शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

आरटीईच्या १७४० जागांसाठी ४ हजार २४ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. २०२१-२२ या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी ३० मार्च ही अर्जांसाठीची अंतिम तारीख होती. जिल्ह्यात १७४० जागांसाठी ४०२४ अर्ज आले असून, राज्यस्तरावरून निघणाऱ्या सोडतीकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

कोरोनामुळे अनेकांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी अर्ज आले आहेत. यामध्ये अहमदपूर तालुक्यातून १५०, औसा- १३७, चाकूर- ९२, देवणी- ५८, जळकोट- १७, लातूर- १७५९, लातूर युआरसी- १२७६, लातूर युआरसी २ - ८५२, निलंगा- १९७, रेणापूर- ५७, शिरूर अनंतपाळ २४ तर उदगीर तालुक्यातील ४०५ अर्जांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील २३८ शाळांनी शिक्षण विभागाकडे २५ टक्के मोफत प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये लातूर तालुक्यातील सर्वाधिक ५४ शाळांचा समावेश आहे. राज्यस्तरावरील सोडत लवकरच जाहीर होणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संदेश पाठविले जाणार आहेत. त्यानंतर निवड झालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. यंदाही शाळास्तरावर कागदपत्रे पडताळणीसाठी समित्या स्थापन केल्या जाणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.

२३८ शाळांची नोंदणी

शिक्षण विभागाकडे २३८ शाळांनी नोंदणी केली असून, यामध्ये अहमदपूर तालुक्यातील १६, औसा २०, चाकूर १४, देवणी ८, जळकोट ४, लातूर ५४, लातूर युआरसी १ - १५, लातूर युआरसी २- ३७, निलंगा २८, रेणापूर ८, शिरूर अनंतपाळ २ तर उदगीर तालुक्यातील ३२ शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १७४० जागा भरल्या जाणार आहेत.

शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यातून १७४० जागांसाठी ४०२४ अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यस्तरावरून लवकरच सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या शाळेत प्रवेश दिले जातील. या प्रक्रियेसाठी २३८ शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली आहे. प्रवेश प्रक्रियेची तयारी केली जात आहे. - विशाल दशवंत,

प्राथमिक शिक्षणाधिकारी

मोफत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन अर्ज भरला आहे. राज्यस्तरावर एकच सोडत निघणार असून, त्यानंतर प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश दिले जाणार आहेत. दरवर्षी प्रतीक्षा यादी उशिरा जाहीर होते. तोपर्यंत इतर शाळेतील प्रवेश बंद होतात. त्यामुळे शिक्षण विभागाने पहिल्या सोडतीनंतर प्रतीक्षा यादी लवकर जाहीर करावी.

- ऋषिकेश महामुनी, पालक

लाॅटरी जाहीर झाल्यानंतर कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पुरेसा अवधी देण्याची गरज आहे. पूर्वी तालुकास्तरावर कागदपत्रांची पडताळणी केली जात होती. आता शाळास्तरावर कागदपत्रे तपासली जात आहेत. त्यामुळे तात्काळ प्रवेश होत आहेत. सर्वांनाच प्रवेश मिळणे अशक्य असल्याने प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी द्यावी.

- शंकर भोसले, पालक

आरटीईची प्रवेशप्रक्रिया पूर्ण होण्यासाठी भरपूर कालावधी लागतो. तोपर्यंत इतर खाजगी शाळांत प्रवेश बंद होतात. त्यामुळे पालकांची धावपळ होते. आरटीईची प्रक्रिया वेळापत्रकानुसार पार पाडण्यात यावी. त्यामुळे पालकांची गैरसोय होणार नाही. प्रतीक्षा यादी जाहीर होण्यामधील अंतर कमीत कमी चार ते पाच दिवसांचे पाहिजे.

- प्रमोद शिनगारे, पालक

तालुका शाळा जागा अर्ज

अहमदपूर १६ १०१ १५०

औसा २० ८९ १३७

चाकूर १४ ७३ ९२

देवणी ०८ ३९ ५८

जळकोट ०४ ०५ १७

लातूर ५४ ५१९ १७५९

लातूर-१ १५ १५१ २७६

लातूर-२ ३७ ३४७ ८५२

निलंगा २८ १५८ १९७

रेणापूर ०८ ३२ ५७

शिरूर अ. ०२ १२ २४

उदगीर ३२ २१४ ४०५