शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दाजीपूर अभयारण्याचा दर्जा सुधारणार कधी? राज्यातील सर्वांत जुने व पहिले अभयारण्य

By संदीप आडनाईक | Updated: September 21, 2022 18:02 IST

छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या दक्षिण-पश्चिमेकडील जंगल शिकारीसाठी राखून ठेवले होते. या जंगलाचे प्रथम १९५८ मध्ये दाजीपूर गवा अभयारण्य असे रूपांतर केले.

संदीप आडनाईककोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या दक्षिण-पश्चिमेकडील जंगल शिकारीसाठी राखून ठेवले होते. या जंगलाचे प्रथम १९५८ मध्ये दाजीपूर गवा अभयारण्य असे रूपांतर केले. राज्यातील सर्वांत जुने व पहिले अभयारण्य म्हणून ख्याती लाभलेल्या या अभयारण्याचा पुढे १९८५ मध्ये विस्तार करून राधानगरी वन्यजीव या अभयारण्याची निर्मिती झाली. पण आज या अभयारण्याचा दर्जा उंचाविण्यासाठी नि:स्वार्थी, प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. तसेच संशोधनात्मक अभ्यासालाही प्राधान्य द्यायला हवे.त्याचबरोबर पन्हाळा, गगनबावडा आणि शाहूवाडी परिसरात असलेल्या वन्यजीव आणि संपदेला अभय मिळण्यासाठी आणखी एका अभयारण्याची आवश्यकता आहे.सन १९९६ ते १९९८ या काळात अभयारण्यातील कोअर झोनमध्ये असणाऱ्या इदरगंज परिसरातील ८८८ हेक्टर पठारावर इंडाल या बहुराष्ट्रीय कंपनीने बॉक्साईट खाणकाम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. पण पर्यावरणप्रेमी संघटनांनी प्रखर विरोध करून व न्यायालयीन लढे देऊन हे खाणकाम प्रकल्प बंद पाडले होते. यामुळे अभयारण्याचे अस्तित्व टिकून राहिले.

जागतिक वारसास्थळाचा दर्जा (२०१२)वनविभागाने २००९ मध्ये कोल्हापुरातील वनस्पतितज्ज्ञ, प्राणितज्ज्ञ व पर्यावरणतज्ज्ञ यांच्या सहकार्याने अभयारण्याच्या जैवविविधतेबाबत सविस्तर सचित्र अहवाल तयार करून घेऊन अभयारण्यास जागतिक वारसास्थळ हा दर्जा प्राप्त होण्याबाबतचा प्रस्ताव अहवालासहित युनेस्कोस सादर केला. २०१२ मध्ये याला मंजुरी मिळाली आणि राधानगरी अभयारण्यास युनेस्कोकडून जागतिक वारसास्थळ हा दर्जा मिळाला. यामुळे याला आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान मिळाला.

रहिवाशी, ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ३५ वर्षांनंतरही कायम

अभयारण्यातील वन्यजिवांच्या विकासासाठी, माणसांचा हस्तक्षेप व अतिक्रमण टाळण्यासाठी नियमाप्रमाणे येथील मानवी वस्त्या, गावे आणि रहिवाशी, ग्रामस्थांचे पुनर्वसन होणे गरजेचे असते. पण अस्तित्वात येऊन ३५ वर्षे होऊनही हे झाले नाही. शासन व अभयारण्यग्रस्तांमध्ये तीव्र वैचारिक मतभेद आहेत. आवश्यक निधी नसल्याने पुनर्वसन प्रक्रिया रखडलेली आहे. -डॉ. मधुकर बाचूळकर, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ. 

राधानगरी वन्यजीव अभयारण्य

  • राधानगरी आणि काळम्मावाडी धरणांचे पाणलोट क्षेत्राचा अभयारण्यात समावेश
  • एकूण क्षेत्रफळ ३५१.१६ चौ. कि. मी.
  • राधानगरी २८ आणि गगनबावडा तालुक्यातील एक अशा एकूण २९ गावांचा समावेश
  • ५०० हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती
  • सस्तन प्राण्यांच्या ४७, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ५९, उभयचरांच्या २०, पक्ष्यांच्या ६४, फुलपाखरांच्या ६६ प्रजातींची नोंद
  • गवे, वाघ, बिबटे, भेकर, पिसोरी, सांबर, रानकुत्रे, शेकरू अशा वन्यप्राण्यांचा समावेश.
  • प्राणिगणनेतून गव्यांची नोंद : ६१० (२००४), १०९१ (२०१४).
  • वाघाचे पाणी, कोकण दर्शन, सावराई सडा, पाटाचा डंग, सांबरकोंड, काळा डंग, इदरगंज सडा, उगवाई अशी ठिकाणे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीforestजंगल