शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

हरभरा विक्रीसाठी नोंदणी केलेले ६ हजार शेतकरी झाले भूर्रर!

By हरी मोकाशे | Updated: May 12, 2023 18:10 IST

हमीभाव केंद्र : जिल्ह्यात २ लाख ६२ हजार क्विंटलची खरेदी

लातूर : शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळावा म्हणून नाफेडच्या वतीने जिल्ह्यात १६ हमीभाव खरेदी सुरू आहेत. दरम्यान, हरभरा विक्रीसाठी २४ हजार ५०७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १८ हजार १९७ शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी झाली असून ६ हजार १३० शेतकऱ्यांची खरेदी शिल्लक आहे. या शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्री करावा म्हणून नाफेडच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने खरिपातील नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले. अति पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प भरले. त्यामुळे जिल्ह्यात रबीच्या क्षेत्रात वाढ होऊन जवळपास १ लाख ६५ हजार हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला होता.

हरभऱ्याची काढणी सुरू होऊन बाजारात आवक सुरू होताच दर घसरले. हमीभावापेक्षा कमी दर मिळू लागला. त्यामुळे जिल्ह्यातील २४ हजार ५०७ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नाफेडकडे नोंदणी केली.

९५ कोटी ९४ लाखांच्या हरभऱ्याची खरेदी...

हरभरा विक्रीसाठी नोंदणी केलेल्या २४ हजार ५०८ शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत १६ खरेदी केंद्रावर १८ हजार १९७ शेतकऱ्यांच्या २ लाख ६२ हजार ४६ क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे. त्याची रक्कम ९५ कोटी ९४ लाख ४० हजार ३४४ रुपये आहे. आतापर्यंत ८९ कोटी ३६ लाख ४९ हजार १२३ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.

सोमवारपर्यंत ६ कोटी होणार खात्यावर...जिल्ह्यात २ लाख ६२ हजार ४६ क्विंटल हरभरा खरेदी झाली. त्यापैकी ८९ कोटी ३६ ४९ हजार १२४ रुपये हरभरा विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. दरम्यान, उर्वरित शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ६ कोटी ५ लाख ७१ हजार २२० रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सोमवारपर्यंत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील.

जिल्ह्यात साडेनऊ लाख क्विंटल खरेदी...

नाफेडसह महाफार्मर प्रोड्युसर कंपनी, महाकिसान आणि अन्य एक संस्था अशा चार ठिकाणी एकूण १० लाख क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत एकूण ९ लाख ४० हजार ७७८ क्विंटल खरेदी झाली आहे. ११ जूनपर्यंत हरभरा विक्रीसाठी मुदत आहे.बाजारपेठेत ६०० रुपयांनी दर कमी...केंद्र शासनाने हरभऱ्यास ५ हजार ३३५ रुपये प्रति क्विंटल असा दर जाहीर केला आहे. बुधवारी बाजार समितीत ६ हजार १११ क्विंटल आवक होऊन सर्वसाधारण भाव ४ हजार ७२५ रुपये असा मिळाला. क्विंटलमागे शेतकऱ्यांना जवळपास ६१० रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.

शेतकऱ्यांकडे पाठपुरावा...

नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांनी केंद्रावर हरभरा विक्री करावी म्हणून सूचना करून पाठपुरावा केला जात आहे. अद्यापही ६ हजार ३१० शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी शिल्लक आहे.- विलास सोमारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.

टॅग्स :Farmerशेतकरी