शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

होत्याचे नव्हते झाले, पावसाच्या पाण्यात १५ एकर सोयाबीन गेले वाहून

By आशपाक पठाण | Updated: July 10, 2024 19:07 IST

कृषी विभागाकडून पाहणी : पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी

लातूर : तालुक्यातील कानडी बोरगाव शिवारात ८ जुलै रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे अनेकांच्या शेतातील उभे पीक वाहून गेले आहे. तर काही शेतकऱ्यांच्या पिकात पाणी जमा झाल्याने सोयाबीनचे नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्यात नुकसान झाल्याने महसूल विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

लातूर तालुक्यातील कानडी बोरगाव, टाकळगाव, तांदुळजा, सारसा शिवारात ८ जुलै रोजी जोरदार पाऊस झाला. या पावसात अनेकांच्या पिकात पाणी थांबल्याने पिके पिवळी पडली आहेत. तर काही शेतकऱ्यांचे पीकच वाहून गेले आहे. कानडी बोरगाव शिवारात जमीन असलेल्या टाकळगाव येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात गट नंबर ३३, ३४, ३६ व ३७ मधील शेतकऱ्यांचे सोयाबीन वाहून गेले असून शेतकरी उध्दवराव कदम, सिताराम कदम, साहेबराव जाधव, युवराज कदम, उत्तम कदम यांचे जवळपास १५ ते १८ एकरावरील पिकाचे नुकसान झाले. याबाबत तलाठी, कृषी सहाय्यक यांना माहिती दिल्यावर बुधवारी कृषी सहाय्यक माळी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच नुकसानीची माहिती घेतल्याचे शेतकरी उध्दव कदम यांनी सांगितले.

दरवर्षी पावसाच्या पाण्यात नुकसान...पावसाळ्यात दरवर्षी या गटातील पिकांत पाणी जमा होते. या भागातून वाहणारे कानडी बोरगाव तांडा शिवारातून खाली मांजरा नदीपाकडे जाते. पावसाळ्यात या पाण्याचा वेग अधिक असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यंदाही नुकतीच पेरणी झालेले सोयाबीन पूर्णत: वाहून गेले आहे. यात लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सिताराम कदम, साहेबराव जाधव, उध्दव कदम यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरRainपाऊसWaterपाणीAgriculture Sectorशेती क्षेत्र