शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

जिल्हा परिषद शाळेच्या १५ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा; उदगीर तालुक्यातील तोंडार शाळेतील घटना 

By आशपाक पठाण | Published: September 12, 2023 6:23 PM

उदगीर तालुक्यातील तोंडार जिल्हा परिषद शाळेत खिचडी खाल्ल्याने जवळपास १५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

उदगीर (लातूर) : तालुक्यातील तोंडार जिल्हा परिषद शाळेत खिचडी खाल्ल्याने जवळपास १५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. खिचडी खाल्ल्यावर काही वेळात विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. ही बाब शिक्षकांच्या लक्षात येताच तत्काळ त्या विद्यार्थ्यांना उदगीर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

खिचडी खाल्ल्यावर त्रास झालेल्या १५ पैकी ११ जणांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तर ४ जण दक्षता विभागात उपचार घेत असल्याचे सामान्य रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय महिंद्रकर यांनी सांगितले. तोंडारच्या शाळेत मंगळवारी मध्यान्ह भोजनात तांदूळ व हरभरा याचा वापर करून बनविण्यात आलेली खिचडी विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी काही जणांनी खिचडी शाळेत खाल्ली तर काहीजण घरी घेऊन गेले. खिचडी खाल्ल्यानंतर काही वेळाने विद्यार्थ्यांना मळमळी व उलटीचा त्रास सुरू झाला. दरम्यान, उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या काही पालकांनी खिचडीमध्ये आळ्या असल्याच्या व तांदळाला जाळ्या आणि हरभरे हे किडके वापरल्याचा आरोप केला आहे. निकृष्ट धान्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

पोटदुखीमुळे विद्यार्थी त्रस्त...रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या काही विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास सुरू होता, त्यामुळे ते विद्यार्थी रडत होते. यावेळी शाळेतील शिक्षिकाही रूग्णालयात उपस्थित होत्या. शाळेच्या कामानिमित्त उदगीरला गेलेले प्रभारी मुख्याध्यापक आर.बी. फड घटनेची माहिती मिळताच शाळेत हजर झाले.

सर्वांची प्रकृती स्थिर : डॉ. महिंद्रकररूग्णालयाच्या दक्षता विभागात अनिकेत जाधव (वय ६), सृष्टी मालोदे (वय ६), रंगनाथ कबाडे (वय १०) आरती गायकवाड (वय ८) यांच्यावर उपचार सुरू आहे. तसेच रिया गायकवाड (८), पृथ्वीराज चव्हाण (१२), अभिषेक तेलंगे (६), जुनेद शेख (११ ), यश जाधव (१०), नागनाथ गायकवाड (१०), गुरु दाजी (७ ) अनुजा स्वामी (९), अंजली राठोड (९) विजय राठोड ( ७) विजया राठोड (६) यांच्यावर उपचार करण्यात आले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे, कुणालाही कोणताही धोका नाही असे सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ.अजय महिंद्रकर यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूर