शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जिल्ह्यात पहिलीच्या वर्गातील ४६ हजारांवर बालके गेली पुढच्या वर्गात; सवंगड्यांचा सहवास दुरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : इयत्ता पहिलीच्या वर्गात पडलेले पाऊल म्हणजे शालेय जीवनाची सुरुवात होय. याच वर्गात बोबड्या बोलात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : इयत्ता पहिलीच्या वर्गात पडलेले पाऊल म्हणजे शालेय जीवनाची सुरुवात होय. याच वर्गात बोबड्या बोलात ‘बाराखडी’ आणि सवंगड्यांसोबत बालगीतांचा सूर आवळला जातो. सरत्या शैक्षणिक वर्षात कोरोनाने शाळेत प्रवेशित झालेल्या पहिलीच्या चिमुरड्यांसाठी शाळेची घंटा वाजलीच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ४६ हजार ७७८ मुले दुसऱ्या वर्गात गेली आहेत.

वाचन-लेखन या क्षमता मिळविण्यासाठी नव्हे, तर जीवनातील प्रत्येक कसोटीवर आपला ठसा उमटविण्यासाठी गरजेचे असलेले ज्ञानार्जन शिक्षणाच्या माध्यमातून मिळते. जिल्ह्यात पहिलीच्या वर्गात ४६ हजार ७७८, दुसरी ४६ हजार ७३३, तिसरी ५६ हजार ६३१, चौथी ४७ हजार ६९९, पाचवी ४९ हजार २१५, सहावी ४८ हजार ४८८, सातवी ४९ हजार ४६७ तर आठवीच्या वर्गात ४९ हजार २९३ विद्यार्थी संख्या आहे. पहिली ते आठवी आणि नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. दरम्यान, पहिलीच्या वर्गातील मुलांचे प्रवेश झाले आणि त्यानंतर कोरोनाचे सावट पसरले. त्यामुळे पालकांत भीतीचे वातावरण आजही आहे.

पहिलीच्या वर्गातील मुलांनी तर ना शाळेच्या भिंती पाहिल्या, ना शिक्षकांचा चेहरा. लहान बालके श्रवण व अनुकरण यातून लहानपणापासून शिकत असतात. शालेय जीवनाचा पाया भक्कम करण्यासाठी पहिली ते चौथी वर्गात विद्यार्थ्यांचा पूर्णपणे अभ्यास करून घेतला जातो. मात्र कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. विविध शाळांच्या वतीने ऑनलाईन अभ्यासक्रम राबविला जात आहे. विद्यार्थीही त्याला उपस्थित राहत आहेत. मात्र प्रत्यक्ष शाळेतील सवंगड्यांसोबतचा अध्ययन करण्याची संधी यावर्षी तरी गमवावी लागली आहे.

जिल्ह्यात पहिलीच्या वर्गाचे ४६ हजार ७७८ विद्यार्थी आहेत. यामध्ये २२ हजार २५८ मुली, तर २४ हजार ५२० मुलांची संख्या आहे. पहिलीच्या वर्गात प्रवेश झाल्यापासून शाळा बंद असल्याने अनेक पालक आपल्या चिमुकल्यांचा घरीच अभ्यास घेत आहेत. विशेष म्हणजे शिक्षकांची ओळख न होता ही बालके पुढील वर्गात दाखल झाली आहेत.

पहिलीच्या वर्गाला शालेय जीवनात महत्व

इयत्ता पहिलीच्या वर्गाला शालेय जीवनात महत्व आहे. सारे गाऊ या, अक्षर ओळख, वाचन पाठ, शब्दखेळ यातून अध्ययन, निश्चिती केली जाते. गोष्ट, कविता, गाणी, चित्रवाचन, अक्षर गट, कृती यावरून शिक्षणाची गोडी निर्माण केली जाते.

पाहा, ऐका व बोला या त्रिसूत्रीवर अधिक भर दिला जातो. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळाच बंद असल्याने पहिलीची मुले अभ्यासापासून वंचित राहिली आहेत.