शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

आंबा घाटातील खचलेल्या रस्त्यांचे काम होणार कधी?, वाहतूक बनली धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 18:30 IST

गेल्या आठ महिन्यांपासून घाटातील तीन ठिकाणी खचलेल्या रस्त्याचे व भिंतीचे बांधकाम सुरू

आर.एस.लाडआंबा : एक वर्षापूर्वी म्हणजे २२ जुलै २०२१ रोजी आंबा घाटात आठ ठिकाणी दरड कोसळून घाट पावसाळ्यात बंद झाला. गेल्या आठ महिन्यांपासून घाटातील तीन ठिकाणी खचलेल्या रस्त्याचे व भिंतीचे बांधकाम सुरू आहे. पावसाळा सुरू झाला तरी दोन ठिकाणचे बांधकाम चालूच आहे. सध्या वजरे खिंडी लगत खचलेल्या काही भागाचे काँक्रिटीकरण, तर बांबू नर्सरीजवळील रस्त्याचे व कठड्यांचे तीस टक्के बांधकाम शिल्लक आहे.गेल्या ऑक्टोबरमध्ये प्रवासी व वाहतूक संघटनांनी लोकप्रतिनिधींना घाटात आणून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या उदासीनतेबाबत जाब विचारला. त्यानंतर घाटातील दरड सफाई व खचलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीला प्रारंभ झाला.ढगफुटीसदृश पावसाने घाटात भूस्खलन होऊन तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता खचून संरक्षक कठडे तुटले होते. दरीतून संरक्षण कठड्यांचा पाया सिमेंट काँक्रीटने भरून दरीच्या बाजूने भिंती उभ्या झाल्या आहेत. मात्र, येथील रस्ता पावसाने धुवून गेला आहे. घाटातील सूचना फलक तुटल्याने रात्रीच्या वेळी धुक्यात पुढ्यातील बाजूपट्टी दिसत नाही. त्यामुळे घाटातील प्रवास जिवघेणा बनला आहे.अतिवृष्टीकाळात अवजड वाहनांचे दळणवळण बंद ठेवण्याची मागणी असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे घाटातील रस्त्यांची रया उडाली आहे. अरुंद वळणावर धुक्यात हे खड्डे वाहकाला दिसत नसल्याने अपघात घडत आहेत. सुरक्षित दळणवळणासाठी रखडलेले बांधकाम तातडीने पूर्ण करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.सुदैवाने या पावसात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली नाही. दोन ठिकाणी किरकोळ पडलेली दरड घाटात मुक्कामी असलेल्या जेसीबीने वेळीच काढून घाट नियमित चालू ठेवल्याचे अभियंता रोहित तावडे यांनी स्पष्ट केले.

तर वीस दिवसांत संरक्षक भितीचे काम

  • एम. आय. काउंट इंद्रा कंपनीचे अभियंता रोहित तावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पावसाने उसंत दिली, तर वीस दिवसांत संरक्षक भिंतीचे काम होईल, ओझरे खिंडी व कळकदरा येथील वॉल बांधकाम पूर्ण झाले आहे.
  • काँक्रिटीकरणाचा काही भाग भराव मजबुतीकरणानंतर होईल. बांधकामाची वर्क ऑर्डर डिसेंबरला मिळाल्याने काम लांबणीवर पडल्याचे स्पष्ट केले.
टॅग्स :kolhapurकोल्हापूर