शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वन्यप्राणी गणना: वनविभाग यंदा प्रथमच सामान्य व्यक्तींना सहभागी करून घेणार, सोशल मीडियावरून आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 12:00 IST

लोकांना साद घालून जाहिरातबाजी करून गर्दी करण्याचा प्रयत्न कशासाठी केला जात आहे, असा प्रश्न पर्यावरण प्रेमी करीत आहेत.

संदीप आडनाईककोल्हापूर : वनविभागामार्फत दरवर्षी बुध्द पौर्णिमेला वन्यप्राणी गणना करण्यात येते. वन्यप्राण्यांची गणना करणे ही वनविभागाची प्रमुख जबाबदारी आहे. वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने वन अधिकारी वन्यप्राण्यांची गणना करतात. या उपक्रमासाठी अनेकवेळा वन्यजीव अभ्यासकांना तसेच स्वयंसेवी संस्थेलाही या उपक्रमात वनविभाग सहभागी करून घेत असते; पण आज, बुध्द पौर्णिमेला होणाऱ्या यावर्षीच्या वन्यप्राणी गणनेसाठी मात्र प्रथमच वनविभागाने सर्वसामान्य हौशी व्यक्तींनाही सहभागी करून घेण्याचे ठरविले आहे, आणि याबाबतचे आवाहनही चक्क सोशल मीडियावरून केले आहे.

वनविभाग दिवसेंदिवस सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन 'पब्लिक इव्हेन्ट' करत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करत आहेत. वन्यप्राण्यांची गणना करणे ही वनविभागाची अंतर्गत बाब आहे. यासाठी अतिशय मर्यादित संख्या आणि वन्यजीव अभ्यासकांची आवश्यकता असते. असे असताना वनखाते वन्यप्राणी गणनेसाठी चक्क 'पब्लिक इव्हेन्ट' साजरा करत आहे. यासाठी सोशल मीडियावरून जाहिरातही प्रसारित करत आहे. लोकांना साद घालून जाहिरातबाजी करून गर्दी करण्याचा प्रयत्न कशासाठी केला जात आहे, असा प्रश्न पर्यावरण प्रेमी करीत आहेत.

बुध्द पौर्णिमेला दरवर्षी वनविभागामार्फत वन्यप्राण्यांची गणना केल जाते. यावेळीही राधानगरी वन्यविभागांतर्गत राधानगरी आणि दाजीपूर, शाहूवाडी, पन्हाळा, चांदोली, कोयनानगर, सागरेश्वर आदी ठिकाणी ही वन्यप्राणी गणना होणार आहे. यात प्रत्येक पाणवठा आणि त्यावरील मचाणावर एका हौशी व्यक्तीसोबत एका वनरक्षकाची नियुक्ती केली आहे. पेन आणि नोंदवहीसह या व्यक्ती रात्रभर मचाणावर राहून वन्यप्राण्यांची नोंद करणार आहे. यासाठी सोशल मीडियावरून आवाहन करून प्रथम येणाऱ्या व्यक्तींची नोंदणी केली आहे. - विशाल माळी, वन अधिकारी, राधानगरी वन्यजीव विभाग 

वन्यप्राणी गणनेसाठी सोशल मीडियावरून आवाहन करून अशाप्रकारे सर्वसामान्य जनतेला सहभागी करून घेणे नियमबाह्य आहे. यामुळे वन्यप्राणी गणनेच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होऊ शकते, यासाठी या उपक्रमात सर्वसामान्य जनतेला सहभागी करून घेऊ नये. -डॉ. मधुकर बाचूळकर, ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभागSocial Mediaसोशल मीडिया