शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

Kolhapur: गांधीनगर पाणी योजनेचे काम ठप्प, ३४३ कोटींची १३ गावांसाठी योजना

By भीमगोंड देसाई | Updated: November 27, 2023 13:47 IST

ठेकेदारास दंडाची कारवाई प्रस्तावित, केवळ २० टक्क काम पूर्ण

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : तेरा गावच्या गांधीनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाला सध्या ब्रेक लागला आहे. तब्बल ३४३ कोटी ६८ लाख रुपयांच्या योजनेचे काम हैदराबाद येथील कंपनीकडून अपेक्षित गतीने होत नसल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्याच्यावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे. काम सुरू होऊन नोव्हेंबरअखेर एक वर्ष होत आहे. आतापर्यंत केवळ २० टक्के काम झाले आहे. तेरा गावात पाण्याच्या टाकी बांधण्यासाठी आणि पाइपलाइन बांधण्यासाठी खड्डे पडले आहेत. रहिवासी ठिकाणी खड्डे असल्याने ते धोकादायक बनले आहेत.शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन २०५४ पर्यंतच्या लोकसंख्येेला पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल, अशी योजना मंजूर आहे. यासाठी माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान, योजनेचे काम नोव्हेंबर २०२२ पासून ठेकेदार कंपनी करीत आहे. खडीच्या गणपतीजवळ पाचगावसाठी टाकी बांधण्यासाठी मोठा खड्डा खणला आहे. मात्र, अजून येथे बांधकामही सुरू झालेले नाही. यांच्याजवळच मोरेवाडी गावासाठी पाण्याच्या टाकीचे कामही पन्नास टक्के पूर्ण होऊन थांबले आहे. अशाच प्रकार पाचगाव, मोरेवाडी, कळंबा अशा तेरा गावात पाण्याची टाकी, पाइपलाइनसाठी पावसाळ्यापूर्वी खोदाई करण्यात आली आहे; पण तिथे सध्या कोणतेही काम सुरू झालेले नाही. पावसाळ्यानंतर ठेकेदार कामासाठी फिरकलाच नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अपेक्षित गतीने काम होत नसल्याने पुरेशा प्रमाणत आणि स्वच्छ पाणी मिळण्यास विलंब होणार आहे. आता अस्तित्वात असलेल्या पाणी योजनेला प्रचंड गळीत आहे. सर्व भागात समान पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते.परिणामी, नवीन पाणी योजना शक्य तितकी लवकर पूर्ण व्हावी, यासाठी तेरा गावचे सरपंच, उपसरपंच धडपडत आहेत. ठेकेदार कंपनीकडे पाठपुरावा करीत आहेत. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या अधिकाऱ्यांना शनिवारी सरपंचांच्या शिष्टमंडळाने जाब विचारला.

दृष्टिक्षेपातील योजना

  • खर्च : ३४३ कोटी ६८ लाख ६१ हजार
  • पाण्याचा स्रोत : दूधगंगा नदी
  • प्रशासकीय मंजुरी : १७ जून २०२२
  • काम कार्यारंभ आदेश : ७ नोव्हेंबर २०२२
  • काम पूर्ण करण्याचा कालावधी : २७ महिने.

योजनेतील गावे : गांधीनगर, उचगाव, पाचगाव, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, कणेरी, गडमुडशिंगी, सरनोबतवाडी, वळीवडे, मोरेवाडी, कंदलगाव, कळंबे तर्फ ठाणे, न्यू वाडदे.

गेले कित्येक दिवस ठेकेदार कंपनीकडून काम संथ गतीने होत आहे. सध्या अनेक ठिकाणी काम बंद आहे. तेरा गावांतील ग्रामस्थांना मुबलक, स्वच्छ पाणी मिळण्यासाठी गतीने काम करून योजना पूर्ण करावी. - संग्राम पाटील, माजी सरपंच, पाचगाव.

योजनेचे काम आतापर्यंत ४० टक्क्यांपर्यंत होणे अपेक्षित होते; पण केवळ २५ टक्के काम झाले आहे. म्हणून कंपनीवर दंडाची कारवाई प्रस्तावित केली आहे. - अमित पाथरवट, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी