शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

३३ टक्के वाहनधारकांना विमा काढण्याचा विसर!

By आशपाक पठाण | Updated: June 9, 2024 21:39 IST

१८ लाखांचा दंड : तपासणीत ८३३४ पैकी २७७८ जणांकडे नव्हता विमा

आशपाक पठाण/ लातूर : वाहन खरेदी करताना काढलेला वाहनांचा विमा पुन्हा काढायचा म्हटलं की उगीच कशाला पैसे गुंतवायचे म्हणून अनेक वाहनधारक त्याकडे दुर्लक्ष करतात. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना विमा, फिटनेस, पीयुसी, चालकाकडे परवाना असणे अत्यावश्यक असताना अनेकजण याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. लातूरच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकांनी वर्षभरात तपासणी केलेल्या ८ हजार ३३४ वाहनांपैकी २ हजार ७७८ जणांकडे विमा नसल्याचे आढळून आले आहे.

वाहनाचा अपघात झाला, त्यात कोणाचा मृत्यू झाला किंवा वाहनांचे नुकसान, कुणी जखमी झाले तर त्याची नुकसान भरपाई कोण देणार? बरं अपघातात मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देताना न्यायालय किती रक्कम मंजूर करील हे सांगणेही कठीण. वाहनधारकांना विम्याचे महत्व अनेकदा अपघात झाल्यावरच लक्षात येते. एरवी याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही. विशेष करून दुचाकी, ऑटोरिक्षा, ट्रॅक्टरसह ग्रामीण भागातील वाहनधारक विमा काढण्याचे दुर्लक्ष करीत असतात. परिवहन विभागाच्या पथकाने वर्षभरात तपासणी केलेल्या एकुण वाहनांच्या जवळपास ३३ टक्के वाहनधारकांडे विमा आढळून आला नाही.

अपघात झाल्यास भरपाई देणार कोण...

वाहनांसाठी विमा अत्यावश्यक आहे. अनेकदा नवीन वाहन खरेदी करीत असताना आणि जुन्या वाहनांची खरेदी विक्री झाल्यावरच काहीजण विमा काढतात. तेही प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून. आपल्या वाहनाचा अपघात झाला. त्यात कुणी मयत किंवा जखमी झाले त्याची भरपाई स्वत:च्या खिशातूनच करावी लागते. त्यामुळे स्वत: बरोबरच इतरांच्या सुरक्षेसाठी विमा आवश्यक आहे.

वाहन चालक, मालकांनी घ्यावी काळजी...

वाहन चालकाकडे परवाना गरजेचा आहे. शिवाय, आपण जे वाहन चालवित आहोत, त्या वाहनांचे फिटनेस, विमा, पीयुसी आदींबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा वाहनमालक विमा काढण्यासाठी चालढकल करतात, पण ते कधीही अंगलट येऊ शकते. त्यासाठी वाहतूक नियमांसह, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन होणार नाही, यासाठी सजग राहणे गरजेचे आहे.

सुरक्षेसाठी विमा आवश्यक...

विमा नसताना वाहन चालवू नये. कोणतीही दुर्घटना, प्रसंग सांगून येत नाही. वाहन चालवित असताना एखादा पादचारी अचानक समोर येतो. वाहन स्लीप झाल्याने आपल्यालाच मार लागतो, वाहनांचे नुकसान होते. सुरक्षेसाठी वाहनांचा विमा महत्वाचा आहे. त्यामुळे वाहनांचा विमा, पीयुसी दरवर्षी न चुकता काढावी. लातूरच्या परिवहन विभागाने एप्रिल २३ ते मार्च २०२४ या कालावधीत तपासणी केलेल्या वाहनांत विमा नसलेल्याकडून १८ लाख ६५ हजारांचा दंड वसूल केला आहे.- विनोद चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, लातूर. 

टॅग्स :laturलातूर