतून आवाज आणि भूभागाला बसणारे धक्के म्हणजे भूकंप, हे किल्लारी परिसराला माहीत होते. परंतु, ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या प्रलयंकारी भूकंपाने मांडलेला विध्वंस ज्यांनी पाहिला, त्यांना नेमके काय घडले हेच कळत नव्हते. जमीन हादरली. क्षणार्धात घरे कोसळली. आकाशात मातीच्या धुळीचे लोट पसरले. त्यानंतरही भूकंपाची मालिका कैक वर्षे सुरू राहिली. त्यामुळे लातूरमध्ये शासकीय भूकंप वेधशाळा उभी राहिली. गेल्या २५ वर्षांत या वेधशाळेत ५०० किलोमीटर परिघातील ९९ धक्क्यांची नोंद झाली आहे. यामध्ये लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याला सर्वाधिक ४८ धक्के बसले. १९९९ मध्ये ११ धक्के, २००० मध्ये ५ धक्के, २००३ मध्ये ५ धक्के, २००४ मध्ये ७ धक्के, २००५ मध्ये १० धक्के, २००६ मध्ये ५ धक्के, २००८ मध्ये २ धक्के, २००९ मध्ये ७ धक्के, २०१० ते ११ मध्ये १२ धक्के, २०१२ ते १८ या कालावधीत १५ धक्क्यांची नोंद आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यापाठोपाठ मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली जिल्ह्यांनाही अलिकडे भूकंपाचे धक्के जाणवले. केवळ किल्लारी परिसरातील भूकंपाची चर्चा कानी असलेल्या नांदेड-हिंगोली जिल्ह्यालाही भूकंपाचे धक्के बसले. २००७ मध्ये नांदेड शहर आणि जिल्ह्यात १० धक्के बसले. २०१६ आणि २०१७ मध्ये हिंगोली जिल्ह्यात २ धक्के जाणवले. ३० सप्टेंबर १९९३ ते १३ सप्टेंबर २०१८ या २५ वर्षांच्या कालावधीत २००७ मध्ये सर्वाधिक १७ धक्के लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील किल्लारी-लोहारा-उमगरा परिसराला बसले. तर १९९९ साली ११ धक्के जाणवले. त्याशिवाय २००१ मध्ये केवळ १ धक्क्याची नोंद आहे. तर २००२ मध्ये २ धक्क्यांची नोंद आहे.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपlaturलातूर