शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाची ‘सीएचबी’कडे वाटचाल कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 16:44 IST

या हंगामी शिक्षकांना समान काम समान वेतन तत्त्वानुसार पाहता सध्या मिळणारे वेतन कमी आहे.

कोल्हापूर : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना कायमस्वरूपी प्राध्यापक भरती त्वरित करा म्हणून आदेश दिले आहेत. त्याबाबत राज्य शासनाशी पत्रव्यवहार केला आहे. शासनाने देखील ४० टक्के नोकरभरती सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. अशा स्थितीत शिवाजी विद्यापीठाची पुन्हा तासिका तत्त्वावरील (सीएचबी) शिक्षक नियुक्तीकडे वाटचाल कशाला हवी, अशी विचारणा विद्यापीठाच्या घटकातून होत आहे. सीएचबी तत्त्वानुसार शिक्षक नेमल्यास गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होऊ असून त्याऐवजी पूर्णवेळ शिक्षक नेमण्याचा सर्वांनी आग्रह धरला पाहिजे, अशी मागणी या घटकांनी केली आहे.

गेल्या आठवड्यात शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेची (सिनेट) बैठक झाली. त्यात विद्यापीठातील हंगामी शिक्षकांच्या वेतनावरील आर्थिक बोजा विद्यापीठाच्या स्वनिधीवर पडत असून, सीएचबी तत्त्वानुसार शिक्षक नियुक्तीच्या मुद्दावर चर्चा झाली. शासनाच्या पातळीवरून प्राध्यापक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची कमतरता पूर्ण करणे महाविद्यालय, विद्यापीठांना अडचणीचे ठरत आहे. ती कमतरता विद्यापीठ हंगामी शिक्षकांची नियुक्ती करून पूर्ण करत आहे.

या हंगामी शिक्षकांना समान काम समान वेतन तत्त्वानुसार पाहता सध्या मिळणारे वेतन कमी आहे. या शिक्षकांनी विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकन प्रक्रियेत चांगले योगदान दिले आहे. त्यांच्या माध्यमातून विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायित विभागांचे काम सुरू आहे. अशा स्थितीत सीएचबी तत्त्व स्वीकारल्यास शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने विविध प्रश्न निर्माण होणार असल्याचे मत विद्यापीठाच्या घटकांतून व्यक्त होत आहे.

‘सीएचबी’धारकांवर मर्यादा

सीएचबी तत्त्वावरील शिक्षकांचा विचार करता त्यांना काम करताना अनेक मर्यादा येतात. त्यांनी नेमून दिलेल्या तासात काम करावे लागते. हे शिक्षक विद्यापीठाच्या इतर कोणत्याही कामासाठी बांधील नसतात. विद्यापीठाने सीएचबीचे धोरण स्वीकारल्यास विद्यार्थ्यांची परीक्षा, प्रवेश, संशोधनाबाबत विविध प्रश्न निर्माण होणार असल्याचे मत विद्यापीठाच्या काही घटकांनी व्यक्त केले.

विद्यापीठ कार्यक्षेत्रात १५९२ जागा रिक्त

शिवाजी विद्यापीठातील अनुदानित आणि स्वयंअर्थसाहाय्यित अधिविभागांमध्ये एकूण २४७, तर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांत गेल्या चार वर्षांपासून सहायक प्राध्यापकांची १२९८ पदे, तर प्राचार्यांची ४७ पदे रिक्त आहेत.

पूर्णवेळ शिक्षक नियुक्तीची आवश्यक असताना विद्यापीठाने सीएचबी तत्त्वावर शिक्षक नियुक्ती करणे योग्य ठरणार नाही. शिक्षकांच्या रिक्त जागांवर पूर्णवेळ भरती होईपर्यंत हंगामी तत्त्वाने शिक्षकांची नियुक्ती विद्यापीठाने करावी. -प्रा. सुभाष जाधव, माजी उपाध्यक्ष, एमफुक्टो

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठTeacherशिक्षक