शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

राष्ट्रीय सणांमध्ये महिलांचा सहभाग का नाही? ध्वजवंदनास नगण्य उपस्थिती :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:10 AM

गणपती, दसरा, दिवाळीपासून ते म्हाईपर्यंतच्या सणांमध्येच गुंतलेल्या महिलांचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणांमध्ये मात्र नगण्य सहभाग आहे. स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतरही देशाच्या राजकीय, सामाजिक सुधारणांत मोलाचे योगदान देणारी

ठळक मुद्देराष्टचा एक घटक या अभिमानाने राष्टध्वजाला सलाम करणे नैतिक जबाबदारी

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : गणपती, दसरा, दिवाळीपासून ते म्हाईपर्यंतच्या सणांमध्येच गुंतलेल्या महिलांचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणांमध्ये मात्र नगण्य सहभाग आहे. स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतरही देशाच्या राजकीय, सामाजिक सुधारणांत मोलाचे योगदान देणारी महिला आघाडी ध्वजवंदनसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमात मात्र पिछाडीवर आहेत. मीदेखील या राष्ट्राचा एक घटक आहे, या अभिमानातून महिलांनी एक दिवस तरी राष्ट्रध्वजाला सलाम करणे ही नैतिक, सामाजिक जबाबदारी आहे.

आपण भारतीय उत्सवप्रिय लोक. येथील संस्कृती आणि लोकजीवनाला सण, उत्सव आणि समारंभाच्या रंगांनी अधिक खुलवले आहे. या सणांच्या तयारीत आघाडी असते ती महिलांची. उत्सव एक दिवसाचा असो नाहीतर दहा-बारा दिवसांचा. महिलांचे भावविश्व त्याभोवती गुंफले आहे; पण १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन राष्ट्रीय सण साजरे करताना मात्र महिला दिसतच नाहीत.

शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, पतसंस्था, बँका, ग्रामपंचायत, महापालिका, जिल्हा परिषद अशा आस्थापनांमध्ये ध्वजवंदन सोहळ्याला उपस्थित राहणे बंधनकारक आहे; त्यामुळे याठिकाणी महिला अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य महिलांची उपस्थिती असते. याशिवाय राजकीय, सामाजिक जीवनात कार्यरत असलेल्या महिलांना या दिवसाचे महत्त्व माहीत असते; त्यामुळे त्यांचीही ध्वजवंदनाला उपस्थिती असते.अशा विविध क्षेत्रांतील मोजक्या आणि सुशिक्षित महिला वगळता युवती, गृहिणी अगदी भागाभागांतील, गल्ली किंवा चौकांतील ध्वजवंदन सोहळ्यालादेखील उपस्थित नसतात, हे खेदजनक वास्तव आहे.लढवय्या इतिहासाचा विसर..पुरुषप्रधान मानसिकतेच्या काळातही अनेक महिलांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला झोकून दिले होते. देशाला किती मोठ्या संघर्षानंतर हे स्वातंत्र्य मिळाले आहे, त्यात स्त्रीशक्तीचे योगदान किती मोलाचे होते याबद्दल महिलांनाच माहिती नाही. राष्ट्रीय सण महिलांनीदेखील साजरे करणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव महिलांमध्ये नाही. त्यासाठी आता त्यांचे प्रबोधन आणि जाणीवजागृती निर्माण करण्याची गरज आहे.मानसिकतेचा पगडापुरुषप्रधान संस्कृतीच्या मानसिकतेमुळे पूर्वीच्या काळी महिला घराबाहेर पडत नसत. त्यात सार्वजनिक कार्यक्रमांना त्यांनी जायचेच नाही हा एक अलिखित नियम त्यांच्या माथी होता. स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण सार्वजनिकरीत्या साजरे केले जात असल्याने अजूनही महिलांची त्यात आपला सहभाग हवा अशी मानसिकता नाही. 

सुशिक्षित नोकरदार महिलांमध्ये स्वातंत्र्यदिनाबद्दलची जाणीवजागृती आहे; पण समाजातला मोठा घटक असलेल्या युवती आणि गृहिणींमध्ये अजूनही राष्ट्रीय सणांबद्दल प्रबोधन करण्याची गरज आहे. सार्वजनिकरीत्या साजरा होणाऱ्या या राष्ट्रीय सणांमध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे.- प्रा. डॉ. भारती पाटील राज्यशास्त्राच्या अभ्यासकमहिलांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाचा सर्वांनाच विसर पडला आहे. किती कष्टाने हे स्वातंत्र्य मिळाले, याची जाणीव नाही. त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. देवाला रोज हात जोडता, त्याप्रमाणे ध्वजाचेही दर्शन घ्यायला हवे.- सरलाताई पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्यादेशाला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा केवळ पुरुषच स्वतंत्र झाले का असा प्रश्न पडतो. त्यांना अजुनही आर्थिक, वैचारिक आणि संचाराचे स्वातंत्र्य नाही. देवधर्म, उपवास, व्रतवैकल्ये, सण-वार यात दिवसेंदिवस स्वत:ला गुंतवून घेतलेल्या महिलांनी एक दिवस तरी तिरंग्याला सलाम करावा, अशी अपेक्षा आहे.- सीमा पाटील, सामाजिक कार्यकर्त्या

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndependence Dayस्वातंत्र्य दिवस