शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

यंदा नवीन शालेय पोषण आहार योजना

By admin | Updated: April 26, 2017 23:33 IST

एक मे पासून सुरूवात : पंकजा मुंडे यांची मंडणगडमध्ये घोषणा

मंडणगड : राज्यात १ मेपासून शालेय पोषण आहाराची नवीन योजना सुरू केली जाणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंडणगड येथे केली. पोषण आहार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची भूमिका योग्य ठरविली आहे. त्यातील वैयक्तिक आरोपांचे खंडन करून न्यायालयाने आपल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले आहे. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मंडणगड शहरातील लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास पंकजा मुंडे यांनी बुधवारी भेट दिली. यावेळी दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पंकजा मुंडे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.यावेळी त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. जलयुक्त शिवार योजनेमुळे )शेतकऱ्यांच्या जीवनात बदल होत आहे. दुष्काळी परिस्थिती असलेल्या काही ठिकाणी पाणीसाठा वाढून अनेक ठिकाणी विक्रमी उत्पादन झाले आहे. नीती आयोगाने या योजनेचे कौतुक केले आहे. राजस्थानमध्ये याच धर्तीवर योजना राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामीण भागातील रस्ते हीच विकासाची लाईफलाईन असल्याने तीस हजार किलोमीटर रस्त्यांचा आराखडा बनविण्यात आला होता. त्यातील अडीच हजार किलोमीटर रस्त्यांचे काम एका वर्षात पूर्ण झाले आहे. राज्य शासनाच्या लोकप्रिय योजनांमध्ये जलयुक्त शिवारनंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा समावेश होतो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.पोषण आहार योजनेबाबत आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत राज्य सरकारने घेतलेली भूमिका सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविली आहे. त्यातील भ्रष्टाचाराच्या वैयक्तिक आरोपांचे न्यायालयाने खंडन करून आपल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे राज्यात १ मे २०१७ पासून पोषण आहाराची नवीन योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी महादेव जानकर व भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास दादा इदाते, प्रा. विजय कुलकर्णी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष थेराडे, सदस्य संतोष गोवळे, प्रमोद जाधव, उपसभापती स्नेहल सकपाळ, पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर, प्रणाली चिले, रासप जिल्हाध्यक्ष अशोक पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम इदाते यांनी केले. (प्रतिनिधी)गोपीनाथ मुंडे यांचे संस्कारलोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या शिकवणीनुसार आपण राजकारणात वाटचाल करीत असल्याचे पंकजा मुंडे यांनी आवर्जून सांगितले. समाजातील वंचित व शोषित घटकांसाठी काम करीत सर्वसामान्यांची शाबासकी हीच आपली प्रतिमा अखंडपणे जगत राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.ओबीसी मंत्रालयाने दिशा बदलेलराज्य सरकारने इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील राजकारणाची दिशा बदलली आहे. समाजातील वंचित व शोषित घटकांसाठी काम करण्याची भूमिका असलेल्या शासनाने जात, धर्म अशा सर्व भेदांना तिलांजली दिली आहे. विरोधकांच्या टीकेनंतरही हे सरकार सकारात्मक काम करीत असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.