शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राणी गणना: वनविभाग यंदा प्रथमच सामान्य व्यक्तींना सहभागी करून घेणार, सोशल मीडियावरून आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 12:00 IST

लोकांना साद घालून जाहिरातबाजी करून गर्दी करण्याचा प्रयत्न कशासाठी केला जात आहे, असा प्रश्न पर्यावरण प्रेमी करीत आहेत.

संदीप आडनाईककोल्हापूर : वनविभागामार्फत दरवर्षी बुध्द पौर्णिमेला वन्यप्राणी गणना करण्यात येते. वन्यप्राण्यांची गणना करणे ही वनविभागाची प्रमुख जबाबदारी आहे. वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने वन अधिकारी वन्यप्राण्यांची गणना करतात. या उपक्रमासाठी अनेकवेळा वन्यजीव अभ्यासकांना तसेच स्वयंसेवी संस्थेलाही या उपक्रमात वनविभाग सहभागी करून घेत असते; पण आज, बुध्द पौर्णिमेला होणाऱ्या यावर्षीच्या वन्यप्राणी गणनेसाठी मात्र प्रथमच वनविभागाने सर्वसामान्य हौशी व्यक्तींनाही सहभागी करून घेण्याचे ठरविले आहे, आणि याबाबतचे आवाहनही चक्क सोशल मीडियावरून केले आहे.

वनविभाग दिवसेंदिवस सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन 'पब्लिक इव्हेन्ट' करत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करत आहेत. वन्यप्राण्यांची गणना करणे ही वनविभागाची अंतर्गत बाब आहे. यासाठी अतिशय मर्यादित संख्या आणि वन्यजीव अभ्यासकांची आवश्यकता असते. असे असताना वनखाते वन्यप्राणी गणनेसाठी चक्क 'पब्लिक इव्हेन्ट' साजरा करत आहे. यासाठी सोशल मीडियावरून जाहिरातही प्रसारित करत आहे. लोकांना साद घालून जाहिरातबाजी करून गर्दी करण्याचा प्रयत्न कशासाठी केला जात आहे, असा प्रश्न पर्यावरण प्रेमी करीत आहेत.

बुध्द पौर्णिमेला दरवर्षी वनविभागामार्फत वन्यप्राण्यांची गणना केल जाते. यावेळीही राधानगरी वन्यविभागांतर्गत राधानगरी आणि दाजीपूर, शाहूवाडी, पन्हाळा, चांदोली, कोयनानगर, सागरेश्वर आदी ठिकाणी ही वन्यप्राणी गणना होणार आहे. यात प्रत्येक पाणवठा आणि त्यावरील मचाणावर एका हौशी व्यक्तीसोबत एका वनरक्षकाची नियुक्ती केली आहे. पेन आणि नोंदवहीसह या व्यक्ती रात्रभर मचाणावर राहून वन्यप्राण्यांची नोंद करणार आहे. यासाठी सोशल मीडियावरून आवाहन करून प्रथम येणाऱ्या व्यक्तींची नोंदणी केली आहे. - विशाल माळी, वन अधिकारी, राधानगरी वन्यजीव विभाग 

वन्यप्राणी गणनेसाठी सोशल मीडियावरून आवाहन करून अशाप्रकारे सर्वसामान्य जनतेला सहभागी करून घेणे नियमबाह्य आहे. यामुळे वन्यप्राणी गणनेच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होऊ शकते, यासाठी या उपक्रमात सर्वसामान्य जनतेला सहभागी करून घेऊ नये. -डॉ. मधुकर बाचूळकर, ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभागSocial Mediaसोशल मीडिया