शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

जिल्ह्यात ऊन, पावसाचा खेळ, अधून-मधून जोरदार सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 18:23 IST

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर ऊन-पावसाचा खेळ पाहावयास मिळाला. अधून-मधून जोरदार सरी कोसळायच्या, त्यानंतर ऊन लगेचच ऊन पडायचे. गगनबावड्यात मात्र पावसाची रिपरिप राहिली. धरणातून विसर्गही कमी झाला असून नद्यांची पातळी कमी होऊ लागली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ऊन, पावसाचा खेळ, अधून-मधून जोरदार सरी गगनबावड्यात मात्र रिपरिप कायम

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर ऊन-पावसाचा खेळ पाहावयास मिळाला. अधून-मधून जोरदार सरी कोसळायच्या, त्यानंतर ऊन लगेचच ऊन पडायचे. गगनबावड्यात मात्र पावसाची रिपरिप राहिली. धरणातून विसर्गही कमी झाला असून नद्यांची पातळी कमी होऊ लागली आहे.सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्यात उघडझाप पाहायला मिळाली. सळसळ सरी येतात आणि क्षणात गायब होऊन पुन्हा ऊन पडते, याचा अनुभव गेली दोन दिवस कोल्हापूरकरांना येत आहे. गगनबावडा व आजरा तालुकावगळता इतर तालुक्यांत ऊन-पावसाचा खेळच अनुभवयास आला. गगनबावड्यात मात्र दिवसभर रिपरिप राहिली.धरणक्षेत्रातही जोर कमी झाला असून विसर्ग कमी झाला आहे. राधानगरी धरणाच्या सांडव्यातून १४२८ तर वीजनिर्मितीसाठी १४०० घनफूट विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून प्रतिसेकंद ७७२६ तर दूधगंगेतून १८०० घनफूट विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पातळी कमी होत असून दिवसभरात पंचगंगा नदीची पातळी दोन फुटांनी कमी झाली. सध्या ३०.२ फुटांवर पातळी असून अद्याप २२ बंधारे पाण्याखाली आहेत. चार राज्य व आठ प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे.दरम्यान, सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १४.८५ मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ४९.५० मिलीमीटर झाला. चार खासगी मालमत्तांची पडझड होऊन ८० हजारांचे नुकसान झाले आहे.धरणातील पाणीसाठा, टीएमसीमध्ये असा -राधानगरी (८.३५), वारणा (३२.३२), दूधगंगा (२४.६६), तुळशी (३.३४), कासारी (२.६६), कडवी (२.५२), कुंभी (२.५८), पाटगाव (३.७२). 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर