शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

जिल्ह्यात हजार मुलांमागे ९४५ मुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:19 IST

२०१४ मध्ये हजार मुलांमागे ९२३ मुली होत्या. २०१५ मध्ये ९२९, २०१६ मध्ये ९४९, २०१७ मध्ये ९६३, २०१८ मध्ये ९३६, ...

२०१४ मध्ये हजार मुलांमागे ९२३ मुली होत्या. २०१५ मध्ये ९२९, २०१६ मध्ये ९४९, २०१७ मध्ये ९६३, २०१८ मध्ये ९३६, २०१९ मध्ये ९३८ प्रमाण राहिले आहे. तर आता २०२० मध्ये हजार मुलांमागे ९४५ मुलींचे प्रमाण आहे. मुली जन्माचा दर वाढविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. गावनिहाय गरोदर मातांची नोंदणी केली जात असून, प्रसुतीपर्यंत देखरेख केली जाते. बाळाच्या जन्मानंतरही पुढील एक वर्ष सकस आहार आणि उपचाराची काळजी घेतली जात असल्याने बाल मृत्यूचे प्रमाण तर कमी झालेच आहे. शिवाय, मुलींच्या जन्मदरातही वाढ झाली आहे. २०१४ पूर्वी हजार मुलांमागे ८०० ते ९०० पर्यंत मुलींचे प्रमाण होते. परंतु, आता त्यात चांगली वाढ झाली असून, मुला-मुलींचा जन्मदर समतोल करण्याकडे आरोग्य विभाग विशेष काळजी घेत आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर २०२० पर्यंत लातूर जिल्ह्यात १२ हजार २८६ बाळांना मातांनी जन्म दिला. यात ६ हजार ४३४ मुले तर ५ हजार ८५२ मुलींचा समावेश आहे. या आठ महिन्यामध्ये जन्मलेल्या मुला-मुलींचे प्रमाण तालुकानिहाय असे आहे.

अहमदपूर हजार मुलांमागे ९६०, औसा ७८१, चाकूर ९३७, देवणी ६८७, जळकोट ८१६, लातूर ९२८, निलंगा ८३४, रेणापूर १०८९, शिरूर अनंतपाळ ९२५, उदगीर ९०४ तर जिल्ह्यात सरासरी ९०९ चे प्रमाण आहे. सदरचे प्रमाण एप्रिल ते नोव्हेंबर २०२० पर्यंतचे आहे. २०१९-२० मध्ये एक हजार मुलांमागे ९४५ मुलींचे प्रमाण असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. गंगाधर परगे, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.एल.एस. देशमुख यांनी सांगितले.

वर्षभर मोफत लसीकरण

मातृ सुरक्षा, सुरक्षित बाळंतपण, प्रधानमंत्री जननी सुरक्षा योजना आदी वेगवेगळ्या योजना आरोग्य विभागाच्या वतीने बाळ व बाळंतिणीच्या आरोग्याच्या अनुषंगाने राबविल्या जातात. या योजनेअंतर्गत एक वर्षापर्यंत बाळाला मोफत लसीकरण व उपचार केले जातात.

महिलांसाठी आरोग्यसेवा

गरोदर मातांच्या आरोग्याबाबतही काळजी घेतली जाते. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत बाळंतपण झाल्यास ७०० रुपये मातांना दिले जातात. तर अन्य योजनेमध्ये ५ हजाराची तरतूद आहे. सकस आहार आणि उपचारासाठी विशेष काळजी काळजी घेतली जाते.

मुला-मुलींचे जन्मदराचे प्रमाण जिल्ह्यात चांगले आहे. गावस्तरावर आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यामार्फत गरोदर मातांची नोंदणी करून सकस आहार आणि उपचाराबाबत लक्ष दिले जाते. प्रसुतीपर्यंत आणि त्यानंतरही खबरदारी घेतली जाते.

- डाॅ. गंगाधर परगे,

जिल्हा आरोग्याधिकारी,