शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जिल्हा परिषदेत सत्तारूढ अनियंत्रित समन्वय नसल्याचे उघड : सभागृहात आवाज चढवून बोलण्याची जणू स्पर्धाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:56 IST

कोल्हापूर : सत्तेमध्ये राहायचे, मात्र कारभाराचा पंचनामा करण्याची एकही संधी सोडायची नाही, हा राज्यस्तरावरील शिवसेनेचा कित्ता कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये गिरवण्याचे काम अतिशय प्रामाणिकपणे सुरू

ठळक मुद्देअंबरीश घाटगे हेच सभा हाताळत असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांमध्ये दिसून येत आहे

समीर देशपांडे ।कोल्हापूर : सत्तेमध्ये राहायचे, मात्र कारभाराचा पंचनामा करण्याची एकही संधी सोडायची नाही, हा राज्यस्तरावरील शिवसेनेचा कित्ता कोल्हापूरजिल्हा परिषदेमध्ये गिरवण्याचे काम अतिशय प्रामाणिकपणे सुरू आहे. या खेळामध्ये सत्तारूढ भाजपचेच मोहरे आघाडीवर असल्याने ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ अशी पदाधिकाऱ्यांची अवस्था झालीआहे.

जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्तारूढांमध्ये किती समन्वय आहे, याचे प्रत्यंतर दिसून आले.मुळात जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन करताना विळ्या-भोपळ्याचे सख्य असलेली मंडळी एकत्र आणली गेली. महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका अध्यक्ष होणार यासाठी पक्षभेद विसरून काहीजणांनी पाठिंबा दिला; तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा ‘शब्द’ मानण्याचे अनेक फायदे असू शकतात, याचा विचार करूनही काहीजणांनी सहकार्याचा हात दिला.

भाजप मित्रपक्षांची सत्ता येऊन आता सव्वा वर्ष झाले आहे. स्वाभिमानी आणि प्रकाश आवाडे गट यांच्या अंतर्गत समझोत्यानुसार महिला आणि बालकल्याण समितीचे सभापतिपद शुभांगी शिंदे यांच्याकडून वंदना मगदूम यांच्याकडे आले आहे. मात्र, उरलेला पदाधिकारी बदल थंडावला आहे; त्यामुळे स्वप्नभंग झालेले आक्रमक होत आहेत.

सुरुवातीपासून विरोधकांनी आपली भूमिका चांगल्या पद्धतीने वठविण्याची सुरुवात केली. मात्र, विरोधकांच्या या नाट्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधाºयांनीच प्रमुख भूमिका वठवायला सुरुवात केली आहे. यामध्ये अरुण इंगवले आणि विजय भोजे हे तर नेहमी डॅशिंग भूमिकेतच असतात. भाजपचे गटनेते असलेल्या इंगवले यांनी मंगळवारच्या सभेत अधिकाºयांचा एकेरी विचारणा करत आणि ‘अहो, अंबरीश घाटगे, शिक्षण आणि अर्थ सभापती’ असा जावयांचा उल्लेख करत आपला इरादा स्पष्ट केला आहे; तर पक्षप्रतोद म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे, त्या विजय भोजे यांनीच तडाखेबंद विरोधी बॅटिंग केली आहे. राहुल आवाडे आणि प्रसाद खोबरे यांचा वाद नळावरील भांडणासारखा होता.

अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी काही निर्णायक क्षणी संबंधितांना सुनावण्याची आणि कामकाज पुढे नेण्याची भूमिका घेतली असली तर अंबरीश घाटगे हेच सभा हाताळत असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांमध्ये दिसून येत आहे. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील अधेमधे बोलण्याचा प्रयत्न करतात. बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर केवळ शांत राहून पाहणे पसंत करतात आणि समाजकल्याण समिती सभापती विशांत महापुरे फारसे बोलून कुणाला अंगावर घेत नाहीत. यामध्ये अधिकाºयांची मात्र पुरती कोंडी होत असल्याचे दिसून आले. सीईओ अमन मित्तल नवीन आहेत. त्यांना भाषेची अडचण आहे. त्यामुळे ठाम भूमिका घेण्यासाठी अजून त्यांना वेळ द्यावा लागणार आहे.

जे दोघे सत्तेत आहेत तेच आपल्या एकमेकांविरोधी मागण्यांसाठी खालून अधिकाºयांचा पंचनामा करत असल्याचे या सभेमध्ये दिसून आले आहे. ज्या पद्धतीने पारदर्शी कारभाराच्या खालून गप्पा मारल्या गेल्या, त्याच पद्धतीने कोणत्याही प्रकरणामध्ये हस्तक्षेप न करता प्रत्येक विभागाचा लेखाजोखा काढायचा म्हटले तर सत्ताधारीसुद्धा काही प्रकरणांमध्ये अडचणीत येऊ शकतात. त्यामुळेच केवळ भाषणबाजी करण्यापेक्षा कारभार कसा नीट चालेल, शासनाच्या नियमांच्या अधीन राहून होईल आणि यासाठी कारभारी मंडळींनी स्वत:चाच अवाजवी हस्तक्षेप टाळून कारभार सुधारण्यासाठी वेळ दिला तर ते निश्चितच जिल्हा परिषदेसाठी हिताचे ठरणार आहे. अन्यथा हे स्वकियांकडूनच होणारे वस्त्रहरण सत्ताधाºयांना पाहत बसावे लागणार आहे.पाठिंब्यासाठी विरोधकांच्या टाळ्याज्या पद्धतीने या सभेमध्ये सत्तारूढ गटातील कारभाºयांनी हल्लाबोल केला ते पाहता विरोधकांनी काहीही न करता केवळ टाळ्या वाजवून इंगवले, भोजे, खोबरे यांना पाठिंबा देण्याची घेतलेली भूमिकाही पुरेशी होती. एवढेच काम या सर्वांनी विरोधकांसाठी शिल्लक ठेवले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद