शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जिल्ह्यात हजार मुलांमागे ९४५ मुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:19 IST

२०१४ मध्ये हजार मुलांमागे ९२३ मुली होत्या. २०१५ मध्ये ९२९, २०१६ मध्ये ९४९, २०१७ मध्ये ९६३, २०१८ मध्ये ९३६, ...

२०१४ मध्ये हजार मुलांमागे ९२३ मुली होत्या. २०१५ मध्ये ९२९, २०१६ मध्ये ९४९, २०१७ मध्ये ९६३, २०१८ मध्ये ९३६, २०१९ मध्ये ९३८ प्रमाण राहिले आहे. तर आता २०२० मध्ये हजार मुलांमागे ९४५ मुलींचे प्रमाण आहे. मुली जन्माचा दर वाढविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. गावनिहाय गरोदर मातांची नोंदणी केली जात असून, प्रसुतीपर्यंत देखरेख केली जाते. बाळाच्या जन्मानंतरही पुढील एक वर्ष सकस आहार आणि उपचाराची काळजी घेतली जात असल्याने बाल मृत्यूचे प्रमाण तर कमी झालेच आहे. शिवाय, मुलींच्या जन्मदरातही वाढ झाली आहे. २०१४ पूर्वी हजार मुलांमागे ८०० ते ९०० पर्यंत मुलींचे प्रमाण होते. परंतु, आता त्यात चांगली वाढ झाली असून, मुला-मुलींचा जन्मदर समतोल करण्याकडे आरोग्य विभाग विशेष काळजी घेत आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर २०२० पर्यंत लातूर जिल्ह्यात १२ हजार २८६ बाळांना मातांनी जन्म दिला. यात ६ हजार ४३४ मुले तर ५ हजार ८५२ मुलींचा समावेश आहे. या आठ महिन्यामध्ये जन्मलेल्या मुला-मुलींचे प्रमाण तालुकानिहाय असे आहे.

अहमदपूर हजार मुलांमागे ९६०, औसा ७८१, चाकूर ९३७, देवणी ६८७, जळकोट ८१६, लातूर ९२८, निलंगा ८३४, रेणापूर १०८९, शिरूर अनंतपाळ ९२५, उदगीर ९०४ तर जिल्ह्यात सरासरी ९०९ चे प्रमाण आहे. सदरचे प्रमाण एप्रिल ते नोव्हेंबर २०२० पर्यंतचे आहे. २०१९-२० मध्ये एक हजार मुलांमागे ९४५ मुलींचे प्रमाण असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. गंगाधर परगे, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.एल.एस. देशमुख यांनी सांगितले.

वर्षभर मोफत लसीकरण

मातृ सुरक्षा, सुरक्षित बाळंतपण, प्रधानमंत्री जननी सुरक्षा योजना आदी वेगवेगळ्या योजना आरोग्य विभागाच्या वतीने बाळ व बाळंतिणीच्या आरोग्याच्या अनुषंगाने राबविल्या जातात. या योजनेअंतर्गत एक वर्षापर्यंत बाळाला मोफत लसीकरण व उपचार केले जातात.

महिलांसाठी आरोग्यसेवा

गरोदर मातांच्या आरोग्याबाबतही काळजी घेतली जाते. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत बाळंतपण झाल्यास ७०० रुपये मातांना दिले जातात. तर अन्य योजनेमध्ये ५ हजाराची तरतूद आहे. सकस आहार आणि उपचारासाठी विशेष काळजी काळजी घेतली जाते.

मुला-मुलींचे जन्मदराचे प्रमाण जिल्ह्यात चांगले आहे. गावस्तरावर आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यामार्फत गरोदर मातांची नोंदणी करून सकस आहार आणि उपचाराबाबत लक्ष दिले जाते. प्रसुतीपर्यंत आणि त्यानंतरही खबरदारी घेतली जाते.

- डाॅ. गंगाधर परगे,

जिल्हा आरोग्याधिकारी,