शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार : ऊसतोडीसाठी मशीनचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 21:14 IST

ऊस गळीत हंगामात ऊसतोड मजुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने ऊसतोडीसाठी मशीनचा वापर होत आहे. यंदा बहुतेक गावांतील शेतकऱ्यांनी गट करून मशीन घेतल्याने मजुरांच्या समस्येवर

ठळक मुद्देचाऱ्याचे दर भडकण्याची शक्यताऊसतोड मजुरांच्या समस्येवर पर्याय

गणपती कोळी ।कुरुंदवाड : ऊस गळीत हंगामात ऊसतोड मजुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने ऊसतोडीसाठी मशीनचा वापर होत आहे. यंदा बहुतेक गावांतील शेतकऱ्यांनी गट करून मशीन घेतल्याने मजुरांच्या समस्येवर तोडगा निघाला आहे. मात्र, ओल्या चाºयाचा प्रश्न गंभीर बनणार आहे.

शेतकरी शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करतो. हमीभाव व हक्काचे पीक म्हणून उसाचे पीक घेत असला तरी शेतकऱ्याला या पिकातून चारा उपलब्ध होत असल्याने ऊस पिकालाच शेतकरी प्राधान्य देतो.

उसाला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी संपूर्ण शेती ऊस पिकाखालीच आणत आहे. नदीकाठची गवती कुरणाची शेतीही ऊस पिकाखाली आली आहे. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. ऊस गळीत हंगाम सुरू झाला की, उसाचा वाडा (शेंडा) चाऱ्यासाठी वापरत असल्याने चाºयाचा प्रश्न मिटतो. हा हंगाम पाच ते सहा महिने चालत असल्याने हा चारा मिरज, सांगोला तालुक्यातील दुष्काळी भागापर्यंत जातो. त्यामुळे पशुचालक शेतकºयांचे ऊसतोडी सुरू होण्याकडे लक्ष असते.

ऊसतोड करण्यासाठी बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, तर कर्नाटकातील विजापूर, आदी जिल्ह्यांतील दुष्काळी भागातील मजूर येतात. मात्र, ऊस वाहतूकदार, कारखान्यांकडून पैशाची उचल करूनही अनेक मजूर ऊसतोडीसाठी येत नसल्याने ऊस वाहतूक करणाºया वाहनमालकांचे लाखो रुपये बुडत होते. अनेक वाहनमालक आत्महत्येपर्यंत पोहोचले होते. शिवाय मजूर टोळ्यांची संख्या घटल्याने उन्हाळ्यात साखर कारखान्यांना ऊसपुरवठा कमी होत होता. त्यामुळे ‘नो केन’ करावे लागत असल्यानेसाखर कारखान्यांनाही आर्थिक फटका बसता होता.

या मजुरांवर पर्याय म्हणून साखर कारखान्यांनी ऊसतोड मशीन आणली आहेत. प्रारंभीच्या काळात या मशीनच्या तोडीला शेतकरी नकार देत होते. मात्र, गतवर्षी हा प्रयोगसर्वच कारखान्यांनी यशस्वी केल्याने यंदाच्या गळीत हंगामातमशीनचा सर्रास वापर होणार आहे. अनेक गावांत तीन ते चार शेतकºयांनी एकत्र येऊन एक कोटीपर्यंतच्या खर्चाचे ऊसतोडणी मशीनघेतल्याने मशीनव्दारे ऊसतोडणीची मानसिकता शेतकऱ्यांची झाली आहे.तोडणी मजुरांवर पर्यायऊसतोडीसाठी मशीन आल्याने तोडणी मजुरांवर पर्याय निघाला असला तरी मशीनमध्ये उसाचा शेंडा (वाडा) बारीक करून फेकला जात असल्याने चारा मिळणार नाही. त्यामुळे सध्या चाºयाची टंचाई निर्माण झाली आहे. गळीत हंगाम सुरू होण्याकडे पशुपालक शेतकºयांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, मशीनने ऊसतोडीचे प्रमाण वाढणार असल्याने चाºयाचे दरही भडकणार आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणात चारा टंचाई भासणार असल्याने गळीत हंगामातही चाऱ्याची समस्या गंभीर बनणार आहे, हे निश्चित.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी