शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

न्याय देण्यासाठीच शिवपुत्र छत्रपती राजाराम चरित्र ग्रंथाचे लेखन : जयसिंगराव पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 17:16 IST

कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्युनंतर ११ वर्षे मराठ्यांचे राज्य राखण्यासाठी लढा देणाºया राजाराम महाराजांना न्याय देण्यासाठीच शिवपुत्र छत्रपती राजाराम या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन बुधवारी ३0 आॅगस्ट रोजी होणार आहे. ग्रंथलेखक डॉ. जयसिंगराव पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ठळक मुद्देजयसिंगराव पवार यांची माहितीश्री शाहू छत्रपती, राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची उपस्थिती

कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्युनंतर ११ वर्षे मराठ्यांचे राज्य राखण्यासाठी लढा देणाºया राजाराम महाराजांना न्याय देण्यासाठीच शिवपुत्र छत्रपती राजाराम या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन बुधवारी ३0 आॅगस्ट रोजी होणार आहे. ग्रंथलेखक डॉ. जयसिंगराव पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

श्री शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ६ वाजता होणाºया या समारंभासाठी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या ग्रंथाबाबत माहिती देताना डॉ. पवार म्हणाले, शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेब बादशहा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी उत्तरेतून धावत आला. यानंतर संभाजीराजे, राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांनी २७ वर्षे लढा दिला. यातील संभाजीराजेंची दखल इतिहासकारांनी घेतली. मात्र राजाराम महाराज आणि ताराराणी यांना उपेक्षित ठेवले.

दिल्ली जिंकण्याची महत्वाकांक्षा ठेवणाºया राजाराम महाराजांना न्याय देण्यासाठी हा गं्रथ लिहण्यात आला आहे. खानदेश बागलाणपासून जिंजी तंजावरपर्यंतच्या विस्तीर्ण प्रदेशात त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाच्या फौजांश्ी लढाया केल्या आणि नेत्रदीपक विजय मिळवले. संभाजीराजांच्या हत्येनंतर दूर तामिळनाडूत जिंजी किल्ल्यावर मराठ्यांची राजधानी स्थापन करून हा किल्ला ८ वर्षे लढवला.

अतिशय संकटाच्या काळामध्ये हिंमत न हारता दिल्ली जिंकण्याची महत्वाकांक्षा बाळगणाºया राजाराम महाराजांच्या या चरित्रासाठी मराठीबरोबरच फारसी, इंग्रजी, फें्रच व पोर्तुगीज कागदपत्रांचा व ग्रंथांचा आधार घेण्यात आला आहे. १00 हून अधिक चित्रे, छायाचित्रे, नकाशे याचा या ग्रंथामध्ये समावेश करण्यात आला असल्याचे डॉ. जयसिंगराव पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे विश्वस्त सुरेश शिप्पूरकर यांनी स्वागत केले. तर डॉ. मंजुश्री पवार यांनी आभार मानले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. विजय शिंदे, डॉ. प्रकाश शिंदे, पृथ्वीराज पवार, पंडित कंदले उपस्थित होते.