शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदीनंतर निवडणुकांसाठी भाजपाकडे पैसा आला कुठून? - राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 20:38 IST

नोटाबंदीत जेवढे पैसे बंद झाले तेवढेच पुन्हा बँकेत आलेत मग नोटबंदी करून फायदा काय झाला? देशातला पहिला पंतप्रधान आहे जो पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार नाहीत. देशातील लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधिल नाही असा आरोप राज यांनी केला. 

इचलकरंजी - नोटबंदी करताना आरबीआयला माहित नाही. मंत्रिमंडळाला माहीत नाही. मंत्र्यांचे मोबाईल काढून घेतले. सर्वोनुमते निर्णय का घेतला गेला नाही? 14 लाख कोटी रुपये देशाच्या व्यवहारात चलनात होते. 500-800 कोटींच्या खोट्या नोटा असताना 14 लाख कोटी नोटाबंदी केली गेली. 2014 पासून आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाकडे पैसा आला कुठून? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपाला केला आहे. सोलापूरनंतर राज ठाकरे यांनी इचलकरंजीमध्ये सभा घेतली त्यामध्ये ते बोलत होते. 

यावेळी राज ठाकरे बोलताना म्हणाले की, काळा पैसा आणायचा आहे तर तुमच्या ईडी, आयकर विभाग यापासून सगळ्या गोष्टी तुमच्या हातात असताना काळा पैसा कुणाकडे आहे याची माहिती सरकारला नाही का? नोटबंदीचा उद्देश स्वच्छ नव्हता. नोटबंदीच्या निर्णयामुळे अनेकांचे रोजगार गेले, यंत्रमाग कामगार उधवस्त झाले. नोकऱ्या कुठे शोधायच्या? नोटबंदी, जीएसटी याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. जाहिरातींवर साडेचार हजार कोटी रुपये खर्च केले गेले. नोटाबंदीत जेवढे पैसे बंद झाले तेवढेच पुन्हा बँकेत आलेत मग नोटबंदी करून फायदा काय झाला? देशातला पहिला पंतप्रधान आहे जो पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार नाहीत. देशातील लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधिल नाही असा आरोप राज यांनी केला. 

माझा उमेदवार निवडणुकीत उभे नसले तरी भाजपावाले फडफडतायेत, आम्ही सभा घेतोय तर खर्च आमच्यात खात्यात मोजणार असं सांगत मी जे प्रश्न विचारतोय त्याची उत्तरं त्यांच्याकडे नाही असा आरोप करत राज यांनी मी जे करतोय ते देशाच्या भविष्यासाठी चांगलंच आहे. कारण यापुढे देशातला कोणताही राजकारणी तुमच्यासमोर उभं राहिला तेव्हा तो खोटा बोलणार नाही, खोटं बोलून मतं मागणार नाही असा दावा राज ठाकरेंनी जनतेसमोर केला. 

मेक इन इंडिया महाराष्टाला शिकवू नयेइचलकरंजी येथे 1904 साली यंत्रमाग सुरु झालं. महात्मा गांधी यांनी सुत काढण्याआधीच इचलकरंजी शहराने सुत काढायला सुरुवात केली होती हा या शहराचा इतिहास आहे. नॅनो गाडी रतन टाटा यांनी काढली मात्र त्याआधी 1970 साली इचलकरंजीतल्या माणसाने मिरा नावाची सर्वात छोटी गाडी काढली. इथे हरहुन्नरी लोकं असताना त्यांना मेक इन इंडिया शिकवता? महाराष्ट्र नेहमीच प्रत्येक गोष्टीत अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसांनी अटकेपार झेंडे रोवले. आजही देशात औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरच आहे. त्यामुळे मेक इन इंडिया महाराष्ट्राला शिकवू नये असा टोला राज यांनी लगावला.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी