शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
3
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
4
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
5
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
6
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
7
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
8
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
9
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
10
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
11
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
12
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
13
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
14
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
15
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
16
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
17
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
18
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
19
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
20
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
Daily Top 2Weekly Top 5

१७ हजार क्विंटल सोयाबीन बियाणांची शिरूर अनंतपाळसाठी गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST

शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यात खरीप हंगामासाठी १७ हजार ६२५ क्विंटल सोयाबीन बियाणांची गरज आहे. बियाणांच्या उपलब्धतेसाठी तालुका ...

शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यात खरीप हंगामासाठी १७ हजार ६२५ क्विंटल सोयाबीन बियाणांची गरज आहे. बियाणांच्या उपलब्धतेसाठी तालुका कृषी कार्यालयाने त्रिस्तरीय कृती आराखडा तयार केला आहे. त्यात शेतकऱ्यांकडील, महाबीज आणि वखार महामंडळाकडून उपलब्ध होणारे तसेच खाजगी कंपन्याचे बियाणे राहणार आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात २८ हजार ५०० हेक्टर्स लागवडीस योग्य क्षेत्र आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी सोयाबीनचा पेरा करतात. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयाकडून २३ हजार ८२५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार सोयाबीन बियाणांची उपलब्धता होणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषी विभागाने तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, मंडळ अधिकारी सदाशिव गाढवे, कृषी अधिकारी शिवप्रसाद वलांडे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्रिस्तरीय कृती आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांकडे सर्वाधिक म्हणजे १३ हजार ५८८ क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे सर्वेक्षण कृषी विभाकडून करण्यात आले. महाबीज आणि वखार महामंडळाकडून १ हजार क्विंटल बियाणे मागविण्यात आले आहे. खाजगी कंपन्यांकडून जवळपास १ हजार ९०० क्विंटल बियाणे उपलब्ध होत आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरणीसाठी १७ हजार ६२५ क्विंटल बियाणांची गरज आहे. सध्या १७ हजार ७३५ क्विंटल बियाणांची उपलब्धता झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई गडबड न करता योग्य बियाणांची निवड करावी, असे आवाहन तालुका कृषी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

खरीपाच्या पेऱ्याचे नियोजन...

खरीप हंगामासाठी २८ हजार ५०० हेक्टर्स लागवडीस योग्य क्षेत्र असून, त्यापैकी २३ हजार ८२५ हेक्टरवर सोयाबीन, ३ हजार ८०० हेक्टरवर तूर, १८८ हेक्टरवर हायब्रीड ज्वारी, ३०३ हेक्टरवर उडीद तर ३२५ हेक्टरवर मुग असा पेरा होण्याचा अंदाज आहे.

खरीप हंगामात पेरणी करताना शेतकऱ्यांनी बियाणांची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सरी वरंबा पध्दतीचा वापर करावा. तसेच कोणत्याही बियाणांची पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करणे आवश्यक असून, त्यासाठी अडचण येत असल्यास कृषी सहायकांशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे यांनी केले आहे.