शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

जिल्ह्यातील 45 हजार रूग्णांनी कोरोनाला हरवून दाखवले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:19 IST

लातूर : काेरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण असले तरी तब्बल ४५ हजार ७३५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ...

लातूर : काेरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण असले तरी तब्बल ४५ हजार ७३५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. घाबरू नका, कोरोना काही करू शकत नाही. लक्षणे दिसताच तपासणी करून उपचार घ्या, असा सल्ला कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांनी दिला आहे.

आरटीपीसीआर आणि रॅपिड टेस्ट मिळून जिल्ह्यात ४ लाख १ हजार ८५४ जणांनी चाचणी केली. त्यात ३ लाख ३६ हजार लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. फक्त ६२ हजार ६०६ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. यातील तब्बल ४५ हजार ७३५ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यांचे दैनंदिन जीवन पद्धती सुरळीत झाली आहे. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यातील काही जणांशी संवाद साधला असता कोरोनाला भिऊ नका, लक्षणे दिसताच डाॅक्टरांकडे जावून तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतल्यास पाच ते सहा दिवसात प्रकृती पूर्वपदावर येते. त्यामुळे भीतीचे कारण नाही. अंगावर घालणे चुकीचे आहे. औषधोपचार वेळेत घेतल्यास कोरोना तुमचे काही बिघडवू शकत नाही. आम्ही त्याला हरविले आता तुम्हीही त्याला हरवू शकता, असे आवाहनही कोरोनामुक्त झालेल्यांनी केले आहे.

शासनाने आखून दिलेले नियम पाळले तर मुळात कोरोनाच होणार नाही. परंतु, चुका होतात. आमच्याकडूनही झाली होती. त्यामुळेच त्याने आम्हाला घेरले. परंतु, मी घाबरलो नाही. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतला. पाच ते सहा दिवसांत प्रकृती पूर्वपदावर आली. ती येतेच. फक्त घाबरू नये. - सुधाकर सावंत,

कोरोनामुक्त रूग्ण, लातूर

कोरोनाला हरवू शकतो. मात्र लक्षणे दिसताच चाचणी करून औषध उपचार वेळेवर घ्यावा. लागण झाली तरी घाबरू नये. सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. मी वेळेत औषधोपचार घेतल्याने कोरोनाला हरविले. काळजी घ्या. घाबरू नका. शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे. - साबेर काझी, कोरोनामुक्त रूग्ण, लातूर

त्रास हाेतो. जेवण जात नाही. वास आणि चवही येत नाही. यावर सहज मात करता येते. घाबरू नये मन घट्ट करावे तेच मी केले. घरच्यांची साथ होती. डाॅक्टरांनी उपचार करून धीर दिला. त्यामुळे कोरोनाला मी सहज हरविले, तुम्हीही हरवू शकता. - शांताबाई झुंजे, कोरोनामुक्त रूग्ण.