शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

होत्याचे नव्हते झाले, पावसाच्या पाण्यात १५ एकर सोयाबीन गेले वाहून

By आशपाक पठाण | Updated: July 10, 2024 19:07 IST

कृषी विभागाकडून पाहणी : पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी

लातूर : तालुक्यातील कानडी बोरगाव शिवारात ८ जुलै रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे अनेकांच्या शेतातील उभे पीक वाहून गेले आहे. तर काही शेतकऱ्यांच्या पिकात पाणी जमा झाल्याने सोयाबीनचे नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्यात नुकसान झाल्याने महसूल विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

लातूर तालुक्यातील कानडी बोरगाव, टाकळगाव, तांदुळजा, सारसा शिवारात ८ जुलै रोजी जोरदार पाऊस झाला. या पावसात अनेकांच्या पिकात पाणी थांबल्याने पिके पिवळी पडली आहेत. तर काही शेतकऱ्यांचे पीकच वाहून गेले आहे. कानडी बोरगाव शिवारात जमीन असलेल्या टाकळगाव येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात गट नंबर ३३, ३४, ३६ व ३७ मधील शेतकऱ्यांचे सोयाबीन वाहून गेले असून शेतकरी उध्दवराव कदम, सिताराम कदम, साहेबराव जाधव, युवराज कदम, उत्तम कदम यांचे जवळपास १५ ते १८ एकरावरील पिकाचे नुकसान झाले. याबाबत तलाठी, कृषी सहाय्यक यांना माहिती दिल्यावर बुधवारी कृषी सहाय्यक माळी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच नुकसानीची माहिती घेतल्याचे शेतकरी उध्दव कदम यांनी सांगितले.

दरवर्षी पावसाच्या पाण्यात नुकसान...पावसाळ्यात दरवर्षी या गटातील पिकांत पाणी जमा होते. या भागातून वाहणारे कानडी बोरगाव तांडा शिवारातून खाली मांजरा नदीपाकडे जाते. पावसाळ्यात या पाण्याचा वेग अधिक असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यंदाही नुकतीच पेरणी झालेले सोयाबीन पूर्णत: वाहून गेले आहे. यात लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सिताराम कदम, साहेबराव जाधव, उध्दव कदम यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरRainपाऊसWaterपाणीAgriculture Sectorशेती क्षेत्र