शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

मानोलीच्या जंगलात महिलेचा खून, पत्र्याच्या पेटीत आढळला सडलेला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 12:51 IST

३० ते ३५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी वर्तविला.

आंबा : विशाळगड मार्गावरील मानोली धरणालगत टाकलेल्या पत्र्याच्या पेटीत अनोळखी महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. ३० ते ३५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी वर्तविला.

रस्त्यापासून पन्नास फुटांवरील नायकाचा सरवा येथे गुराख्यांना रविवारी सकाळी पत्र्याच्या पेटीत सडलेल्या मृतदेहाची दुर्गंधी आली. पेटीत काळ्या साडीत गुंडाळलेला मृतदेह पाहून मानोलीचे पोलीस पाटील दत्तात्रय गोमाडे यांनी शाहूवाडी पोलिसात नोंद केली.

येथून विशाळगड जंगल सुरू होते. पाच दिवसांपूर्वी हा खून झाला असावा. महिलेचा रंग गोरा असून, उजव्या हातावर गोंदण्याचे निशाण आहे. महिलेचा खून करून मृतदेह पेटीत कोंबून दोरखंडाने बांधून विशाळगड मार्गावरील निर्जन भागात टाकल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मृतदेह सडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली. गुराख्यांच्या ही पेटी दृष्टीस पडली. शाहूवाडी पोलिसांनी पंचनामा करून मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

विशाळगडाकडे पर्यटनास म्हणून येणारी मंडळी या जंगल भागातील दुर्गमतेचा फायदा घेऊन घातपात घडवून आणणाऱ्या घटना या भागास नवीन नाहीत. धरण परिसरात ही पेटी आढळल्याने ही घटना उघडकीस आली, अन्यथा अशा घटना उजेडातही येत नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी