शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यातील 142 प्रकल्पांत 16 टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 22:50 IST

मांजरा प्रकल्पात 3.4 टक्के तर जिल्ह्यातील 8 मध्यम प्रकल्पांत जेमतेम पाणीसाठा 

हणमंत गायकवाडलातूर - यंदाच्या पावसाळ्यात 455.3 मि़मी़ पाऊस झाला असला तरी प्रकल्पांतील पाणीसाठा तळालाच आहे़ दोन मोठ्या, आठ मध्यम आणि 132 लघु प्रकल्पांत केवळ 16 टक्के उपयुक्त पाणीसाठी आहे़ लातूर शहराला पाणीपुरवठा करणाºया मांजरा प्रकल्पात तर केवळ 3.4 टक्केच पाणी आहे. त्यामुळे परतीच्या पावसाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लातूर जिल्ह्यात सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरी पाऊसमान 725 मिमी आहे. आतापर्यंत 455.3 मिमी पाऊस झाला असला तरी महसूल मंडळनिहाय सारखा पाऊस झाला नाही. त्यामुळे प्रकल्पांत पाण्याचा संचय झालेला नाही़ मांजरा प्रकल्प क्षेत्रात तर केवळ 277 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे लातूर, अंबाजोगाई, धारूर, केज, कळंब या शहरांना पाणीपुरवठा करणाºया मांजरा प्रकल्पात 3.4 टक्के पाणी आहे़ परतीच्या पावसावरच आता आशा आहे़ लातूर जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीच नाही़ 3.504 दलघमीचा मृतसाठा आहे. रेणा प्रकल्पात 2.638 दलघमी उपयुक्त पाणी आहे़ व्हटी मध्यम प्रकल्पातही मृत म्हणजे 1.060 दलघमी पाणी आहे़ तिरू मध्यम प्रकल्पातही 0.050 दलघमी उपयुक्त पाणी संचित झाले आह़े़ देवर्जन प्रकल्पात मात्र बऱ्यापैकी उपयुक्त पाणीसाठा असून, हा प्रकल्प 41.78 टक्के भरला आहे़ साकोळ प्रकल्पातही 60.44 टक्के तसेच घरणी मध्यम प्रकल्पात 95.18 टक्के आहे़ मसलगा प्रकल्पात 45.5 टक्के पाण्याचा संचय झाला आहे़ लघु आणि मध्यम असे एकूण 140 आणि 2 मोठ्या प्रकल्पांत 16.79 टक्के पाणीसाठा आहे़ परतीचा पाऊस नाही झाला तर या पाण्यावरच 24 लाख लोकसंख्येला आपली तहान भागवावी लागणार आहे. 

असे आहे पर्जन्यमानलातूर जिल्ह्यात आतापर्यंत 455.3 मिमी पाऊस झाला असून, लातूर तालुक्यात 4.2.1, औसा 361.2 अहमदपूर 516.9 निलंगा 473.7, उदगीर 435.8, चाकूर 552.2, रेणापूर 480.9, देवणी 432.9, शिरूर अनंतपाळ 514.1 आणि जळकोट तालुक्यात 477.7 मि़मी पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा हा पाऊस कमी असला तरी गतवर्षी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील सर्व मध्यम प्रकल्प भरले होते. शिवाय मांजरा प्रकल्पातही 80 टक्क्यांपुढे पाणीसाठा होता़ यंदा मात्र 3.4 टक्के पाणी आहे़ 

10 दिवसाआड शहराला पाणीपुरवठा.पावसाने ताण दिल्यामुळे लातूर महानगरपालिकेने पाणीपुरवठा 8 ऐवजी 10 दिवसांआड सुरू केला आहे़ मांजरा प्रकल्प तसेच साई, नागझरीत पाणी नसल्यामुळे महानगपालिकेने आतापासुनच पाणी जपून वापरण्यासाठी ही खबरदारी घेतली आहे.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर