शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

नोटबंदीनंतर निवडणुकांसाठी भाजपाकडे पैसा आला कुठून? - राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 20:38 IST

नोटाबंदीत जेवढे पैसे बंद झाले तेवढेच पुन्हा बँकेत आलेत मग नोटबंदी करून फायदा काय झाला? देशातला पहिला पंतप्रधान आहे जो पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार नाहीत. देशातील लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधिल नाही असा आरोप राज यांनी केला. 

इचलकरंजी - नोटबंदी करताना आरबीआयला माहित नाही. मंत्रिमंडळाला माहीत नाही. मंत्र्यांचे मोबाईल काढून घेतले. सर्वोनुमते निर्णय का घेतला गेला नाही? 14 लाख कोटी रुपये देशाच्या व्यवहारात चलनात होते. 500-800 कोटींच्या खोट्या नोटा असताना 14 लाख कोटी नोटाबंदी केली गेली. 2014 पासून आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाकडे पैसा आला कुठून? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपाला केला आहे. सोलापूरनंतर राज ठाकरे यांनी इचलकरंजीमध्ये सभा घेतली त्यामध्ये ते बोलत होते. 

यावेळी राज ठाकरे बोलताना म्हणाले की, काळा पैसा आणायचा आहे तर तुमच्या ईडी, आयकर विभाग यापासून सगळ्या गोष्टी तुमच्या हातात असताना काळा पैसा कुणाकडे आहे याची माहिती सरकारला नाही का? नोटबंदीचा उद्देश स्वच्छ नव्हता. नोटबंदीच्या निर्णयामुळे अनेकांचे रोजगार गेले, यंत्रमाग कामगार उधवस्त झाले. नोकऱ्या कुठे शोधायच्या? नोटबंदी, जीएसटी याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. जाहिरातींवर साडेचार हजार कोटी रुपये खर्च केले गेले. नोटाबंदीत जेवढे पैसे बंद झाले तेवढेच पुन्हा बँकेत आलेत मग नोटबंदी करून फायदा काय झाला? देशातला पहिला पंतप्रधान आहे जो पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार नाहीत. देशातील लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधिल नाही असा आरोप राज यांनी केला. 

माझा उमेदवार निवडणुकीत उभे नसले तरी भाजपावाले फडफडतायेत, आम्ही सभा घेतोय तर खर्च आमच्यात खात्यात मोजणार असं सांगत मी जे प्रश्न विचारतोय त्याची उत्तरं त्यांच्याकडे नाही असा आरोप करत राज यांनी मी जे करतोय ते देशाच्या भविष्यासाठी चांगलंच आहे. कारण यापुढे देशातला कोणताही राजकारणी तुमच्यासमोर उभं राहिला तेव्हा तो खोटा बोलणार नाही, खोटं बोलून मतं मागणार नाही असा दावा राज ठाकरेंनी जनतेसमोर केला. 

मेक इन इंडिया महाराष्टाला शिकवू नयेइचलकरंजी येथे 1904 साली यंत्रमाग सुरु झालं. महात्मा गांधी यांनी सुत काढण्याआधीच इचलकरंजी शहराने सुत काढायला सुरुवात केली होती हा या शहराचा इतिहास आहे. नॅनो गाडी रतन टाटा यांनी काढली मात्र त्याआधी 1970 साली इचलकरंजीतल्या माणसाने मिरा नावाची सर्वात छोटी गाडी काढली. इथे हरहुन्नरी लोकं असताना त्यांना मेक इन इंडिया शिकवता? महाराष्ट्र नेहमीच प्रत्येक गोष्टीत अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसांनी अटकेपार झेंडे रोवले. आजही देशात औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरच आहे. त्यामुळे मेक इन इंडिया महाराष्ट्राला शिकवू नये असा टोला राज यांनी लगावला.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी