शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

मणिपूरला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 13:47 IST

मणिपूर येथे शिष्टमंडळाच्या माध्यमातून जाऊन परिस्थिती पाहणी करुन राष्ट्रपती यांनाही निवेदन देणार

इचलकरंजी : मणिपूरला शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट देऊन परिस्थितीची स्वत: पाहणी करणार आहे. राष्ट्रपतींनाही मणिपूर घटनेसंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. शहरात सुरू केलेले ‘७२ तास आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन’ची सांगता गुरुवारी केली. वीर पत्नींच्या हस्ते त्यांना सरबत देण्यात आले.मणिपूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि येथील माता-भगिनींच्या अब्रूचे रक्षण करण्यासाठी आपण देशवासीय असमर्थ ठरलो याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी ७२ तास अन्नत्याग केला होता. सुमनदेवी प्रकाश चव्हाण (शिरोळ), सुलभाताई रावसाहेब पाटील (टाकवडे), उज्ज्वला जोतिराम चौगुले (अतिग्रे) व सुनीता विजय मोरे (सांगली) या वीर पत्नींच्या हस्ते नारळ पाणी घेऊन त्यांनी आंदोलनाची सांगता केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.शेट्टी म्हणाले, एका निर्भया प्रकरणामुळे देशामध्ये सत्तांतरण घडले होते. याचा इतिहास राज्यकर्त्यांना नजरेआड करता येणार नाही. चंद्र-तारे असेपर्यंत कोणाला सत्ता करायची आहे, त्यांनी सत्ता करावी. मात्र, या देशातील महिला, निराधार, मुले यांच्या संरक्षणाची जबाबदारीही उचलावी. अशा घटना घडतील असतील, तर नागरिक गप्प बसणार नाहीत. आम्ही प्राणपणाने या घटनांचा विरोध करू.मी स्वत: मणिपूर येथे शिष्टमंडळाच्या माध्यमातून जाऊन परिस्थिती पाहणार आहे. राष्ट्रपती यांनाही निवेदन देणार आहे. यावेळी जालिंदर पाटील, जनार्दन पाटील, जयकुमार कोले, विकास चौगुले, हेमंत वणकुंद्रे, बसगोंडा बिराजदार, सतीश मगदूम, अण्णासाहेब शहापुरे, अविनाश कोरे, सचिन शिंदे, प्रसाद कुलकर्णी, बाळासाहेब पाटील, निवृत्ती शिरगुरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरManipur Violenceमणिपूर हिंसाचारRaju Shettyराजू शेट्टी