शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

होत्याचे नव्हते झाले, पावसाच्या पाण्यात १५ एकर सोयाबीन गेले वाहून

By आशपाक पठाण | Updated: July 10, 2024 19:07 IST

कृषी विभागाकडून पाहणी : पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी

लातूर : तालुक्यातील कानडी बोरगाव शिवारात ८ जुलै रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे अनेकांच्या शेतातील उभे पीक वाहून गेले आहे. तर काही शेतकऱ्यांच्या पिकात पाणी जमा झाल्याने सोयाबीनचे नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्यात नुकसान झाल्याने महसूल विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

लातूर तालुक्यातील कानडी बोरगाव, टाकळगाव, तांदुळजा, सारसा शिवारात ८ जुलै रोजी जोरदार पाऊस झाला. या पावसात अनेकांच्या पिकात पाणी थांबल्याने पिके पिवळी पडली आहेत. तर काही शेतकऱ्यांचे पीकच वाहून गेले आहे. कानडी बोरगाव शिवारात जमीन असलेल्या टाकळगाव येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात गट नंबर ३३, ३४, ३६ व ३७ मधील शेतकऱ्यांचे सोयाबीन वाहून गेले असून शेतकरी उध्दवराव कदम, सिताराम कदम, साहेबराव जाधव, युवराज कदम, उत्तम कदम यांचे जवळपास १५ ते १८ एकरावरील पिकाचे नुकसान झाले. याबाबत तलाठी, कृषी सहाय्यक यांना माहिती दिल्यावर बुधवारी कृषी सहाय्यक माळी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच नुकसानीची माहिती घेतल्याचे शेतकरी उध्दव कदम यांनी सांगितले.

दरवर्षी पावसाच्या पाण्यात नुकसान...पावसाळ्यात दरवर्षी या गटातील पिकांत पाणी जमा होते. या भागातून वाहणारे कानडी बोरगाव तांडा शिवारातून खाली मांजरा नदीपाकडे जाते. पावसाळ्यात या पाण्याचा वेग अधिक असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यंदाही नुकतीच पेरणी झालेले सोयाबीन पूर्णत: वाहून गेले आहे. यात लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सिताराम कदम, साहेबराव जाधव, उध्दव कदम यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरRainपाऊसWaterपाणीAgriculture Sectorशेती क्षेत्र