शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या समितीचे फलित काय?, दिलीप देसाई यांची विचारणा

By समीर देशपांडे | Updated: May 13, 2024 17:52 IST

ही समिती नेमून साडे नऊ वर्षे झाली

कोल्हापूर : पंचगंगा नदीचेप्रदूषण रोखण्यासाठी साडे नऊ वर्षांपूर्वी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. परंतू या समितीच्या स्थापनेचे फलित काय अशी विचारणा ‘प्रजासत्ताक’संस्थेचे दिलीप देसाई यांनी केली आहे. देसाई यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली असून सध्याच्या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी वेळ मिळावी यासाठी देसाई यांनी  प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांना मेलव्दारे निवेदन पाठवले आहे.देसाई निवेदनात म्हणतात, सन १९९७ मध्ये उच्च न्यायालयाने पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या निर्देशांचे पालन न झाल्यामुळे प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेने २०१० साली जनहित याचिका दाखल केली. याच मुद्द्यावर दाखल झालेल्या इतर याचिकांसोबत या याचिकेची एकत्रित सुनावणी होऊन दिनांक १० नोव्हेंबर २०१४ रोजी उच्च न्यायालयाने पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रयत्नांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.ही समिती नेमून साडे नऊ वर्षे झाली. परंतू प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी अशी उपाययोजना झालेली नाही असे दिसून येत आहे. म्हणूनच नेमके यासाठी काय प्रयत्न झाले, त्यातून किती यश मिळाले याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. यासाठी पंचगंगा नदीची आजची परिस्थिती, पंचगंगा नदीत मिसळणाऱ्या नाल्यांची सद्यस्थिती, केलेल्या उपाययोजना आणि त्यांचा प्रभाव या बाबींची पाहणी करून त्याचा अहवाल न्यायालयासमोर येणे आवश्यक आहे. तरी आपण या सर्व ठिकाणांची संयुक्त पाहणी करण्याकामी आपल्या कार्यालयाचा दिनांक आणि वेळ कळवावा अशी मागणी देसाई यांनी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण