शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

मणिपूरला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 13:47 IST

मणिपूर येथे शिष्टमंडळाच्या माध्यमातून जाऊन परिस्थिती पाहणी करुन राष्ट्रपती यांनाही निवेदन देणार

इचलकरंजी : मणिपूरला शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट देऊन परिस्थितीची स्वत: पाहणी करणार आहे. राष्ट्रपतींनाही मणिपूर घटनेसंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. शहरात सुरू केलेले ‘७२ तास आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन’ची सांगता गुरुवारी केली. वीर पत्नींच्या हस्ते त्यांना सरबत देण्यात आले.मणिपूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि येथील माता-भगिनींच्या अब्रूचे रक्षण करण्यासाठी आपण देशवासीय असमर्थ ठरलो याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी ७२ तास अन्नत्याग केला होता. सुमनदेवी प्रकाश चव्हाण (शिरोळ), सुलभाताई रावसाहेब पाटील (टाकवडे), उज्ज्वला जोतिराम चौगुले (अतिग्रे) व सुनीता विजय मोरे (सांगली) या वीर पत्नींच्या हस्ते नारळ पाणी घेऊन त्यांनी आंदोलनाची सांगता केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.शेट्टी म्हणाले, एका निर्भया प्रकरणामुळे देशामध्ये सत्तांतरण घडले होते. याचा इतिहास राज्यकर्त्यांना नजरेआड करता येणार नाही. चंद्र-तारे असेपर्यंत कोणाला सत्ता करायची आहे, त्यांनी सत्ता करावी. मात्र, या देशातील महिला, निराधार, मुले यांच्या संरक्षणाची जबाबदारीही उचलावी. अशा घटना घडतील असतील, तर नागरिक गप्प बसणार नाहीत. आम्ही प्राणपणाने या घटनांचा विरोध करू.मी स्वत: मणिपूर येथे शिष्टमंडळाच्या माध्यमातून जाऊन परिस्थिती पाहणार आहे. राष्ट्रपती यांनाही निवेदन देणार आहे. यावेळी जालिंदर पाटील, जनार्दन पाटील, जयकुमार कोले, विकास चौगुले, हेमंत वणकुंद्रे, बसगोंडा बिराजदार, सतीश मगदूम, अण्णासाहेब शहापुरे, अविनाश कोरे, सचिन शिंदे, प्रसाद कुलकर्णी, बाळासाहेब पाटील, निवृत्ती शिरगुरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरManipur Violenceमणिपूर हिंसाचारRaju Shettyराजू शेट्टी