शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गणेश उत्सव काळात उदगीर तालुक्यातील १९ जणांना प्रवेश बंदी !

By राजकुमार जोंधळे | Updated: September 3, 2022 17:57 IST

अन्य जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे.

लातूर : श्री गणेश विसर्जन शांततेत पार पडण्यासाठी, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उदगीर तालुक्यातील १९ जणांविराेधात तीन दिवस प्रवेश बंदीची कारवाई केली आहे. याबाबत पाेलीस प्रशासनाने उपजिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केले हाेते. दरम्यान, या प्रस्तावर सुनावणीनंतर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, उदगीर शहरासह तालुक्यात गणेशोत्सव आणि विसर्जन काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उदगीर शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीअंतर्गत येणाऱ्या, उत्सव काळात धार्मिक तेढ निर्माण करणे, शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या, खुनाचा प्रयत्न करणाऱ्या, दारू पिऊन लोकांना मारहाण करत जबर दुखापत करणाऱ्या, बेकायदेशीर जमाव जमवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या लोकांविराेधात अलीकडच्या काळात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अशा गुन्हेगारी वृत्तीच्या १९ जणांविराेधात उदगीर शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ ते ६ सप्टेंबरपर्यंत फौजदारी दंडसंहिता कलम १४४ अन्वये ‘तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश बंदी’ची कारवाई उदगीरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली आहे. उत्सवकाळात लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, नागरिक, कार्यकर्ते यांची पोलीस मित्र समिती, शांतता समिती, पोलीस ठाण्याच्या स्तरावर बैठका घेण्यात आल्या आहेत. 

अन्य जिल्ह्यातून मागवला बंदोबस्त...गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. लातूर पोलीस दलाकडे असलेले मनुष्यबळ या व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे.- निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, लातूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर