शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 08:20 IST

कोल्हापूर खंडपीठ स्थापनेसाठी सहा जिल्ह्यांतील वकिलांनी २५ वर्षे लढा दिला. न्या. भूषण गवई यांनी सरन्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कोल्हापूर खंडपीठासाठी अनुकूलता दर्शविली.

दीप्ती देशमुखउपमुख्य उपसंपादक

मुंबई उच्च न्यायालयाचेकोल्हापूर खंडपीठ स्थापन करावे, अशी मागणी अनेक दशकांपासून केली जात आहे. मात्र, त्याबाबत  आश्वासक पावले उचलली गेली नव्हती, परंतु १२ जुलैला कोल्हापूरमधील कुटुंब न्यायालयाच्या इमारतीतील न्यायालयाचा कारभार अन्यत्र हलविण्यात आला आणि इमारतीच्या नूतनीकरण सुरू झाले. त्यातूनच  कोल्हापूर खंडपीठ स्थापण्याची चर्चा सुरू झाली. १६ ऑगस्टला खंडपीठाचे उद्घाटन होणार, असेही म्हटले जाते. परंतु वकील आणि पक्षकारांमध्ये संभ्रम आहे. खंडपीठ स्थापनेची जाहीर घोषणा होणे अपेक्षित असताना लपवालपवी का केली जात आहे? असा प्रश्न वकिलांना पडला आहे.  

कोल्हापूर खंडपीठ स्थापनेसाठी सहा जिल्ह्यांतील वकिलांनी २५ वर्षे लढा दिला. प्रत्येक मुख्य न्यायमूर्तींना साकडे घातले. मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी अनुकूलता दर्शवली होती. त्यानंतरही प्रश्न प्रलंबित होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई यांनी सरन्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कोल्हापूर खंडपीठासाठी अनुकूलता दर्शविली आणि काही दिवसांतच हालचालींना वेग आला. 

कोल्हापूर खंडपीठ स्थापल्यास त्याच्या अधिकारक्षेत्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे सहा जिल्हे येतील. काहींच्या मते, या सहाही जिल्ह्यांतील बार अध्यक्षांना सरन्यायाधीश गवई यांनी खंडपीठ स्थापण्याचे आश्वासन दिले आहे. प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र, अधिकृत दुजोरा मिळत नाही. खंडपीठ स्थापनेमुळे सहा जिल्ह्यांतील नागरिकांना उच्च न्यायालयात दाद मागणे सोपे होईल आणि न्याय जलदगतीने मिळेल, अशी अपेक्षा आहे. ‘न्याय आपल्या दारी’ ही उक्ती खरी ठरेलही. मात्र, मुंबईत बसून सहा जिल्ह्यांतील खटले लढविणाऱ्या वकिलांसाठी हा धक्का असेल.   

डिजिटल युगात कोल्हापूर खंडपीठाची आवश्यकता आहे का? याचिका दाखल करण्यासाठी ई-फायलिंगची सुविधा आहे. उच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपणही केले जाते.  शिवाय, कायद्यातील तरतुदींचा अन्वयार्थ लावताना न्यायमूर्तींची मते सारखीच असणे आवश्यक आहे आणि ती गरजही आहे. असे असताना आणखी एक खंडपीठ वाढवून वेगळी मते निर्माण होण्यास हे खंडपीठ कारणीभूत तर ठरणार नाही ना? असे प्रश्न काही वकिलांना पडले आहेत. तर दुसरीकडे, काही मूठभर वकिलांसाठी दीड कोटी जनतेला न्याय सुलभ रीतीने मिळविण्यापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही, अशीही भावना व्यक्त करण्यात येत आहे.

कोल्हापूर खंडपीठ झाले तर मुंबई उच्च न्यायालयाचे विकेंद्रीकरण होऊन प्रकरणे जिल्हानिहाय विभागली जातील. मुंबईतील वकिलांची फी जास्त आहे. त्यामुळे सामान्यांना न्याय मिळवणे  ‘महाग’ आहे. दहा-बारा तास प्रवास करून मुंबईला जाणे परवडत नाही. लोक न्यायालयाबाहेरच तडजोड करतात किंवा अन्याय सहन करतात. खंडपीठामुळे हे चित्र पालटेल.  

अद्याप खंडपीठ स्थापण्याबाबत काहीच स्पष्टता नसल्याने त्यांना आता २३ जुलैची प्रतीक्षा आहे. कारण या दिवशी खंडपीठाच्या स्थापनेबाबत अधिसूचना काढण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय