शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

सामाजिक विकासासाठी निधी मागायचा कुणाकडे?, आमदार राजू आवळेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 12:35 IST

राज्याच्या मंत्रिमंडळात समाजकल्याण व अल्पसंख्याक खात्याचे मंत्रीच नसल्याने सामाजिक विकासासाठी निधी कुणाकडे मागायचा? अशी परिस्थिती

हुपरी : मतदार संघातील गावांचा व सर्वच घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विकासकामे राबविताना आम्ही कधीही जातपात व राजकीय गट-तट न पाहता केवळ गावाचा विकास होण्यासाठीच निधी उपलब्ध करून दिला जातो. सध्या मात्र राज्याच्या मंत्रिमंडळात समाजकल्याण व अल्पसंख्याक खात्याचे मंत्रीच नसल्याने सामाजिक विकासासाठी निधी कुणाकडे मागायचा? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे प्रतिपादन आमदार राजू आवळे यांनी केले.रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृहात पेव्हिंग ब्लॉक बसविणे व मुस्लीम समाज कब्रस्तानची संरक्षक भिंत बांधकामाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. सरपंच सुप्रिया पाटील अध्यक्षस्थानी होत्या.ते म्हणाले, रेंदाळ गावात नागरी विकासकामे उभारण्यासाठी आतापर्यंत सुमारे दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यापुढील कालावधीत गावांतील अंतर्गत सर्व रस्त्यांचे डांबरीकरण तसेच पाणीपुरवठा योजनेतील सर्व अडथळे व त्रुटी दूर करून गावाचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.यावेळी सरपंच सुप्रिया पाटील, लियाकत मुजावर, शब्बीर मोमीन, शिवाजी पाटील, रोशन मानकापुरे, पल्लवी पाटील, अविनाश घोडेस्वार, सादिक मोमीन यांनी मनोगत व्यक्त केले. संगीता पाटील, उषा चौगुले, महेश कोरवी, सचिन पुजारी, अरुण महाजन, मन्सूर नायकवडे, माणिक पतंगे, बापू नायकवडे, तानाजी घोडेस्वार आदी यावेळी उपस्थित होते. धनाजी करवते यांनी स्वागत केले व आभार अस्लम मुजावर यांनी मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Awaleराजू आवळे