शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कोल्हापूर जिल्ह्यातील सहा पाझर तलावांचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 15:04 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : भूसंपादनाअभावी जिल्ह्यातील सहा पाझर तलावांचे काम रखडले असून, यामध्ये आठ-नऊ वर्षांपूर्वीच्या प्रकल्पांचा समावेश आहे. जिल्हा ...

ठळक मुद्देभूसंपादन न झाल्याचा परिणाम, विरोधामुळे चार तलावांचे काम रद्द

समीर देशपांडेकोल्हापूर : भूसंपादनाअभावी जिल्ह्यातील सहा पाझर तलावांचे काम रखडले असून, यामध्ये आठ-नऊ वर्षांपूर्वीच्या प्रकल्पांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो आणि जलसंधारण विभागाच्या वतीने हे पाझर तलावांचे काम केले जाते. भूसंपादनाच्या विरोधामुळे चार तलावांचे प्रस्तावही रद्द करण्यात आले आहेत.

चंदगड तालुक्यातील कडलगे (बु.) येथे २0१२/१३ ला ७४ लाख रुपये खर्चाचा पाझर तलाव मंजूर करण्यात आला होता. ३0 हेक्टर क्षेत्रासाठी या पाण्याचा उपयोग होणार असून, यावर मार्च १९ अखेर ३३ लाख रुपये खर्च झाले आहेत; मात्र एका शेतकऱ्याने तीव्र विरोध केल्याने येथील काम बंद ठेवण्यात आले आहे. ही जागा अन्य व्यक्तीला विकली गेल्याने हे काम निम्म्या खर्चानंतर थांबले आहे.याच तालुक्यातील होसुर येथे २0१३/१४ साली १ कोटी ८४ लाख रुपये खर्चून पाझर तलावाचे काम मंजूर करण्यात आले. यातून ३0 हेक्टर क्षेत्राला पाण्याचा लाभ होणार आहे. येथील जलरोधकाचे काम पूर्ण झाले आहे; परंतु येथेही एका शेतकºयाच्या विरोधामुळे न्यायालयात केस सुरू आहे. चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथे २0१४/१५ साली मंजूर झालेल्या सुमारे दोन कोटी रुपयांच्या या पाझर तलावासाठी भूसंपादन प्रगतीमध्ये असून, सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

कागल तालुक्यातील अवचितवाडी येथे २0१४/१५ साली पाझर तलाव मंजूर करण्यात आला; त्यासाठी ७९ लाख रुपये मंजूरही करण्यात आले होते; परंतु स्थानिकांचा विरोध असल्याने हे काम रद्द करण्याचा निर्णय जलसंधारण विभागाने घेतला आहे.आजरा तालुक्यातील मोरेवाडी येथील पाझर तलावाचे काम तर सन २0१0/११ मध्ये मंजूर झाले होते. एक कोटी ८२ लाखांचे हे काम असून, याचा फायदा ३१ हेक्टर क्षेत्राला होणार आहे. पावणेचार हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन यासाठी आवश्यक असून, सुधारित अंदाजपत्रकही सादर करण्यात आले आहे.कागल तालुक्यातील तमनाकवाडा येथील पाझर तलाव २00५/0६ मध्ये मंजूर करण्यात आला होता. ५७ हेक्टरला या तलावाच्या माध्यमातून मिळणार असून, तीन कोटी ५३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या पाझर तलावाचे ७0 टक्के काम झाले असून, अजून ते पूर्ण झालेले नाही.रद्द झालेले तलावकागल तालुक्यातील दौलतवाडी येथे २00७/0८ साली ४७ हेक्टरला पाणीपुरवठा होईल, असा ६१ लाख रुपये खर्चाचा पाझर तलाव मंजूर करण्यात आला होता. याच तालुक्यातील बोळावी येथे ४८ हेक्टरसाठीचा ४0 लाखांचा पाझर तलाव २00६/0७ साली मंजूर करण्यात आला होता. पन्हाळा तालुक्यातील आवळी आणि राधानगरी तालुक्यातील ठिकपूर्ली येथेही अनुक्रमे ५२ आणि ७४ लाख रुपये खर्चाचे तलाव मंजूर करण्यात आले होते; मात्र भूसंपादनाला स्थानिकांचा विरोध असल्याने या चारही तलावांचे काम रद्द करण्यात आले आहे.

१८९४ सालच्या मूळ भूसंपादन कायद्यामध्ये १९८४ मध्ये बदल करण्यात आले. त्यानंतर त्यातील त्रुटी दूर करून २0१३ साली केंद्र शासनाचा नवा भूसंपादन कायदा आला. त्याची मार्गदर्शक तत्वे नंतर आल्याने २0१७ पासून नव्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. भूसंपादनाला स्थानिकांचा विरोध यामुळे काही प्रकल्प रद्द करावे लागले असून, उर्वरित प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.यशवंत थोरातजिल्हा जलसंधारण अधिकारी, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater shortageपाणीकपात