शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

महिलेला दुर्मीळ रक्तगटाचे रक्त देणारा ‘तो’ देवदूत केव्हाचा जन्मला होता...

By admin | Updated: April 5, 2017 23:33 IST

महिलेला दुर्मीळ रक्तगटाचे रक्त देणारा ‘तो’ देवदूत केव्हाचा जन्मला होता...

विहार तेंडुलकर ल्ल रत्नागिरीरक्तासाठी जिल्हा रुग्णालयात बेडवर मृत्यूशी झुंज देणारी अंजली हेळकर ही चिरेखाणीवर काम करणारी महिला आणि तिचा जीव वाचावा, यासाठी डॉक्टरांची चाललेली धावाधाव... रक्तदात्यांची डायरी, त्यांची माहिती मिळवण्याचे आटोकाट प्रयत्न आणि कितीतरी वेळानंतर एक आशेचा किरण दिसला, तासगाव सांगलीच्या विक्रम यादवच्या रुपाने! यादव यांनीही तत्काळ रक्त देण्यास होकार दर्शवला, एवढेच नव्हे तर पुढच्या काही तासातच ते रक्त देण्यासाठी रत्नागिरीत दाखल झाले. खरंतर बॉम्बे या दुर्मीळ रक्तगटाचा दाता सापडेल की नाही, अशीच शंका होती. त्यामुळे ज्यावेळी यादव यांच्या रुपाने देवदूतच धावल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली. रत्नागिरीला हा देवदूत कदाचित काल-परवा माहीत झाला असेल, पण अनेकांचे प्राण वाचवणारा हा देवदूत केव्हाचाच जन्मला आहे.विक्रम यादव, तासगाव येथील चितळे डेअरीवर एक सामान्य वाहनचालक...! पण, एखाद्या उच्चशिक्षितालाही लाजवेल, असं भान असणारा माणूस! दहा वर्षांपूर्वी त्याने रक्ताने तडफडणाऱ्या माणसांसाठी एक चळवळ उभारली, रक्तदात्यांना एकत्र आणण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना त्यांनी ‘रक्ताने’ जवळ आणले. पण, त्यांची महत्त्वाकांक्षा आभाळाएवढी होती. यादरम्यान, दुर्मीळ ‘बॉम्बे’ रक्तगटही आला आणि विक्रम यादव यांनी या रक्तगटाच्या रक्तदात्यांचाही शोध घेणे सुरु केले.रक्ताची गरज भासणाऱ्या रूग्णांसाठी त्यांनी रक्तदान शिबिरे भरवण्यास सुरुवात केली. विविध ठिकाणी अशी शिबिरे भरवल्यानंतर या शिबिरातूनच त्यांना ‘बॉम्बे’ या दुर्मीळ रक्तगटाचे रक्तदातेही सापडले. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या दप्तरी देशभरातील बॉम्बे रक्तगटाच्या केवळ १७९ रक्तदात्यांची नोंद आहे. मात्र, रक्तदान शिबिरामुळे यादव यांना आतापर्यंत या रक्तगटाच्या २३० रक्तदात्यांचा शोध लागला आहे. यादव हे केवळ एक रक्तदाते म्हणून समाजात काम करत नाहीत, तर ते प्रत्येक अडीनडीला स्वखर्चाने धावून जातात. रक्ताचा पैसा न करणारा हा महामानव वाहनचालक म्हणून मिळणाऱ्या पैशांवरच गुजराण करतो आणि मोफत रक्त पुरवतो.यादव यांनी बॉम्बे रक्तदात्यांसाठी संघटनाही स्थापन केली आहे, बॉम्बे ब्लड ग्रुप आॅर्गनायझर, महाराष्ट्र असे या संघटनेचे नाव! या संघटनेला आता तीन वर्षे झाली. यादव यांनी स्वत: ४२ जणांना रक्त पुरवले आहे.मित्राच्या मृत्यूतून इर्षा निर्माण झाली१९९४ साली आपल्या एका मित्राचा रक्ताअभावी मृत्यू झाला. त्यावेळीच मनाशी ठरवले होते की, रक्ताअभावी आपल्या डोळ्यादेखत तरी कोणाचा मृत्यू होता कामा नये. तेव्हापासून या कार्यात आपण पुढाकार घेतला, असे यादव यांनी सांगितले.आर्थिक मदतीसाठीही पुढाकारकेवळ रक्तामुळेच नव्हे; तर आर्थिक मदतीअभावी एखाद्या रुग्णाचा प्राण जात असेल तर त्यांच्याशी संपर्कात असलेल्या १५ हजार ७३० लोकांकडून ते प्रत्येकी १० रुपये घेतात आणि १ लाख ५७ हजार ३०० रुपयांची मदत रुग्णाकडे सुपूर्द करतात.देशव्यापी रक्तमोहीमअंगातील बळ आणि डोक्यातील हुशारी वेळीच ओळखली तर सामान्य माणसाच्या दंडात किती ताकद असते, याची चुणूक विक्रम यादव यांनी दाखवून दिली आहे. त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर १२ ग्रुप तयार केले आहेत. राज्यस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यातील रक्तदात्यांना त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपव्दारे एकत्र आणले आहे. १२ राज्यात कोठेही रक्ताची गरज भासली तरीही यादव रक्ताची सोय करू शकतात. १५ हजार ७३० रक्तदात्यांची त्यांच्याकडे यादी आहे.१९९४नंतर माझ्या एका मित्राचा रक्ताअभावीच मृत्यू झाला. त्यावेळी मला कळलं की, माझा रक्तगट बॉम्बे असून, तो दुर्मीळ आहे. मला डॉक्टरनी सांगितलं की, ज्यावेळी तुम्हाला रक्त लागेल, त्यावेळी या रक्तगटाची सोय कशी करणार? हा रक्तगट तर दुर्मीळ आहे! त्यामुळेच मी या रक्तदात्यांना एकत्र आणलं. आज आमच्या संपर्कात बॉम्बे पॉझिटिव्ह २३०, तर निगेटिव्ह गटाचे ३ रक्तदाते आहेत.-विक्रम यादव