शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कोल्हापूर हद्दवाढीसाठी सर्वपक्षीय महिलाही सरसावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 14:22 IST

शिवाजी पेठेत मेळावा : लढा यशस्वी करण्याचा निर्धार

कोल्हापूर : एखाद्या लढ्यात महिला सहभागी होतात, तेव्हा तो यशस्वी होतो असा अनुभव आहे. आपण साऱ्याजणी कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे म्हणून सुरू असलेल्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा लढा यशस्वी करूया, असा निर्धार मंगळवारी शिवाजी पेठेत झालेल्या सर्वपक्षीय महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आला.शिवाजी तरुण मंडळाच्या कार्यालयात हा मेळावा पार पडला. यावेळी विविध राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या, माजी नगरसेविका, माजी महापौर सहभागी झाल्या होत्या. कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणे आवश्यक असल्याने या लढ्यात महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.प्रारंभी भाजपच्या गायत्री राऊत यांनी शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न काय आहे, तो कधीपासून चर्चेत आहे, राज्यकर्त्यांची भूमिका काय आहे, सरकारने त्याला कशी बगल दिली आहे यासंबंधीचा ऊहापोह केला. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या जयश्री जाधव यांनी, शहराची हद्दवाढ झाली नसल्याने शहराचा विकास करण्यावर मर्यादा आल्याचे सांगितले.माजी महापौर सई खराडे यांनी हद्दवाढीचा प्रश्न अनेक वर्षे सुटलेला नाही. २००६ मध्ये हद्दवाढ झाली असती. परंतु त्यावेळी काही जणांनी खो घातला. शहरात येणाऱ्या ग्रामीण जनतेवर महापालिकेने पुढील काही वर्षे प्राॅपर्टी टॅक्स लावायचा नाही, असेही ठरले होते, असे खराडे म्हणाल्या.महिला कार्यकर्त्यांनी या लढ्यात भाग घेतला पाहिजे, असे आवाहन माजी महापौर हसिना फरास यांनी केले. महिला एकत्र येतात तेव्हा लढा यशस्वी होतो, तेव्हा हद्दवाढीचा लढा यशस्वी करूया, असे माजी महापौर निलोफर आजरेकर म्हणाल्या.विद्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी वैशाली महाडिक, सिद्धी रांगणेकर, संगीता खाडे यांचीही भाषणे झाली. झहिदा मुजावर, माधुरी नकाते, माधवी गवंडी, श्वेता कुलकर्णी, रेखा आवळे, धनश्री तोडकर, पूजा भोर, मंगलताई साळोखे उपस्थित होत्या.राजकीय इच्छाशक्तीचा अभावराजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हद्दवाढीचा प्रश्न रेंगाळला आहे. म्हणूनच आता नेते मंडळींना हद्दवाढ का नको ते सांगा अशी विचारणा करण्याची वेळ आली असल्याचे पद्मजा तिवले यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomenमहिला