शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

पुणे-कोल्हापूर महामार्ग रुंदीकरणाने सारेच बेहाल, टोलच रद्द करण्याची मागणी 

By समीर देशपांडे | Updated: June 10, 2024 17:51 IST

पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण हे प्रवाशांचा अंत पाहणारे ठरत आहे.

समीर देशपांडेकोल्हापूर : पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण हे प्रवाशांचा अंत पाहणारे ठरत आहे. सुमारे १०० हून अधिक असणारी दोन्ही बाजूंची डायव्हर्जन्स, त्यातील अशास्त्रीयपणा, कसेही काढण्यात आलेले सर्व्हिस रोड यामुळे वाहनधारक अक्षरश: हैराण झाले असून, जोपर्यंत काम पूर्ण होत नाहीत तोपर्यंत टोलच रद्द करण्याची मागणी होत आहे.गेली दोन वर्षे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्याचे सहापदरीकरण सुरू आहे. त्यामध्ये नवे पूल, जुन्या पुलांची दुरुस्ती, नवे सेवा रस्ते मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे सहापदरीकरण करणे आवश्यक आहेच. परंतु ते करताना सध्याचा प्रवास हा किमान सुसह्य व्हावा, यासाठी प्राधिकरण आणि ठेकेदार काहीच काळजी घेणार नसतील तर मग त्यांना विचारणारे कोणी आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.येता-जाता असणारी १०० डायव्हर्जन्स आणि रस्ता रुंदीकरणामुळे यापूर्वीच्या चौपदरी रस्त्यावर वापरावयास शिल्लक असणारा भीतीदायक एकल मार्ग, रस्ता समपातळीत नसणे, त्यातच पडलेले खड्डे, अशास्त्रीय अडथळे यामुळे प्रवाशांना या मार्गावरचा प्रवास नकोसा झाला आहे. प्रवासी जीव मुठीत घेऊन दोन तास विलंबाने हा प्रवास करून आपल्याच नशिबाला दोष देत असल्याचे दिसून येत आहे.सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी, वेळेची बचत व्हावी, यासाठी नागरिक टोल भरत असताना या सेवाच सध्या सहापदरीकरणाच्या कामावेळी मिळत नसतील तर काम पूर्ण हाेईपर्यंत टोलच रद्द करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

वाहनधारकांनी सांगितलेले दोष

  • वाट्टेल तसे आडवे येणारे गर्डर
  • धोकादायक सेवा रस्ते
  • अचानक समोर येणारी डायव्हर्जन्स
  • ज्या ठिकाणी रस्ता पूर्ण त्या ठिकाणी अचानक उलट मार्गाने येणाऱ्या चारचाकी

कोल्हापूर-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अतिशय धोकादायक पद्धतीने सुरू आहे. महामार्ग प्राधिकरणाला कोणीच जाब विचारत नसल्याने त्यांच्या पद्धतीने काम सुरू आहे. धोकादायक आणि वेळखाऊ प्रवास असून, केवळ अपघातात कोणाचे जीव जात नाहीत म्हणून या मार्गावरील धोकादायक परिस्थितीकडे दुर्लक्ष सुरू आहे. -समीर परुळेकर, कोल्हापूर 

किमान दीड ते दोन तास विलंबाने धावणाऱ्या वाहनधारकांकडून वसूल करण्यात येणारा कोल्हापूर-पुणे महामार्गावरील टोलचा झिझिया कर म्हणजे ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ असेच काहीतरी आहे. वाहनधारक टोल देऊन प्रवासाला कमी कालावधी लागेल आणि कोणताही अपघात किंवा अडथळ्याशिवाय प्रवास होईल, या अपेक्षेने रस्ता वापरतात; पण या अपेक्षा पूर्ण होत नसल्याने रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोल माफ करावा किंवा वाहतुकीचे योग्य नियोजन करावे. तिऱ्हाईत यंत्रणेकडून निविदा वाचून या कामाची तपासणी होण्याची गरज आहे. -दौलत देसाई, माजी जिल्हाधिकारी, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गtollplazaटोलनाका