शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 13:47 IST

मणिपूर येथे शिष्टमंडळाच्या माध्यमातून जाऊन परिस्थिती पाहणी करुन राष्ट्रपती यांनाही निवेदन देणार

इचलकरंजी : मणिपूरला शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट देऊन परिस्थितीची स्वत: पाहणी करणार आहे. राष्ट्रपतींनाही मणिपूर घटनेसंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. शहरात सुरू केलेले ‘७२ तास आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन’ची सांगता गुरुवारी केली. वीर पत्नींच्या हस्ते त्यांना सरबत देण्यात आले.मणिपूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि येथील माता-भगिनींच्या अब्रूचे रक्षण करण्यासाठी आपण देशवासीय असमर्थ ठरलो याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी ७२ तास अन्नत्याग केला होता. सुमनदेवी प्रकाश चव्हाण (शिरोळ), सुलभाताई रावसाहेब पाटील (टाकवडे), उज्ज्वला जोतिराम चौगुले (अतिग्रे) व सुनीता विजय मोरे (सांगली) या वीर पत्नींच्या हस्ते नारळ पाणी घेऊन त्यांनी आंदोलनाची सांगता केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.शेट्टी म्हणाले, एका निर्भया प्रकरणामुळे देशामध्ये सत्तांतरण घडले होते. याचा इतिहास राज्यकर्त्यांना नजरेआड करता येणार नाही. चंद्र-तारे असेपर्यंत कोणाला सत्ता करायची आहे, त्यांनी सत्ता करावी. मात्र, या देशातील महिला, निराधार, मुले यांच्या संरक्षणाची जबाबदारीही उचलावी. अशा घटना घडतील असतील, तर नागरिक गप्प बसणार नाहीत. आम्ही प्राणपणाने या घटनांचा विरोध करू.मी स्वत: मणिपूर येथे शिष्टमंडळाच्या माध्यमातून जाऊन परिस्थिती पाहणार आहे. राष्ट्रपती यांनाही निवेदन देणार आहे. यावेळी जालिंदर पाटील, जनार्दन पाटील, जयकुमार कोले, विकास चौगुले, हेमंत वणकुंद्रे, बसगोंडा बिराजदार, सतीश मगदूम, अण्णासाहेब शहापुरे, अविनाश कोरे, सचिन शिंदे, प्रसाद कुलकर्णी, बाळासाहेब पाटील, निवृत्ती शिरगुरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरManipur Violenceमणिपूर हिंसाचारRaju Shettyराजू शेट्टी