पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या वारसांना ४ लाखांचा धानादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST2021-09-18T04:21:20+5:302021-09-18T04:21:20+5:30

अहमदपूर तालुक्यातील हगदळ येथील मल्हारी कांबळे हे शेतात मजूरीसाठी गेले होते. दरम्यान, संततधार पावसाने नदी-नाले तुडूंब वाहत होते. ...

4 lakh check to heirs of flood victims | पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या वारसांना ४ लाखांचा धानादेश

पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या वारसांना ४ लाखांचा धानादेश

अहमदपूर तालुक्यातील हगदळ येथील मल्हारी कांबळे हे शेतात मजूरीसाठी गेले होते. दरम्यान, संततधार पावसाने नदी-नाले तुडूंब वाहत होते. या पावसाच्या पाण्याने हगदळ येथील साठवण तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत हाेते. पाण्याचा वेग असल्याने त्यांना अंदाज आला नाही. या पाण्यातच मल्हारी कांबळे हे वाहून गेले. यातच त्यांचा मृत्यू झाला. आ. बाबासाहेब पाटील यांनी हगदळ येथे त्यांच्या कुटुंबाची भेट घेवून सांत्वन केले हाेते. आ. बाबासाहेब पाटील यांनी तहसीलदारांना सूचना केल्या. कांबळे कुटुंबियांना आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ४ लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. कांबळे कुटुंबातील कर्ता व्यक्ती मयत मल्हारी कांबळे होते. या घटनेने त्यांच्या कुटुंबाची मोठी हानी झाली. त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, यासाठी आ. पाटील यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर मयताची पत्नी रंजना कांबळे यांना मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, निवृत्तीराव कांबळे, जि.प. सदस्य माधवराव जाधव, सरपंच बाळू मुंडे, माधव भोसले, दयानंद पाटील, श्याम पाटील, नबी सय्यद, युवराज पाटील, संग्राम गायकवाड यांची उपस्थिती हाेती.

फोटाे कॅप्शन : पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या वारसांना ४ लाख रुपयांचा धनादेश आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांची उपस्थिती हाेती.

Web Title: 4 lakh check to heirs of flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.