शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

हातकणंगले तालुक्याच्या विभाजनास मुहूर्त कधी ?

By admin | Updated: November 4, 2014 00:24 IST

नव्या सरकारकडून अपेक्षा : प्रशासकीय इमारत कागदावरच, तालुका क्रीडा संकुलाचे कामही रेंगाळले

दत्ता बीडकर - हातकणंगले  पारगाव-नीलेवाडीपासून कर्नाटक राज्याच्या हद्दीपर्यंत विस्तारलेला अडीच ब्लॉकचा तालुका विभाजन करून दोन किंवा तीन तालुके करण्याची २००१ पासूनची मागणी ऐरणीवर आहे. सात लाख दहा हजारांवर लोकसंख्या पोहोचलेला जिल्ह्यातील एकमेव तालुका आहे. दरडोई उत्पन्नामध्येही राज्यात अव्वल असताना विस्ताराने मोठ्या असलेल्या तालुक्याला सेवा-सुविधा पुरविताना प्रशासनाची दमछाक होत आहे. कोल्हापूर-सांगली राज्य मार्गाच्या चौपदरीकरणामध्ये जमीन आणि घरे गमावलेल्या विस्थापितांना गेली दोन वर्षे नुकसानभरपाई मिळालेली नाही. अनेक गावांतील जमिनीचा कब्जाच ठेकेदार कंपनीला दिला नाही. यामुळे दोन वर्षांची मुदत संपूनही चाळीस टक्के रस्ता पूर्ण नाही. साडेचार कोटींच्या प्रशासकीय इमारतीला गेले एक वर्षे निधीची दमडीही मिळाली नसल्यामुळे काम ठप्प आहे. तालुक्याच्या प्रश्नाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गांभीर्याने पाहत नसल्यामुळेच प्रश्नांची तड लावणार कोण? हे न सुटणारे कोडे आहे.हातकणंगले तालुका सहकार, औद्योगिक, कृषी यासह इतर क्षेत्रांत प्रगतीपथावर आहे. शहरीकरण आणि वाढती स्पर्धा यामुळे तालुक्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. इतर राज्यांबरोबरच जिल्ह्यातील इतर तालुक्यांतून, जिल्ह्यांतून या तालुक्याकडे दरवर्षी लोकांचा ओघ वाढतोच आहे. इचलकरंजीतील यंत्रमाग, सायझिंग व्यवसाय, जवाहर, पंचगंगा, शरद साखर कारखान्यांकडील वाढता कामगार वर्ग, त्यांच्या जोडीला असलेल्या सहकारातील सूतगिरण्या, शिरोली औद्योगिक वसाहत, लक्ष्मी औद्योगिक वसाहत आणि हुपरी यळगूड पंचतारांकित वसाहत ही या वाढत्या लोकसंख्येला कारणीभूत आहेत. तालुक्याची लोकसंख्या आज गणिताच्या पलीकडे गेली आहे. अडीच ब्लॉकचा एकच तालुका असल्यामुळे सेवा-सुविधांचा पुरवठा करताना तालुक्यातील प्रशासनाची दमछाक होत आहे. म्हणूनच २००१ पासून वडगाव, हातकणंगले आणि हुपरी किंवा इचलकरंजी असे तीन तालुके करावेत, अशी ज्या-त्या विभागाची मागणी आहे. मात्र, प्रशासनाकडून हातकणंगले, इचलकरंजी असे दोन तालुके होण्यासाठी आपली यंत्रणा चारपाच वर्षे हलवूनही याला यश आले नसल्यामुळे तालुका विभाजनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तालुक्यातील संपूर्ण शासकीय कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी दोन वर्षांपूर्वी साडेचार कोटींची प्रशासकीय इमारत मंजूर केली. मात्र, गेल्या एक वर्षात एक रुपयाही या इमारतीसाठी शासनाकडून मिळाला नसल्यामुळे प्रशासकीय इमारतीचे काम रखडले आहे. तालुका क्रीडा संकुलाचा विषय २००५ पासून प्रलंबित आहे. संकुलासाठी २५ लाख रुपये निधी भारतीय स्टेट बॅँकेच्या शाखेत पडून आहे. मात्र, क्रीडा संकुलाची तड लावण्यास कोणीही पुढे यायला तयार नाही. हातकणंगले ग्रामपंचायतीने २००१ मध्ये जमीन दिलेली असताना या जागेवर क्रीडा संकुल होत नाही. पर्यटनाला चालना हवीतीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि ‘क’ वर्ग पर्यटन स्थळे विकास कार्यक्रम रामलिंग, अलमप्रभू, धुळोबा, रेणुका मंदिर (आळते), बिरदेव मंदिर (पट्टणकोडोली), नागनाथ मंदिर (नरंदे) यांसह इतर धार्मिक ठिकाणी राबवून पर्यटनाला चालना देण्याची गरज आहे.पर्यायी मार्गाची गरजकोल्हापूर-सांगली राज्यमार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रुकडी-गांधीनगर दरम्यान पंचगंगा नदीवर पूल उभारून इचलकरंजीसह कुरुंदवाड पर्यटनाच्या वाहनधारकांसाठी पर्यायी मार्गाची सोय करणे गरजेचे आहे.नगरपरिषदांची मागणीदहा हजारांवरील लोकसंख्या असलेल्या कबनूर, हुपरी, शिरोली, रेंदाळ, पट्टणकोडोली, कोरोची, हातकणंगले, कुंभोज, रुकडी या गावात नगरपंचायती / नगरपरिषदेची मागणी होऊनही ती पूर्ण केली जात नाही. जिल्हा प्रशासनाकडून वरील गावे शहरीकरणाचा भाग बनली असल्याचा अहवाल नगरविकास विभागाकडे पाठवूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्याच्या, गावाच्या ग्रामपंचायती नगरपरिषदा करण्याचा निर्णय होऊनही हातकणंगले ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदांमध्ये झालेले नाही.कोल्हापूर-सांगली राज्य मार्गाचे खासगीकरणातून चौपदरीकरण करण्याचा निर्णय झाला. आॅक्टोबर २०१२ मध्ये कामाला सुरुवात झाली. रस्त्यांमध्ये व जमिनी जाणाऱ्या शेतकरी व मिळकतधारक विस्थापितांना दोन वर्षे झाली, तरी नुकसान भरपाई मिळालेली नाही. हेर्ले, अतिग्रे, हातकणंगले या ठिकाणच्या जमिनीचा कब्जाच प्रशासनाकडून अद्याप ठेकेदार कंपनीला दिला नसल्यामुळे गेली दोन वषे फक्त ४० टक्के काम पूर्ण झाले. आॅक्टोबर २०१४ ला या कामाची मुदत संपूनही रस्ता पूर्ण नाही.बाजारांचे नियोजन नाहीमोठ्या लोकवस्तीबरोबर लहान-लहान गावांमध्येही आठवडा बाजाराचे नियोजन झाले नाही. यामुळे ग्रामीण भागातील बाजारासाठीचा ओढा शहराकडे जाणारा थांबला आहे. अशा आठवडा बाजारासाठी सोयी-सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून योग्य पावले उचलण्याची गरज आहे.हातकणंगले तालुका