शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

‘कृषिबंध’चे पैसे गेले कुठे ? : गुंतवणूकदार हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 00:59 IST

गेल्या सहा महिन्यांपासून गुंतवणूकदार संचालकांचे उंबरे झिजवत आहेत. या तक्रारी थेट पोलिसांपर्यत गेल्या आणि कारवाईची टांगती तलवार समोर असतानाही पैसे परत करण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे

ठळक मुद्देकारवाईची भीती असूनही हालचाल नाहीच

दत्ता पाटील।म्हाकवे : कृषिबंध अ‍ॅग्रो लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून जादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा केले. मात्र, गुंतवणूकदारांना ते परत न केल्याप्रकरणी जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असणारे म्हाकवे (ता. कागल) येथील बंडोपंत ऊर्फ बी. के. पाटील यांच्यासह संचालक के. के. कुंभार (आणूर) यांना अटक केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून गुंतवणूकदार संचालकांचे उंबरे झिजवत आहेत. या तक्रारी थेट पोलिसांपर्यत गेल्या आणि कारवाईची टांगती तलवार समोर असतानाही पैसे परत करण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे इतकी रक्कम गेली तरी कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे.

सध्या कंपनीच्या नावावर स्थावर मालमत्ता नाही की रोख रक्कम शिल्लक नाही. तरीही पै-पै जमा करून गुंतवणूक केलेल्या हजारो गुंतवणूकदारंचे अद्याप कोट्यवधी रुपये या कंपनीकडे अडकले आहेत. असे असतानाही जबाबदार संचालक मंडळ एकत्रित येऊन रकमेची जबाबदारी न स्वीकारता एकमेकांकडे बोट दाखविण्यातच धन्यता मानत होते. कंपनी फायद्यात आली असती तर वाट्यासाठी मारामारी झाली असती. मग, तोट्याच्यावेळी काढता पाय का? असा सवाल गुंतवणूकदारांतून होत आहे.

कोल्हापूरसह सीमाभागातील हजारो गुंतवणूकदारांनी जादा व्याजाच्या आमिषाला बळी पडून कृषिबंध अ‍ॅग्रो कंपनीत कोट्यवधीची गुंतवणूक केल्याचे समजते. या कंपनीचे पहिले अध्यक्ष बंडोपंत पाटील-म्हाकवेकर यांनी २०१६ मध्ये राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांनी आपली जबाबदारी झटकली होती. तर विद्यमान अध्यक्ष शशिकांत जाधव-सोनगेकर हे सध्या अर्धांगवायूने आजारी आहेत. त्यांच्या पत्नी नंदा जाधव या कार्यकारी संचालिका होत्या.

या कंपनीच्या राजारामपुरी (कोल्हापूर), म्हाकवे, हमिदवाडा येथील कार्यालयांना कुलुपे आहेत. त्यामुळे स्वकमाईतील रक्कम या कंपनीत गुंतविलेले हवालदिल झाले होते. दरम्यान, ताराराणी आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी केली होती. त्यामुळे या प्रकरणाचे भिंग फुटले होते. पुणे, राधानगरी, भुदरगड चिक्कोडी परिसरात जागा, जमीन घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र, एकही व्यवहार रितसर झालेला नसल्याचे समजते.बी. के. हिरो ते झिरो...घरात राजकीय पार्श्वभूमी नसतानाही बी. के. पाटील यांना बाजार समितीचे दहा वर्षे संचालक पद, त्यामध्ये पाच वर्षे सभापती पद, तसेच गोकुळ, बिद्री कारखान्यांतही संचालक केले. मात्र, त्यांनी २००७च्या दरम्यान राजकीय गट बदलून बिद्रीला पुन्हा संचालक होण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी लागली. त्यांना दोन्हींकडूनही पद मिळाले नाही. त्यामुळे दोन वर्षे ते राजकारणापासून अलिप्तच होते. त्यांनी बालाजी लकी ड्रॉ काढला. यामध्ये त्यांनी प्रचंड विश्वासार्हता संपादन केली. मात्र, कृषिबंधचे घोडे कुठे आडले कोण जाणे. राजकारणातील अत्यंत चतुर आणि धुरंधर असणारे पाटील हे यामध्ये गुरफटले गेले. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.संचालकांनी भान ठेवलेच नाही

  • एजंटाना अमाप कमिशनबरोबरच कंपनी चालकांनी अलिशान गाड्या घेतल्याची चर्चा आहे. आलिशान हॉटेलमध्ये बैठका, सभा मंडपासाठी वारेमाप खर्च आणि ऐशोआरामी केल्याची चर्चा आहे.
  • गुंतवणूकदारांची रक्कम परत करायची असते. याचे भानच त्यांनी ठेवले नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पै-पै जमा करून या कंपनीत गुंतवलेले पैसे वायाच जाणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजी