शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या समितीचे फलित काय?, दिलीप देसाई यांची विचारणा

By समीर देशपांडे | Updated: May 13, 2024 17:52 IST

ही समिती नेमून साडे नऊ वर्षे झाली

कोल्हापूर : पंचगंगा नदीचेप्रदूषण रोखण्यासाठी साडे नऊ वर्षांपूर्वी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. परंतू या समितीच्या स्थापनेचे फलित काय अशी विचारणा ‘प्रजासत्ताक’संस्थेचे दिलीप देसाई यांनी केली आहे. देसाई यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली असून सध्याच्या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी वेळ मिळावी यासाठी देसाई यांनी  प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांना मेलव्दारे निवेदन पाठवले आहे.देसाई निवेदनात म्हणतात, सन १९९७ मध्ये उच्च न्यायालयाने पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या निर्देशांचे पालन न झाल्यामुळे प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेने २०१० साली जनहित याचिका दाखल केली. याच मुद्द्यावर दाखल झालेल्या इतर याचिकांसोबत या याचिकेची एकत्रित सुनावणी होऊन दिनांक १० नोव्हेंबर २०१४ रोजी उच्च न्यायालयाने पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रयत्नांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.ही समिती नेमून साडे नऊ वर्षे झाली. परंतू प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी अशी उपाययोजना झालेली नाही असे दिसून येत आहे. म्हणूनच नेमके यासाठी काय प्रयत्न झाले, त्यातून किती यश मिळाले याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. यासाठी पंचगंगा नदीची आजची परिस्थिती, पंचगंगा नदीत मिसळणाऱ्या नाल्यांची सद्यस्थिती, केलेल्या उपाययोजना आणि त्यांचा प्रभाव या बाबींची पाहणी करून त्याचा अहवाल न्यायालयासमोर येणे आवश्यक आहे. तरी आपण या सर्व ठिकाणांची संयुक्त पाहणी करण्याकामी आपल्या कार्यालयाचा दिनांक आणि वेळ कळवावा अशी मागणी देसाई यांनी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण