शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

जिल्हा परिषदेत सत्तारूढ अनियंत्रित समन्वय नसल्याचे उघड : सभागृहात आवाज चढवून बोलण्याची जणू स्पर्धाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:56 IST

कोल्हापूर : सत्तेमध्ये राहायचे, मात्र कारभाराचा पंचनामा करण्याची एकही संधी सोडायची नाही, हा राज्यस्तरावरील शिवसेनेचा कित्ता कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये गिरवण्याचे काम अतिशय प्रामाणिकपणे सुरू

ठळक मुद्देअंबरीश घाटगे हेच सभा हाताळत असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांमध्ये दिसून येत आहे

समीर देशपांडे ।कोल्हापूर : सत्तेमध्ये राहायचे, मात्र कारभाराचा पंचनामा करण्याची एकही संधी सोडायची नाही, हा राज्यस्तरावरील शिवसेनेचा कित्ता कोल्हापूरजिल्हा परिषदेमध्ये गिरवण्याचे काम अतिशय प्रामाणिकपणे सुरू आहे. या खेळामध्ये सत्तारूढ भाजपचेच मोहरे आघाडीवर असल्याने ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ अशी पदाधिकाऱ्यांची अवस्था झालीआहे.

जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्तारूढांमध्ये किती समन्वय आहे, याचे प्रत्यंतर दिसून आले.मुळात जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन करताना विळ्या-भोपळ्याचे सख्य असलेली मंडळी एकत्र आणली गेली. महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका अध्यक्ष होणार यासाठी पक्षभेद विसरून काहीजणांनी पाठिंबा दिला; तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा ‘शब्द’ मानण्याचे अनेक फायदे असू शकतात, याचा विचार करूनही काहीजणांनी सहकार्याचा हात दिला.

भाजप मित्रपक्षांची सत्ता येऊन आता सव्वा वर्ष झाले आहे. स्वाभिमानी आणि प्रकाश आवाडे गट यांच्या अंतर्गत समझोत्यानुसार महिला आणि बालकल्याण समितीचे सभापतिपद शुभांगी शिंदे यांच्याकडून वंदना मगदूम यांच्याकडे आले आहे. मात्र, उरलेला पदाधिकारी बदल थंडावला आहे; त्यामुळे स्वप्नभंग झालेले आक्रमक होत आहेत.

सुरुवातीपासून विरोधकांनी आपली भूमिका चांगल्या पद्धतीने वठविण्याची सुरुवात केली. मात्र, विरोधकांच्या या नाट्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधाºयांनीच प्रमुख भूमिका वठवायला सुरुवात केली आहे. यामध्ये अरुण इंगवले आणि विजय भोजे हे तर नेहमी डॅशिंग भूमिकेतच असतात. भाजपचे गटनेते असलेल्या इंगवले यांनी मंगळवारच्या सभेत अधिकाºयांचा एकेरी विचारणा करत आणि ‘अहो, अंबरीश घाटगे, शिक्षण आणि अर्थ सभापती’ असा जावयांचा उल्लेख करत आपला इरादा स्पष्ट केला आहे; तर पक्षप्रतोद म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे, त्या विजय भोजे यांनीच तडाखेबंद विरोधी बॅटिंग केली आहे. राहुल आवाडे आणि प्रसाद खोबरे यांचा वाद नळावरील भांडणासारखा होता.

अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी काही निर्णायक क्षणी संबंधितांना सुनावण्याची आणि कामकाज पुढे नेण्याची भूमिका घेतली असली तर अंबरीश घाटगे हेच सभा हाताळत असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांमध्ये दिसून येत आहे. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील अधेमधे बोलण्याचा प्रयत्न करतात. बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर केवळ शांत राहून पाहणे पसंत करतात आणि समाजकल्याण समिती सभापती विशांत महापुरे फारसे बोलून कुणाला अंगावर घेत नाहीत. यामध्ये अधिकाºयांची मात्र पुरती कोंडी होत असल्याचे दिसून आले. सीईओ अमन मित्तल नवीन आहेत. त्यांना भाषेची अडचण आहे. त्यामुळे ठाम भूमिका घेण्यासाठी अजून त्यांना वेळ द्यावा लागणार आहे.

जे दोघे सत्तेत आहेत तेच आपल्या एकमेकांविरोधी मागण्यांसाठी खालून अधिकाºयांचा पंचनामा करत असल्याचे या सभेमध्ये दिसून आले आहे. ज्या पद्धतीने पारदर्शी कारभाराच्या खालून गप्पा मारल्या गेल्या, त्याच पद्धतीने कोणत्याही प्रकरणामध्ये हस्तक्षेप न करता प्रत्येक विभागाचा लेखाजोखा काढायचा म्हटले तर सत्ताधारीसुद्धा काही प्रकरणांमध्ये अडचणीत येऊ शकतात. त्यामुळेच केवळ भाषणबाजी करण्यापेक्षा कारभार कसा नीट चालेल, शासनाच्या नियमांच्या अधीन राहून होईल आणि यासाठी कारभारी मंडळींनी स्वत:चाच अवाजवी हस्तक्षेप टाळून कारभार सुधारण्यासाठी वेळ दिला तर ते निश्चितच जिल्हा परिषदेसाठी हिताचे ठरणार आहे. अन्यथा हे स्वकियांकडूनच होणारे वस्त्रहरण सत्ताधाºयांना पाहत बसावे लागणार आहे.पाठिंब्यासाठी विरोधकांच्या टाळ्याज्या पद्धतीने या सभेमध्ये सत्तारूढ गटातील कारभाºयांनी हल्लाबोल केला ते पाहता विरोधकांनी काहीही न करता केवळ टाळ्या वाजवून इंगवले, भोजे, खोबरे यांना पाठिंबा देण्याची घेतलेली भूमिकाही पुरेशी होती. एवढेच काम या सर्वांनी विरोधकांसाठी शिल्लक ठेवले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद