शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

थेट पाइपलाइनच्या घोषणेचे काय झालं, चंद्रकांत पाटील यांचा पालकमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 14:53 IST

सर्वाधिक महिला प्रतिनिधी भाजपमध्ये आहेत. छत्रपती ताराराणींच्या कोल्हापूर शहरातून काँग्रेसला ५० वर्षांच्या काळात महिला लोकप्रतिनिधी का देता आली नाही

कोल्हापूर : थेट पाइपलाइन पाणी योजना झाली नाही तर निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा सतेज पाटील यांनी केली होती. त्या घोषणेचे काय झाले असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी उपस्थित केला.कोल्हापूर उत्तरचे भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यान येथे आज, शुक्रवारी सकाळी ‘मिसळ पे चर्चा’ झाली. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, सत्यजित कदम, महेश जाधव, प्रा. जयंत पाटील, अजिंक्य चव्हाण, बाजीराव चव्हाण, अजित ठाणेकर, अशोक देसाई, विजयसिंह खाडे पाटील, सुदर्शन सावंत, मुरलीधर जाधव, अजित हारुगले, भारती जोशी, कविता पाटील या मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.यावेळी बोलताना पाटील म्हणाले, सर्वाधिक महिला प्रतिनिधी भाजपमध्ये आहेत. छत्रपती ताराराणींच्या कोल्हापूर शहरातून काँग्रेसला ५० वर्षांच्या काळात महिला लोकप्रतिनिधी का देता आली नाही. असा प्रश्न विचारुन पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात कोल्हापुरात झालेल्या विकासकामांचा पाढाच यावेळी पाटील यांनी जनतेसमोर मांडला.धनंजय महाडिक म्हणाले, महापालिकेच्या उद्यानात स्वखर्चातून महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याचा प्रस्ताव मी दिला होता; पण श्रेयवादासाठी त्यांनी तो प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे अजूनही कोल्हापूरकरांना किमान नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात अनेक विकासकामे उभी केली. कोल्हापूर टोलमुक्त केले; पण विद्यमान पालकमंत्र्यांनी कोल्हापूरसाठी काहीही केलेले नाही. याउलट सुरू असलेले विकास प्रकल्प बंद पाडण्याचे कामच त्यांनी केले.सत्यजित कदम म्हणाले, ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर व्हावी अशी आमची भूमिका होती; पण विरोधकांची विकासावर बोलण्याची मानसिकता नाही. महापालिकेच्या माध्यमातून काम करीत असताना, विकासकामांची मागणी केली, त्याला मान्यता देण्याऐवजी आडकाठी आणण्याचे काम करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील