शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

शिवाजी विद्यापीठाची ‘सीएचबी’कडे वाटचाल कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 16:44 IST

या हंगामी शिक्षकांना समान काम समान वेतन तत्त्वानुसार पाहता सध्या मिळणारे वेतन कमी आहे.

कोल्हापूर : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना कायमस्वरूपी प्राध्यापक भरती त्वरित करा म्हणून आदेश दिले आहेत. त्याबाबत राज्य शासनाशी पत्रव्यवहार केला आहे. शासनाने देखील ४० टक्के नोकरभरती सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. अशा स्थितीत शिवाजी विद्यापीठाची पुन्हा तासिका तत्त्वावरील (सीएचबी) शिक्षक नियुक्तीकडे वाटचाल कशाला हवी, अशी विचारणा विद्यापीठाच्या घटकातून होत आहे. सीएचबी तत्त्वानुसार शिक्षक नेमल्यास गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होऊ असून त्याऐवजी पूर्णवेळ शिक्षक नेमण्याचा सर्वांनी आग्रह धरला पाहिजे, अशी मागणी या घटकांनी केली आहे.

गेल्या आठवड्यात शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेची (सिनेट) बैठक झाली. त्यात विद्यापीठातील हंगामी शिक्षकांच्या वेतनावरील आर्थिक बोजा विद्यापीठाच्या स्वनिधीवर पडत असून, सीएचबी तत्त्वानुसार शिक्षक नियुक्तीच्या मुद्दावर चर्चा झाली. शासनाच्या पातळीवरून प्राध्यापक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची कमतरता पूर्ण करणे महाविद्यालय, विद्यापीठांना अडचणीचे ठरत आहे. ती कमतरता विद्यापीठ हंगामी शिक्षकांची नियुक्ती करून पूर्ण करत आहे.

या हंगामी शिक्षकांना समान काम समान वेतन तत्त्वानुसार पाहता सध्या मिळणारे वेतन कमी आहे. या शिक्षकांनी विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकन प्रक्रियेत चांगले योगदान दिले आहे. त्यांच्या माध्यमातून विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायित विभागांचे काम सुरू आहे. अशा स्थितीत सीएचबी तत्त्व स्वीकारल्यास शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने विविध प्रश्न निर्माण होणार असल्याचे मत विद्यापीठाच्या घटकांतून व्यक्त होत आहे.

‘सीएचबी’धारकांवर मर्यादा

सीएचबी तत्त्वावरील शिक्षकांचा विचार करता त्यांना काम करताना अनेक मर्यादा येतात. त्यांनी नेमून दिलेल्या तासात काम करावे लागते. हे शिक्षक विद्यापीठाच्या इतर कोणत्याही कामासाठी बांधील नसतात. विद्यापीठाने सीएचबीचे धोरण स्वीकारल्यास विद्यार्थ्यांची परीक्षा, प्रवेश, संशोधनाबाबत विविध प्रश्न निर्माण होणार असल्याचे मत विद्यापीठाच्या काही घटकांनी व्यक्त केले.

विद्यापीठ कार्यक्षेत्रात १५९२ जागा रिक्त

शिवाजी विद्यापीठातील अनुदानित आणि स्वयंअर्थसाहाय्यित अधिविभागांमध्ये एकूण २४७, तर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांत गेल्या चार वर्षांपासून सहायक प्राध्यापकांची १२९८ पदे, तर प्राचार्यांची ४७ पदे रिक्त आहेत.

पूर्णवेळ शिक्षक नियुक्तीची आवश्यक असताना विद्यापीठाने सीएचबी तत्त्वावर शिक्षक नियुक्ती करणे योग्य ठरणार नाही. शिक्षकांच्या रिक्त जागांवर पूर्णवेळ भरती होईपर्यंत हंगामी तत्त्वाने शिक्षकांची नियुक्ती विद्यापीठाने करावी. -प्रा. सुभाष जाधव, माजी उपाध्यक्ष, एमफुक्टो

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठTeacherशिक्षक