शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

जागतिक पर्यावरण दिन विशेष : मला वाचवा...पंचगंगेची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 11:35 IST

जागतिक पर्यावरण दिन आज, मंगळवारी सर्वत्र साजरा होत असता कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी आता प्रदूषणाबरोबरच कचऱ्याच्या विळख्यात अडकली आहे. नदीच्या स्वच्छतेकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नदीचे आरोग्य बिघडत असून नागरिकांच्या आरोग्याबरोबरच निसर्गसाखळीतील महत्त्वाचा दुवा असणारे जलचर प्राणी मृत्युमुखी पडत आहेत.

ठळक मुद्देजागतिक पर्यावरण दिन विशेष : मला वाचवा...पंचगंगेची आर्त हाक

विजय दळवीकोल्हापूर : जागतिक पर्यावरण दिन आज, मंगळवारी सर्वत्र साजरा होत असता कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी आता प्रदूषणाबरोबरच कचऱ्याच्या विळख्यात अडकली आहे.नदीच्या स्वच्छतेकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नदीचे आरोग्य बिघडत असून नागरिकांच्या आरोग्याबरोबरच निसर्गसाखळीतील महत्त्वाचा दुवा असणारे जलचर प्राणी मृत्युमुखी पडत आहेत.पंचगंगा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचबरोबर वाहून येणाऱ्या कचऱ्याचाही विळखा नदीसभोवती पडला आहे. अशावेळी आपल्या जीवनदायिनीच्या स्वच्छतेबाबत व शुद्धतेबाबत सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.लोकप्रतिनिधींनी जरी स्वच्छता व सुशोभीकरणाच्या घोषणा केल्या असल्या तरी त्या अमलात येण्यासाठी कालावधी लागेल. सध्या नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे नदीतील सगळा गाळ व कचरा काठावर आला आहे. त्याची उचल करून साफसफाई त्वरित करणे गरजेचे आहे.अमर्याद घनकचरा, प्लास्टिक, जनावरे व कपडे धुणाऱ्यांची वाढती संख्या, आदींमुळे पंचगंगा नदीपात्र असह्य दुर्गंधीने ग्रासले आहे. गाळातील काचा व इतर घातक वस्तू पोहणाºयांना इजा पोहोचवत आहेत. त्यामुळे नियमित पोहणाऱ्यांची संख्याही रोडावली आहे.

अनेकांना पोहल्यानंतर अंगाला खाज सुटणे, डोळे लाल होणे, दात आंबणे आदींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यंदाच्या मे महिन्याच्या सुटीत अनेक नवशिक्या जलतरणपटूंना नदीत डुंबण्याचा आनंद लुटता आला नाही. 

कचरा सफाई करावीमुलांना पोहण्यासाठी नेल्यावर नदीतील गाळात पाय अडकणे, पायात काचा घुसून लहान मुलांना इजा होत आहेत. त्यामुळे नदीकाठावरील गाळ व कचरा प्रशासनाने त्वरित हटवावा.- रवी चिले (मेस्त्री)

 

पर्यटकांतून चुकीचा संदेशराज्यासह परराज्यांतील पर्यटक विसावा आणि स्नानाकरिता पंचगंगेवर येत असतात. मात्र, त्यांनाही नदीच्या पाण्यातील दुर्गंधीला सामोरे जावे लागते. अनेकांनी अंगाला खाज सुटल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे एकूणच कोल्हापूर व पंचगंगा नदीकाठ अस्वच्छ असल्याचा संदेश राज्यभर जात आहे.अधिक महिन्यानिमित्त भाविकांची स्नानासाठी गर्दी होत आहे. मात्र, पाण्याची परिस्थिती पाहिल्यानंतर अनेकजण स्नानाविनाच परतत आहेत. याबाबत अनेकांनी उघडपणे जिल्हा प्रशासन, महापालिका व आरोग्य खाते यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. 

 

 

 

टॅग्स :environmentवातावरणkolhapurकोल्हापूरriverनदी