शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

जागतिक पर्यावरण दिन विशेष : मला वाचवा...पंचगंगेची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 11:35 IST

जागतिक पर्यावरण दिन आज, मंगळवारी सर्वत्र साजरा होत असता कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी आता प्रदूषणाबरोबरच कचऱ्याच्या विळख्यात अडकली आहे. नदीच्या स्वच्छतेकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नदीचे आरोग्य बिघडत असून नागरिकांच्या आरोग्याबरोबरच निसर्गसाखळीतील महत्त्वाचा दुवा असणारे जलचर प्राणी मृत्युमुखी पडत आहेत.

ठळक मुद्देजागतिक पर्यावरण दिन विशेष : मला वाचवा...पंचगंगेची आर्त हाक

विजय दळवीकोल्हापूर : जागतिक पर्यावरण दिन आज, मंगळवारी सर्वत्र साजरा होत असता कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी आता प्रदूषणाबरोबरच कचऱ्याच्या विळख्यात अडकली आहे.नदीच्या स्वच्छतेकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नदीचे आरोग्य बिघडत असून नागरिकांच्या आरोग्याबरोबरच निसर्गसाखळीतील महत्त्वाचा दुवा असणारे जलचर प्राणी मृत्युमुखी पडत आहेत.पंचगंगा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचबरोबर वाहून येणाऱ्या कचऱ्याचाही विळखा नदीसभोवती पडला आहे. अशावेळी आपल्या जीवनदायिनीच्या स्वच्छतेबाबत व शुद्धतेबाबत सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.लोकप्रतिनिधींनी जरी स्वच्छता व सुशोभीकरणाच्या घोषणा केल्या असल्या तरी त्या अमलात येण्यासाठी कालावधी लागेल. सध्या नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे नदीतील सगळा गाळ व कचरा काठावर आला आहे. त्याची उचल करून साफसफाई त्वरित करणे गरजेचे आहे.अमर्याद घनकचरा, प्लास्टिक, जनावरे व कपडे धुणाऱ्यांची वाढती संख्या, आदींमुळे पंचगंगा नदीपात्र असह्य दुर्गंधीने ग्रासले आहे. गाळातील काचा व इतर घातक वस्तू पोहणाºयांना इजा पोहोचवत आहेत. त्यामुळे नियमित पोहणाऱ्यांची संख्याही रोडावली आहे.

अनेकांना पोहल्यानंतर अंगाला खाज सुटणे, डोळे लाल होणे, दात आंबणे आदींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यंदाच्या मे महिन्याच्या सुटीत अनेक नवशिक्या जलतरणपटूंना नदीत डुंबण्याचा आनंद लुटता आला नाही. 

कचरा सफाई करावीमुलांना पोहण्यासाठी नेल्यावर नदीतील गाळात पाय अडकणे, पायात काचा घुसून लहान मुलांना इजा होत आहेत. त्यामुळे नदीकाठावरील गाळ व कचरा प्रशासनाने त्वरित हटवावा.- रवी चिले (मेस्त्री)

 

पर्यटकांतून चुकीचा संदेशराज्यासह परराज्यांतील पर्यटक विसावा आणि स्नानाकरिता पंचगंगेवर येत असतात. मात्र, त्यांनाही नदीच्या पाण्यातील दुर्गंधीला सामोरे जावे लागते. अनेकांनी अंगाला खाज सुटल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे एकूणच कोल्हापूर व पंचगंगा नदीकाठ अस्वच्छ असल्याचा संदेश राज्यभर जात आहे.अधिक महिन्यानिमित्त भाविकांची स्नानासाठी गर्दी होत आहे. मात्र, पाण्याची परिस्थिती पाहिल्यानंतर अनेकजण स्नानाविनाच परतत आहेत. याबाबत अनेकांनी उघडपणे जिल्हा प्रशासन, महापालिका व आरोग्य खाते यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. 

 

 

 

टॅग्स :environmentवातावरणkolhapurकोल्हापूरriverनदी