शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
"अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

शिक्षक-पालकांच्या समन्वयातून तालुक्यात १९ लाख ७१ हजारांचा लोकवाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदपूर : लोकसहभाग व शिक्षकांच्या मदतीने ‘बाला उपक्रम’ अभियानाने तालुक्यात विधायक स्पर्धा निर्माण झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदपूर : लोकसहभाग व शिक्षकांच्या मदतीने ‘बाला उपक्रम’ अभियानाने तालुक्यात विधायक स्पर्धा निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून बाला उपक्रम राबविला जात आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. अहमदपूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १७२ प्राथमिक शाळा असून, यापैकी १५० शाळांमध्ये रंगरंगोटीसह परिसर स्वच्छता केली आहे. शिक्षक व पालकांच्या समन्वयातून १९ लाख ७१ हजारांची लोकवर्गणी जमा झाली आहे.

कोरोनाच्या सावटामुळे शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची खटपट सुरू आहे. कोरोनाचे संकट दूर व्हावे व शाळा पुन्हा विद्यार्थ्यांनी भराव्यात. प्रार्थना, पाठ्यपुस्तकातील धडे, गणितांची आकडेमोड करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक सज्ज आहेत. बाला उपक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनाच वाटले शाळेत मुले नाहीत, शिक्षक संख्या कमी आहे. पालकांचे शाळेकडे येणे-जाणे बंद झाले आहे. अशा परिस्थितीत हे कसे काय शक्य आहे? लोकसहभागासह, शिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद वाढण्यास सुरुवात झाली. संपूर्ण तालुक्यात शाळा स्वच्छता, रंगरंगोटीची चळवळ सुरू झाली. हळूहळू याचे रूपांतर स्पर्धेमध्ये झाले. मग कोणी सांगतोय म्हणून करावे, यापेक्षा शिक्षकांनाच वाटायला लागले की आपली शाळा स्वच्छ, सुंदर व्हायला हवी.

संपूर्ण तालुक्यातील शिक्षक-पालक, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती या अभियानांतर्गत कामाला लागले. शाळेच्या आवारातील वृक्षारोपण, शाळा रंगरंगोटी, वर्ग स्वच्छता, मैदान सपाटीकरण, स्वच्छतागृहांची सोय, पाण्याची सोय करण्यात आली. तसेच बाला उपक्रमांतर्गत शाळेच्या संरक्षक भिंतीवर रंगरंगोटी करत या भिंतीवर ग्रामस्वच्छता, प्रदूषणमुक्त गाव, पर्यावरणमुक्त गाव, जल पुनर्भरण असे महत्त्वाचे मुद्दे सादर करत यासारख्या गोष्टी शाळेत पुन्हा नव्याने दिसू लागल्या. कोरोनाच्या सावटामुळे आलेली मरगळ दूर होत आहे.

विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत होणार...

विद्यार्थ्यांना आनंदाने व स्वतःच्या गतीने शिकण्यास मदत होणार आहे. तसेच यातील काही उपक्रम असे आहेत की, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणाचेही महत्त्व समजणार आहे. त्याचबरोबर विविध कौशल्य विकासासाठी हे उपक्रम महत्त्वाचे आहेत. तालुक्यातील अनेक शाळांमध्ये चांगल्याप्रकारे काम झाले आहे. नवनवीन संकल्पनांसह शाळेचा परिसर सुशोभित करण्यात आलेला आहे.

- बबनराव ढोकाडे, गटशिक्षणधिकारी, पंचायत समिती