शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

थेट पाइपलाइनच्या घोषणेचे काय झालं, चंद्रकांत पाटील यांचा पालकमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 14:53 IST

सर्वाधिक महिला प्रतिनिधी भाजपमध्ये आहेत. छत्रपती ताराराणींच्या कोल्हापूर शहरातून काँग्रेसला ५० वर्षांच्या काळात महिला लोकप्रतिनिधी का देता आली नाही

कोल्हापूर : थेट पाइपलाइन पाणी योजना झाली नाही तर निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा सतेज पाटील यांनी केली होती. त्या घोषणेचे काय झाले असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी उपस्थित केला.कोल्हापूर उत्तरचे भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यान येथे आज, शुक्रवारी सकाळी ‘मिसळ पे चर्चा’ झाली. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, सत्यजित कदम, महेश जाधव, प्रा. जयंत पाटील, अजिंक्य चव्हाण, बाजीराव चव्हाण, अजित ठाणेकर, अशोक देसाई, विजयसिंह खाडे पाटील, सुदर्शन सावंत, मुरलीधर जाधव, अजित हारुगले, भारती जोशी, कविता पाटील या मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.यावेळी बोलताना पाटील म्हणाले, सर्वाधिक महिला प्रतिनिधी भाजपमध्ये आहेत. छत्रपती ताराराणींच्या कोल्हापूर शहरातून काँग्रेसला ५० वर्षांच्या काळात महिला लोकप्रतिनिधी का देता आली नाही. असा प्रश्न विचारुन पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात कोल्हापुरात झालेल्या विकासकामांचा पाढाच यावेळी पाटील यांनी जनतेसमोर मांडला.धनंजय महाडिक म्हणाले, महापालिकेच्या उद्यानात स्वखर्चातून महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याचा प्रस्ताव मी दिला होता; पण श्रेयवादासाठी त्यांनी तो प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे अजूनही कोल्हापूरकरांना किमान नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात अनेक विकासकामे उभी केली. कोल्हापूर टोलमुक्त केले; पण विद्यमान पालकमंत्र्यांनी कोल्हापूरसाठी काहीही केलेले नाही. याउलट सुरू असलेले विकास प्रकल्प बंद पाडण्याचे कामच त्यांनी केले.सत्यजित कदम म्हणाले, ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर व्हावी अशी आमची भूमिका होती; पण विरोधकांची विकासावर बोलण्याची मानसिकता नाही. महापालिकेच्या माध्यमातून काम करीत असताना, विकासकामांची मागणी केली, त्याला मान्यता देण्याऐवजी आडकाठी आणण्याचे काम करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील