शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक चिमणी दिवस : चिमण्यांची चिवचिवाट कमी झाल्याची समजूत चुकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:21 IST

कोल्हापूर : नेहमीचा अधिवास सोडून चिमण्यांनी सुरक्षित आणि अन्न मिळेल अशा ठिकाणी आपला मुक्काम हलविला आहे, असे मत चिमण्यांच्या ...

कोल्हापूर : नेहमीचा अधिवास सोडून चिमण्यांनी सुरक्षित आणि अन्न मिळेल अशा ठिकाणी आपला मुक्काम हलविला आहे, असे मत चिमण्यांच्या अभ्यासकांनी मांडले आहे.

‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून २० मार्च हा दिवस ओळखला जातो. देशभरातील सुमारे १५,५०० पक्षी निरीक्षकांनी नोंदविलेल्या नोंदीवरून. ‘स्टेट ऑफ इंडियाज बर्ड २०२०’ हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे या अहवालात चिमण्या वाढल्याची नोंद असून त्यात शहरी भागात चिमण्या कमी झाल्याचे या निरीक्षणावरून म्हणता येईल, असे मत पक्षी निरीक्षकांचे आहे.

चिमण्यांची चिवचिव कानी पडल्याशिवाय खेड्यातीलच नव्हे तर शहरातील सकाळही कधी उजाडलेली नाही. मात्र, चिमण्यांचा चिवचिवाट शहरात कमी ऐकू येऊ लागला असला तरी ग्रामीण भागात चिमण्यांची संख्या कमी स्थिरच आहे. गेल्या २५ वर्षांत नोंदवलेल्या निरीक्षणांनुसार चिमण्यांनी फक्त आपला अधिवास बदललेला आहे. शहरातील चिमण्यांची संख्या कमी झाली असली तरी गेल्या २५ वर्षांत नोंदवलेल्या निरीक्षणांनुसार त्यांनी फक्त आपला अधिवास बदललेला आहे, असे मत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहायक संचालक डॉ. गिरीश जठार यांनी व्यक्त केले आहे.

अन्न न मिळणे, वाढते प्रदूषण यांबरोबरच शेतात पिकांसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्यामुळे चिमण्या मोठ्या संख्येने कमी होत आहेत, हे जरी खरे असले तरी तुलनेने ग्रामीण भागात चिमण्यांनी आपले वास्तव्य सोडलेले नाही.

शहरात अन्न मिळत नसल्याने ग्रामीण भागात चिमण्यांनी आपला मोर्चा वळविला आहे. असे असले तरी उसाच्या एक पीकपद्धतीमुळे ज्वारी, वरी, बाजरी, कुटकी, गहू यांसारखी पिके कमी नामशेष होत आहेत. त्यामुळे चिमण्यांना अन्न मिळत नाही. पेरू, जांभूळ, अळू, तोरणे, धामणी, आसुळी, चिकुणी, निळुंबी, म्हेके, नेर्ली, करवंदे, बोर, चिंचा यांशिवाय बांधावरील चिवे, बांबू, बाभूळ, धावडा, भरूळा यांसारखी प्रादेशिक जंगली फळांची झाडे चिमण्यांच्या अन्नाचा नैसर्गिक स्रोत आहे. तो वाढविला पाहिजे, असे मत पक्षीप्रेमी नितीनकुमार काजवे यांनी व्यक्त केले आहे.

कोट

वाढत्या शहरीकरणामुळेही चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विशेषत: शहरांमध्ये मोबाईल टॉवर्समधून होणारे विद्युत चुंबकीय उत्सर्जन, मोबाईलमधील लहरी, सिमेंटच्या घरबांधणीमुळे घरट्यांना जागाच उरलेली नाही. मात्र, त्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागात वळवला आहे. चिमण्यांची संख्या स्थिर आहे, ती कमी निश्चितच झालेली नाही.

- डॉ. गिरीश जठार

सहाय्यक संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई

--------------------------

१९०३२०२१-कोल-हाउस स्पॅरो (छाया : रजत भार्गव)

19032021-kol-house sparrow19032021-kol-house sparrow