शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

दाजीपूर अभयारण्याचा दर्जा सुधारणार कधी? राज्यातील सर्वांत जुने व पहिले अभयारण्य

By संदीप आडनाईक | Updated: September 21, 2022 18:02 IST

छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या दक्षिण-पश्चिमेकडील जंगल शिकारीसाठी राखून ठेवले होते. या जंगलाचे प्रथम १९५८ मध्ये दाजीपूर गवा अभयारण्य असे रूपांतर केले.

संदीप आडनाईककोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या दक्षिण-पश्चिमेकडील जंगल शिकारीसाठी राखून ठेवले होते. या जंगलाचे प्रथम १९५८ मध्ये दाजीपूर गवा अभयारण्य असे रूपांतर केले. राज्यातील सर्वांत जुने व पहिले अभयारण्य म्हणून ख्याती लाभलेल्या या अभयारण्याचा पुढे १९८५ मध्ये विस्तार करून राधानगरी वन्यजीव या अभयारण्याची निर्मिती झाली. पण आज या अभयारण्याचा दर्जा उंचाविण्यासाठी नि:स्वार्थी, प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. तसेच संशोधनात्मक अभ्यासालाही प्राधान्य द्यायला हवे.त्याचबरोबर पन्हाळा, गगनबावडा आणि शाहूवाडी परिसरात असलेल्या वन्यजीव आणि संपदेला अभय मिळण्यासाठी आणखी एका अभयारण्याची आवश्यकता आहे.सन १९९६ ते १९९८ या काळात अभयारण्यातील कोअर झोनमध्ये असणाऱ्या इदरगंज परिसरातील ८८८ हेक्टर पठारावर इंडाल या बहुराष्ट्रीय कंपनीने बॉक्साईट खाणकाम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. पण पर्यावरणप्रेमी संघटनांनी प्रखर विरोध करून व न्यायालयीन लढे देऊन हे खाणकाम प्रकल्प बंद पाडले होते. यामुळे अभयारण्याचे अस्तित्व टिकून राहिले.

जागतिक वारसास्थळाचा दर्जा (२०१२)वनविभागाने २००९ मध्ये कोल्हापुरातील वनस्पतितज्ज्ञ, प्राणितज्ज्ञ व पर्यावरणतज्ज्ञ यांच्या सहकार्याने अभयारण्याच्या जैवविविधतेबाबत सविस्तर सचित्र अहवाल तयार करून घेऊन अभयारण्यास जागतिक वारसास्थळ हा दर्जा प्राप्त होण्याबाबतचा प्रस्ताव अहवालासहित युनेस्कोस सादर केला. २०१२ मध्ये याला मंजुरी मिळाली आणि राधानगरी अभयारण्यास युनेस्कोकडून जागतिक वारसास्थळ हा दर्जा मिळाला. यामुळे याला आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान मिळाला.

रहिवाशी, ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ३५ वर्षांनंतरही कायम

अभयारण्यातील वन्यजिवांच्या विकासासाठी, माणसांचा हस्तक्षेप व अतिक्रमण टाळण्यासाठी नियमाप्रमाणे येथील मानवी वस्त्या, गावे आणि रहिवाशी, ग्रामस्थांचे पुनर्वसन होणे गरजेचे असते. पण अस्तित्वात येऊन ३५ वर्षे होऊनही हे झाले नाही. शासन व अभयारण्यग्रस्तांमध्ये तीव्र वैचारिक मतभेद आहेत. आवश्यक निधी नसल्याने पुनर्वसन प्रक्रिया रखडलेली आहे. -डॉ. मधुकर बाचूळकर, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ. 

राधानगरी वन्यजीव अभयारण्य

  • राधानगरी आणि काळम्मावाडी धरणांचे पाणलोट क्षेत्राचा अभयारण्यात समावेश
  • एकूण क्षेत्रफळ ३५१.१६ चौ. कि. मी.
  • राधानगरी २८ आणि गगनबावडा तालुक्यातील एक अशा एकूण २९ गावांचा समावेश
  • ५०० हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती
  • सस्तन प्राण्यांच्या ४७, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ५९, उभयचरांच्या २०, पक्ष्यांच्या ६४, फुलपाखरांच्या ६६ प्रजातींची नोंद
  • गवे, वाघ, बिबटे, भेकर, पिसोरी, सांबर, रानकुत्रे, शेकरू अशा वन्यप्राण्यांचा समावेश.
  • प्राणिगणनेतून गव्यांची नोंद : ६१० (२००४), १०९१ (२०१४).
  • वाघाचे पाणी, कोकण दर्शन, सावराई सडा, पाटाचा डंग, सांबरकोंड, काळा डंग, इदरगंज सडा, उगवाई अशी ठिकाणे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीforestजंगल