शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भाजपविरोधात हवा; भडका उडवा : हसन मुश्रीफ यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:45 IST

राज्य व केंद्र सरकारविरोधात सध्या वातावरण तयार होत असून, त्याला हवा देऊन ‘भडका’ उडवून द्या, असे आवाहन राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. शनिवारी (दि. २७) कोल्हापुरात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेला ‘युवा आक्रोश मेळावा’

ठळक मुद्देशनिवारी युवा आक्रोश मेळावा; अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर : राज्य व केंद्र सरकारविरोधात सध्या वातावरण तयार होत असून, त्याला हवा देऊन ‘भडका’ उडवून द्या, असे आवाहन राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. शनिवारी (दि. २७) कोल्हापुरात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेला ‘युवा आक्रोश मेळावा’ यशस्वी करा, असेही त्यांनी सांगितले.

युवक राष्टवादीचा ‘युवा आक्रोश मेळावा’ शनिवारी दुपारी बारा वाजता शाहू सांस्कृतिक मंदिर, मार्केट यार्ड येथे होत आहे. त्याच्या तयारीसाठी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी जिल्हा पक्ष कार्यालयात झाली. यावेळी ‘युवक’चे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील उपस्थित होते.

आमदार मुश्रीफ म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. युवक, महिला, शेतकरी, उद्योजकांसह देशातील एकही घटक समाधानी नाही. सगळीकडे अस्वस्थता पसरली असून, उद्योगपतींचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटाबंदी करून सामान्य माणसाला वेठीस धरण्याचे काम या सरकारने केले आहे. भाजप सरकार घालविण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. युवकांनीसावध राहून सरकारविरोधातील वातावरणाला हवा देऊन त्याचा ‘भडका’ उडवावा.

संग्राम कोते-पाटील म्हणाले, राज्यातील तीस लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आता संघर्ष सुरू करा. ‘युवा आक्रोश’ मेळाव्यासाठी अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित राहणार असून, युवकांनी मोठ्या ताकदीने यावे. युवक राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी प्रास्ताविक केले. युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी स्वागत केले. निवेदिता माने, के. पी. पाटील, अनिल साळोखे, भैया माने, बाबासाहेब पाटील, बी. एन. पाटील, आर. के. पोवार, मधुकर जांभळे, संगीता खाडे, आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी आभार मानले.मेळावे नकोत, आता लढाराज्यभरात मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आक्रमक करण्याचे काम सुरू आहे; पण आता मेळावे नकोत. दृश्य स्वरूपातील लढा उभा करा, अशा सूचना खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याचे कोते-पाटील यांनी सांगितले. 

मुश्रीफ ‘महसूल’मंत्री व्हावेतजिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी आपल्या शैलीत उपस्थितांचे चिमटे काढले. प्रत्येक तालुक्यातून स्वतंत्रपणे २०० युवकांनी रॅलीने यावे. ‘भुदरगड’च्या मंडळींनाही ते दाखवावे, असे आवाहन करीत सगळ्यांनी खूणगाठ बांधून अजित पवार यांना मुख्यमंत्री करूया आणि हसन मुश्रीफ यांना दुसºया क्रमांकाचे ‘महसूल’ मंत्रिपद मिळण्यासाठी प्रयत्न करूया, असे पाटील सांगितले.

राष्टÑवादी कॉँग्रेसच्या युवा आक्रोश मेळाव्याच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत आमदार हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी निवेदिता माने, संग्राम कोते-पाटील, ए. वाय. पाटील, संगीता खाडे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफkolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवार