शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘कृषिबंध’चे पैसे गेले कुठे ? : गुंतवणूकदार हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 00:59 IST

गेल्या सहा महिन्यांपासून गुंतवणूकदार संचालकांचे उंबरे झिजवत आहेत. या तक्रारी थेट पोलिसांपर्यत गेल्या आणि कारवाईची टांगती तलवार समोर असतानाही पैसे परत करण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे

ठळक मुद्देकारवाईची भीती असूनही हालचाल नाहीच

दत्ता पाटील।म्हाकवे : कृषिबंध अ‍ॅग्रो लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून जादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा केले. मात्र, गुंतवणूकदारांना ते परत न केल्याप्रकरणी जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असणारे म्हाकवे (ता. कागल) येथील बंडोपंत ऊर्फ बी. के. पाटील यांच्यासह संचालक के. के. कुंभार (आणूर) यांना अटक केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून गुंतवणूकदार संचालकांचे उंबरे झिजवत आहेत. या तक्रारी थेट पोलिसांपर्यत गेल्या आणि कारवाईची टांगती तलवार समोर असतानाही पैसे परत करण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे इतकी रक्कम गेली तरी कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे.

सध्या कंपनीच्या नावावर स्थावर मालमत्ता नाही की रोख रक्कम शिल्लक नाही. तरीही पै-पै जमा करून गुंतवणूक केलेल्या हजारो गुंतवणूकदारंचे अद्याप कोट्यवधी रुपये या कंपनीकडे अडकले आहेत. असे असतानाही जबाबदार संचालक मंडळ एकत्रित येऊन रकमेची जबाबदारी न स्वीकारता एकमेकांकडे बोट दाखविण्यातच धन्यता मानत होते. कंपनी फायद्यात आली असती तर वाट्यासाठी मारामारी झाली असती. मग, तोट्याच्यावेळी काढता पाय का? असा सवाल गुंतवणूकदारांतून होत आहे.

कोल्हापूरसह सीमाभागातील हजारो गुंतवणूकदारांनी जादा व्याजाच्या आमिषाला बळी पडून कृषिबंध अ‍ॅग्रो कंपनीत कोट्यवधीची गुंतवणूक केल्याचे समजते. या कंपनीचे पहिले अध्यक्ष बंडोपंत पाटील-म्हाकवेकर यांनी २०१६ मध्ये राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांनी आपली जबाबदारी झटकली होती. तर विद्यमान अध्यक्ष शशिकांत जाधव-सोनगेकर हे सध्या अर्धांगवायूने आजारी आहेत. त्यांच्या पत्नी नंदा जाधव या कार्यकारी संचालिका होत्या.

या कंपनीच्या राजारामपुरी (कोल्हापूर), म्हाकवे, हमिदवाडा येथील कार्यालयांना कुलुपे आहेत. त्यामुळे स्वकमाईतील रक्कम या कंपनीत गुंतविलेले हवालदिल झाले होते. दरम्यान, ताराराणी आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी केली होती. त्यामुळे या प्रकरणाचे भिंग फुटले होते. पुणे, राधानगरी, भुदरगड चिक्कोडी परिसरात जागा, जमीन घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र, एकही व्यवहार रितसर झालेला नसल्याचे समजते.बी. के. हिरो ते झिरो...घरात राजकीय पार्श्वभूमी नसतानाही बी. के. पाटील यांना बाजार समितीचे दहा वर्षे संचालक पद, त्यामध्ये पाच वर्षे सभापती पद, तसेच गोकुळ, बिद्री कारखान्यांतही संचालक केले. मात्र, त्यांनी २००७च्या दरम्यान राजकीय गट बदलून बिद्रीला पुन्हा संचालक होण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी लागली. त्यांना दोन्हींकडूनही पद मिळाले नाही. त्यामुळे दोन वर्षे ते राजकारणापासून अलिप्तच होते. त्यांनी बालाजी लकी ड्रॉ काढला. यामध्ये त्यांनी प्रचंड विश्वासार्हता संपादन केली. मात्र, कृषिबंधचे घोडे कुठे आडले कोण जाणे. राजकारणातील अत्यंत चतुर आणि धुरंधर असणारे पाटील हे यामध्ये गुरफटले गेले. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.संचालकांनी भान ठेवलेच नाही

  • एजंटाना अमाप कमिशनबरोबरच कंपनी चालकांनी अलिशान गाड्या घेतल्याची चर्चा आहे. आलिशान हॉटेलमध्ये बैठका, सभा मंडपासाठी वारेमाप खर्च आणि ऐशोआरामी केल्याची चर्चा आहे.
  • गुंतवणूकदारांची रक्कम परत करायची असते. याचे भानच त्यांनी ठेवले नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पै-पै जमा करून या कंपनीत गुंतवलेले पैसे वायाच जाणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजी