शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

महिलांना उद्योगनिर्मितीत स्वातंत्र्य हवे : श्रीनिवास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:48 IST

महिलांमध्ये विविध स्वरूपांतील काम करण्याची मानसिकता असते. ही मानसिकता महिला सबलीकरणाची प्रक्रिया पूर्ण करते; त्यामुळे महिलांना आचार, विचार व्यक्त करणे, उद्योगनिर्मितीबाबत स्वातंत्र्य

ठळक मुद्देताराराणी विद्यापीठातर्फे नीलिमा मिश्रा ‘भद्रकाली ताराराणी’ने सन्मानित

कोल्हापूर : महिलांमध्ये विविध स्वरूपांतील काम करण्याची मानसिकता असते. ही मानसिकता महिला सबलीकरणाची प्रक्रिया पूर्ण करते; त्यामुळे महिलांना आचार, विचार व्यक्त करणे, उद्योगनिर्मितीबाबत स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी गुरुवारी येथे केले.

येथील ताराराणी विद्यापीठातर्फे डॉ. व्ही. टी. पाटील तथा काकाजी यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाच्या डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनमधील या कार्यक्रमात बहादरपूर (जळगाव) येथील सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा मिश्रा यांना माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ‘भद्रकाली ताराराणी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, ५१ हजार रुपयांचा धनादेश, शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, दुष्काळी भागातील ज्या महिला घरातून बाहेर पडू शकत नव्हत्या, त्यांना स्वत:च्या पायावर उभा करण्याचे महत्त्वपूर्ण काम नीलिमा यांनी केले आहे. वयाच्या १३ व्या वर्षापासून त्यांनी कष्टातून सामाजिक कार्य सुरू केले. त्यांनी महिला, शेतकऱ्यांना ताकद दिली. बचत गटातून महिलांना सक्षम करून राष्ट्रनिर्मितीत त्यांनी मोठे योगदान दिले आहे. दुष्काळी भागातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासह बचत गटाच्या माध्यमातून त्यांना वैचारिक, आर्थिक स्थैर्य देणाºया नीलिमा यांना प्रदान केलेला पुरस्कार महिला सबलीकरणाचा सन्मान आहे.

नीलिमा मिश्रा म्हणाल्या, ताराराणी यांचे नाव उच्चारताच रक्त सळसळते, लढाई अजून बाकी असल्यासारखे वाटते. त्यांच्या नावाच्या पुरस्काराने आज झालेला सन्मान हा केवळ माझा नव्हे, तर ग्रामीण भागात राबणाºया असंख्य ताराराणींचा आहे. कष्टकरी, गरजू लोकांसाठी काम करण्याचा संस्कार आई-वडिलांकडून मिळाला. समाजातील अनेक प्रश्न पाहून ते सोडविण्यासाठी काम करण्याची संवेदना निर्माण झाली. त्यातून सामाजिक कार्य सुरू केले.

ताराराणी विद्यापीठाचे उपाध्यक्ष अशोक पर्वते, एस. एन. पवार, प्रकाश हिलगे, सचिव प्राजक्त पाटील, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, डॉ. डी. आर. मोरे, कांचन पाटील, अस्मिता पाटील, सी. आर. गोडसे, आदी यावेळी उपस्थित होते. विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यातून त्यांनी विद्यापीठ आणि या पुरस्काराच्या परंपरेची माहिती दिली. डॉ. सुजय पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय, एस. डी. चव्हाण यांनी गौरवपत्राचे वाचन केले. पी. आर. मंडलिक यांनी आभार मानले.शेतकºयांना योग्य हमीभाव मिळायला हवाया पुरस्कार वितरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या मिश्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यामध्ये मिश्रा म्हणाल्या, शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी कर्जमाफी करणे हा अंतिम उपाय नाही. आत्महत्या थांबविण्याकरिता शेतीमालाला योग्य हमीभाव मिळायला हवा. त्यांच्या शेतीमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून द्यायला हवी.

बहादरपूर येथे भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञाननिकेतनद्वारे आम्ही चार कोटींची अर्थसाहाय्य योजना शेतकºयांसाठी राबविली आहे. त्याअंतर्गत दूध संकलन, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि विक्रीतून ग्रामविकासाचे पाऊल टाकले आहेत. दुष्काळी भागात महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामविकास साधण्यासाठी पावले टाकली आहेत. 

सामाजिक कार्य दर्शविणारे व्यासपीठया कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नीलिमा मिश्रा यांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली. त्यामध्ये आरोग्यपूर्ण गाव, सक्षम बचतगट, गोधडी प्रकल्प, आदींची मांडणी केली होती.

 

टॅग्स :Sangliसांगली