शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
5
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
6
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
7
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
8
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
9
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
10
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
11
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
12
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
13
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
14
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
15
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
16
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
17
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
18
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

पुरेसे शिक्षक, पुस्तके नसताना भाषा वाढवण्याचा आग्रह कशाला?, पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 18:58 IST

कसाही मोर्चा काढा; पण, मराठीवर अन्याय नको!

कोल्हापूर : सध्या सुरू असलेला भाषेचा वाद निरर्थक असून, प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची गरज आहे, असा सल्ला देत एकीकडे शिक्षक नाहीत, पुस्तके नाहीत असे असताना भाषा वाढवण्याचा आग्रह कशाला, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सरकारला केला.चव्हाण म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारने शिक्षणावरचा खर्च कमी केला आहे. कितीही भाषा ठेवा; पण शिकवायला मूलभूत सामग्री नाही. शिक्षणाची दुर्दशा झाली आहे आणि दुसऱ्या बाजूला भाषेचा मुद्दा काढत आहेत. प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च शिक्षण असेल त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची गरज असून, बाकीचे सर्व निरर्थक वाद आहेत. देशाला लिंक लँग्वेज म्हणून हिंदी भाषेचा वापर होतो. इंग्रजी ही ज्ञान भाषा आहे. इंग्रजीमध्ये जेवढे नवीन संशोधन होत आहे ते इतर कोणत्याही भाषेत होत नाही. मात्र, इंग्रजीला बाजूला करा आणि स्थानिक भाषांचे महत्त्व कमी करा यासाठी एक एक प्रयत्न सुरू असल्यानेच हा गदारोळ उठला असल्याची टीका त्यांनी केली. विद्यमान सरकार मराठीला विरोध करू शकणार नाही; पण, ज्या प्रकारे नवीन शैक्षणिक धोरण राबविले जात आहे त्यावरून त्यांना हिंदी ही एकच भाषा ठेवायची आहे असे दिसते. हे मुळात चुकीचे धोरण आहे. तीन भाषेचे धोरण आपण पूर्वीपासून स्वीकारले आहे, त्यामुळे हिंदी सक्ती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.

कसाही मोर्चा काढा; पण, मराठीवर अन्याय नको!मनसे आणि शिवसेनेच्या वतीने काढल्या जाणाऱ्या मोर्चात सहभागी व्हायचे की नाही ते प्रदेशाध्यक्ष ठरवतील. सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावे, ही राज ठाकरे यांची पॉलिटिकल ॲक्शन आहे. कसा मोर्चा काढायचा हा त्यांचा भाग आहे; पण, मराठीवर अन्याय होता कामा नये, ही आमची भावना असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.