शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल का करू नये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:42 AM

कोल्हापूर : राज्यात गेल्या तीन वर्षांत ११ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येस जबाबदार धरून भाजप सरकारवर खुनाचा गुन्हा का नोंद करू नये? असा सवाल माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी सायंकाळी येथे केला. कर्जमाफीसंदर्भात हे राज्य सरकार नुसत्याच घोषणा करत असून २०१९ ला सत्तेवर आल्यानंतर कॉँग्रेस सरकारच कर्जमाफी ...

कोल्हापूर : राज्यात गेल्या तीन वर्षांत ११ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येस जबाबदार धरून भाजप सरकारवर खुनाचा गुन्हा का नोंद करू नये? असा सवाल माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी सायंकाळी येथे केला. कर्जमाफीसंदर्भात हे राज्य सरकार नुसत्याच घोषणा करत असून २०१९ ला सत्तेवर आल्यानंतर कॉँग्रेस सरकारच कर्जमाफी देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याच कार्यक्रमात या सरकारकडून सहकार मोडून काढण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला.पाचगाव (ता. करवीर) येथील समृद्धीनगरच्या मैदानावर कॉँग्रेसच्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सतेज पाटील होते. प्रमुख उपस्थिती प्रतिमा सतेज पाटील, ऋतुराज पाटील, करवीर पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती संदीप नेजदार आदींची होती.हर्षवर्धन पाटील म्हणाले, कॉँग्रेस सरकारच्या काळात मी संसदीय कामकाज मंत्री असताना सध्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकरी आत्महत्येस जबाबदार धरून सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. आता गेल्या तीन वर्षांत ११ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे मुनगंटीवार यांना प्रश्न आहे की तुमच्या सरकारवर खुनाचा गुन्हा का दाखल करू नये?कर्नाटक, पंजाब ही कॉँग्रेस शासित राज्ये शेतकºयांना कर्जमाफी देत असतील, तर महाराष्टÑाच्या मुख्यमंत्र्यांना कर्जमाफी द्यायला काय हरकत आहे? हे सरकार नुसत्याच घोषणा करीत आहे. त्यामुळे २०१९ला कॉँग्रेस सत्तेवर आल्यावरच शेतकºयांना कर्जमाफी मिळेल.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कॉँग्रेसच राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या वातावरण बदलत असून, २०१९च्या निवडणुकीत विधानसभेवर कॉँग्रेसचा तिरंगा फडकविल्याशिवाय राहणार नाही.सतेज पाटील यांनी नोटाबंदी, जीएसटीनंतर कोल्हापुरात प्राधिकरणाच्या माध्यमातून पाण्याची दरवाढ करण्याचे पाप भाजपने केले आहे, असा घणाघात करत हे सरकार सहकार मोडून काढण्यासह विविध पेन्शन योजना बंद केल्याचा आरोपही केला. ‘अच्छे दिन’ फक्त मोदींनाच असून जनता अजूनही त्याच्या प्रतीक्षेत असल्याचा टोला लगावला. जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीमधील मिळालेल्या घवघवीत यशानंतर पुढील लक्ष्य विधानसभा ठेवून कामाला लागावे, असे आवाहनही केले.यावेळी ऋतुराज पाटील, हणबरवाडीच्या सदस्य सुप्रिया वाडकर, टोप संभापूरचे सरपंच प्रकाश जिरंगे, दºयाचे वडगावे सदस्य अनिल मुळीक यांनी आपल्या मनोगतातून कोल्हापूर दक्षिणमध्ये कॉँग्रेसचा आमदार होऊन सतेज पाटील कॅबिनेट मंत्री होतील, असा विश्वास व्यक्त केला. संयोजक व पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांनी प्रास्ताविक केले.स्वत:चा किल्ला शाबूत नसणाºयांनीआम्हाला शिकवू नये : ऋतुराज पाटीलज्यांना आपला स्वत:चा किल्ला शाबूत ठेवता आला नाही, त्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये, असा टोला ऋतुराज पाटील यांनी आजी-माजी आमदार महाडिक यांचे नाव न घेता लगावला. तसेच सतेज पाटील यांची या निवडणुकीच्या निमित्ताने क्रिकेट मॅचप्रमाणे पहिली ओव्हर सुरू झाली असून, सर्वांच्या ताकदीवर २०१९ची निवडणूक जिंकणारच, असेही ते म्हणाले.भोगम-रामाणेंकडून चांदीची तलवार भेटउद्योगपती रामचंद्र भोगम व माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांच्या कुटुंबीयांकडून आमदार सतेज पाटील यांना या कार्यक्रमात चांदीची तलवार भेट देण्यात आली. यावेळी कळंबा सरपंच सागर भोगम, माजी महापौर अश्विनी रामाणे, आदी उपस्थित होते.कळंब्याचे दोन अपक्ष सदस्य कॉँग्रेसमध्येया कार्यक्रमात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कळंब्यातील विजय खानविलकर व राजेंद्र गुरव या अपक्ष निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या समर्थकांसह कॉँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.हे सरकार आंधळे आणि बहिरेसध्याचे सरकार हे आंधळे आणि बहिरे असल्याचा टोला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लगावला. यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी विदर्भातील कीर्तनकार हंडे महाराज यांच्या कीर्तनातील संदर्भाचा दाखला दिला.

टॅग्स :Politicsराजकारण