शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात हजार मुलांमागे ९४५ मुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:19 IST

२०१४ मध्ये हजार मुलांमागे ९२३ मुली होत्या. २०१५ मध्ये ९२९, २०१६ मध्ये ९४९, २०१७ मध्ये ९६३, २०१८ मध्ये ९३६, ...

२०१४ मध्ये हजार मुलांमागे ९२३ मुली होत्या. २०१५ मध्ये ९२९, २०१६ मध्ये ९४९, २०१७ मध्ये ९६३, २०१८ मध्ये ९३६, २०१९ मध्ये ९३८ प्रमाण राहिले आहे. तर आता २०२० मध्ये हजार मुलांमागे ९४५ मुलींचे प्रमाण आहे. मुली जन्माचा दर वाढविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. गावनिहाय गरोदर मातांची नोंदणी केली जात असून, प्रसुतीपर्यंत देखरेख केली जाते. बाळाच्या जन्मानंतरही पुढील एक वर्ष सकस आहार आणि उपचाराची काळजी घेतली जात असल्याने बाल मृत्यूचे प्रमाण तर कमी झालेच आहे. शिवाय, मुलींच्या जन्मदरातही वाढ झाली आहे. २०१४ पूर्वी हजार मुलांमागे ८०० ते ९०० पर्यंत मुलींचे प्रमाण होते. परंतु, आता त्यात चांगली वाढ झाली असून, मुला-मुलींचा जन्मदर समतोल करण्याकडे आरोग्य विभाग विशेष काळजी घेत आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर २०२० पर्यंत लातूर जिल्ह्यात १२ हजार २८६ बाळांना मातांनी जन्म दिला. यात ६ हजार ४३४ मुले तर ५ हजार ८५२ मुलींचा समावेश आहे. या आठ महिन्यामध्ये जन्मलेल्या मुला-मुलींचे प्रमाण तालुकानिहाय असे आहे.

अहमदपूर हजार मुलांमागे ९६०, औसा ७८१, चाकूर ९३७, देवणी ६८७, जळकोट ८१६, लातूर ९२८, निलंगा ८३४, रेणापूर १०८९, शिरूर अनंतपाळ ९२५, उदगीर ९०४ तर जिल्ह्यात सरासरी ९०९ चे प्रमाण आहे. सदरचे प्रमाण एप्रिल ते नोव्हेंबर २०२० पर्यंतचे आहे. २०१९-२० मध्ये एक हजार मुलांमागे ९४५ मुलींचे प्रमाण असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. गंगाधर परगे, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.एल.एस. देशमुख यांनी सांगितले.

वर्षभर मोफत लसीकरण

मातृ सुरक्षा, सुरक्षित बाळंतपण, प्रधानमंत्री जननी सुरक्षा योजना आदी वेगवेगळ्या योजना आरोग्य विभागाच्या वतीने बाळ व बाळंतिणीच्या आरोग्याच्या अनुषंगाने राबविल्या जातात. या योजनेअंतर्गत एक वर्षापर्यंत बाळाला मोफत लसीकरण व उपचार केले जातात.

महिलांसाठी आरोग्यसेवा

गरोदर मातांच्या आरोग्याबाबतही काळजी घेतली जाते. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत बाळंतपण झाल्यास ७०० रुपये मातांना दिले जातात. तर अन्य योजनेमध्ये ५ हजाराची तरतूद आहे. सकस आहार आणि उपचारासाठी विशेष काळजी काळजी घेतली जाते.

मुला-मुलींचे जन्मदराचे प्रमाण जिल्ह्यात चांगले आहे. गावस्तरावर आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यामार्फत गरोदर मातांची नोंदणी करून सकस आहार आणि उपचाराबाबत लक्ष दिले जाते. प्रसुतीपर्यंत आणि त्यानंतरही खबरदारी घेतली जाते.

- डाॅ. गंगाधर परगे,

जिल्हा आरोग्याधिकारी,