शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

३३ टक्के वाहनधारकांना विमा काढण्याचा विसर!

By आशपाक पठाण | Updated: June 9, 2024 21:39 IST

१८ लाखांचा दंड : तपासणीत ८३३४ पैकी २७७८ जणांकडे नव्हता विमा

आशपाक पठाण/ लातूर : वाहन खरेदी करताना काढलेला वाहनांचा विमा पुन्हा काढायचा म्हटलं की उगीच कशाला पैसे गुंतवायचे म्हणून अनेक वाहनधारक त्याकडे दुर्लक्ष करतात. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना विमा, फिटनेस, पीयुसी, चालकाकडे परवाना असणे अत्यावश्यक असताना अनेकजण याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. लातूरच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकांनी वर्षभरात तपासणी केलेल्या ८ हजार ३३४ वाहनांपैकी २ हजार ७७८ जणांकडे विमा नसल्याचे आढळून आले आहे.

वाहनाचा अपघात झाला, त्यात कोणाचा मृत्यू झाला किंवा वाहनांचे नुकसान, कुणी जखमी झाले तर त्याची नुकसान भरपाई कोण देणार? बरं अपघातात मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देताना न्यायालय किती रक्कम मंजूर करील हे सांगणेही कठीण. वाहनधारकांना विम्याचे महत्व अनेकदा अपघात झाल्यावरच लक्षात येते. एरवी याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही. विशेष करून दुचाकी, ऑटोरिक्षा, ट्रॅक्टरसह ग्रामीण भागातील वाहनधारक विमा काढण्याचे दुर्लक्ष करीत असतात. परिवहन विभागाच्या पथकाने वर्षभरात तपासणी केलेल्या एकुण वाहनांच्या जवळपास ३३ टक्के वाहनधारकांडे विमा आढळून आला नाही.

अपघात झाल्यास भरपाई देणार कोण...

वाहनांसाठी विमा अत्यावश्यक आहे. अनेकदा नवीन वाहन खरेदी करीत असताना आणि जुन्या वाहनांची खरेदी विक्री झाल्यावरच काहीजण विमा काढतात. तेही प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून. आपल्या वाहनाचा अपघात झाला. त्यात कुणी मयत किंवा जखमी झाले त्याची भरपाई स्वत:च्या खिशातूनच करावी लागते. त्यामुळे स्वत: बरोबरच इतरांच्या सुरक्षेसाठी विमा आवश्यक आहे.

वाहन चालक, मालकांनी घ्यावी काळजी...

वाहन चालकाकडे परवाना गरजेचा आहे. शिवाय, आपण जे वाहन चालवित आहोत, त्या वाहनांचे फिटनेस, विमा, पीयुसी आदींबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा वाहनमालक विमा काढण्यासाठी चालढकल करतात, पण ते कधीही अंगलट येऊ शकते. त्यासाठी वाहतूक नियमांसह, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन होणार नाही, यासाठी सजग राहणे गरजेचे आहे.

सुरक्षेसाठी विमा आवश्यक...

विमा नसताना वाहन चालवू नये. कोणतीही दुर्घटना, प्रसंग सांगून येत नाही. वाहन चालवित असताना एखादा पादचारी अचानक समोर येतो. वाहन स्लीप झाल्याने आपल्यालाच मार लागतो, वाहनांचे नुकसान होते. सुरक्षेसाठी वाहनांचा विमा महत्वाचा आहे. त्यामुळे वाहनांचा विमा, पीयुसी दरवर्षी न चुकता काढावी. लातूरच्या परिवहन विभागाने एप्रिल २३ ते मार्च २०२४ या कालावधीत तपासणी केलेल्या वाहनांत विमा नसलेल्याकडून १८ लाख ६५ हजारांचा दंड वसूल केला आहे.- विनोद चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, लातूर. 

टॅग्स :laturलातूर