शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दाजीपूर अभयारण्याचा दर्जा सुधारणार कधी? राज्यातील सर्वांत जुने व पहिले अभयारण्य

By संदीप आडनाईक | Updated: September 21, 2022 18:02 IST

छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या दक्षिण-पश्चिमेकडील जंगल शिकारीसाठी राखून ठेवले होते. या जंगलाचे प्रथम १९५८ मध्ये दाजीपूर गवा अभयारण्य असे रूपांतर केले.

संदीप आडनाईककोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या दक्षिण-पश्चिमेकडील जंगल शिकारीसाठी राखून ठेवले होते. या जंगलाचे प्रथम १९५८ मध्ये दाजीपूर गवा अभयारण्य असे रूपांतर केले. राज्यातील सर्वांत जुने व पहिले अभयारण्य म्हणून ख्याती लाभलेल्या या अभयारण्याचा पुढे १९८५ मध्ये विस्तार करून राधानगरी वन्यजीव या अभयारण्याची निर्मिती झाली. पण आज या अभयारण्याचा दर्जा उंचाविण्यासाठी नि:स्वार्थी, प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. तसेच संशोधनात्मक अभ्यासालाही प्राधान्य द्यायला हवे.त्याचबरोबर पन्हाळा, गगनबावडा आणि शाहूवाडी परिसरात असलेल्या वन्यजीव आणि संपदेला अभय मिळण्यासाठी आणखी एका अभयारण्याची आवश्यकता आहे.सन १९९६ ते १९९८ या काळात अभयारण्यातील कोअर झोनमध्ये असणाऱ्या इदरगंज परिसरातील ८८८ हेक्टर पठारावर इंडाल या बहुराष्ट्रीय कंपनीने बॉक्साईट खाणकाम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. पण पर्यावरणप्रेमी संघटनांनी प्रखर विरोध करून व न्यायालयीन लढे देऊन हे खाणकाम प्रकल्प बंद पाडले होते. यामुळे अभयारण्याचे अस्तित्व टिकून राहिले.

जागतिक वारसास्थळाचा दर्जा (२०१२)वनविभागाने २००९ मध्ये कोल्हापुरातील वनस्पतितज्ज्ञ, प्राणितज्ज्ञ व पर्यावरणतज्ज्ञ यांच्या सहकार्याने अभयारण्याच्या जैवविविधतेबाबत सविस्तर सचित्र अहवाल तयार करून घेऊन अभयारण्यास जागतिक वारसास्थळ हा दर्जा प्राप्त होण्याबाबतचा प्रस्ताव अहवालासहित युनेस्कोस सादर केला. २०१२ मध्ये याला मंजुरी मिळाली आणि राधानगरी अभयारण्यास युनेस्कोकडून जागतिक वारसास्थळ हा दर्जा मिळाला. यामुळे याला आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान मिळाला.

रहिवाशी, ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ३५ वर्षांनंतरही कायम

अभयारण्यातील वन्यजिवांच्या विकासासाठी, माणसांचा हस्तक्षेप व अतिक्रमण टाळण्यासाठी नियमाप्रमाणे येथील मानवी वस्त्या, गावे आणि रहिवाशी, ग्रामस्थांचे पुनर्वसन होणे गरजेचे असते. पण अस्तित्वात येऊन ३५ वर्षे होऊनही हे झाले नाही. शासन व अभयारण्यग्रस्तांमध्ये तीव्र वैचारिक मतभेद आहेत. आवश्यक निधी नसल्याने पुनर्वसन प्रक्रिया रखडलेली आहे. -डॉ. मधुकर बाचूळकर, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ. 

राधानगरी वन्यजीव अभयारण्य

  • राधानगरी आणि काळम्मावाडी धरणांचे पाणलोट क्षेत्राचा अभयारण्यात समावेश
  • एकूण क्षेत्रफळ ३५१.१६ चौ. कि. मी.
  • राधानगरी २८ आणि गगनबावडा तालुक्यातील एक अशा एकूण २९ गावांचा समावेश
  • ५०० हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती
  • सस्तन प्राण्यांच्या ४७, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ५९, उभयचरांच्या २०, पक्ष्यांच्या ६४, फुलपाखरांच्या ६६ प्रजातींची नोंद
  • गवे, वाघ, बिबटे, भेकर, पिसोरी, सांबर, रानकुत्रे, शेकरू अशा वन्यप्राण्यांचा समावेश.
  • प्राणिगणनेतून गव्यांची नोंद : ६१० (२००४), १०९१ (२०१४).
  • वाघाचे पाणी, कोकण दर्शन, सावराई सडा, पाटाचा डंग, सांबरकोंड, काळा डंग, इदरगंज सडा, उगवाई अशी ठिकाणे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीforestजंगल