शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
5
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
6
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
7
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
8
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
9
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
10
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
11
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
12
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
13
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
14
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
15
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
16
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
17
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
18
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
19
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
20
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग

ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार : ऊसतोडीसाठी मशीनचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 21:14 IST

ऊस गळीत हंगामात ऊसतोड मजुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने ऊसतोडीसाठी मशीनचा वापर होत आहे. यंदा बहुतेक गावांतील शेतकऱ्यांनी गट करून मशीन घेतल्याने मजुरांच्या समस्येवर

ठळक मुद्देचाऱ्याचे दर भडकण्याची शक्यताऊसतोड मजुरांच्या समस्येवर पर्याय

गणपती कोळी ।कुरुंदवाड : ऊस गळीत हंगामात ऊसतोड मजुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने ऊसतोडीसाठी मशीनचा वापर होत आहे. यंदा बहुतेक गावांतील शेतकऱ्यांनी गट करून मशीन घेतल्याने मजुरांच्या समस्येवर तोडगा निघाला आहे. मात्र, ओल्या चाºयाचा प्रश्न गंभीर बनणार आहे.

शेतकरी शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करतो. हमीभाव व हक्काचे पीक म्हणून उसाचे पीक घेत असला तरी शेतकऱ्याला या पिकातून चारा उपलब्ध होत असल्याने ऊस पिकालाच शेतकरी प्राधान्य देतो.

उसाला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी संपूर्ण शेती ऊस पिकाखालीच आणत आहे. नदीकाठची गवती कुरणाची शेतीही ऊस पिकाखाली आली आहे. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. ऊस गळीत हंगाम सुरू झाला की, उसाचा वाडा (शेंडा) चाऱ्यासाठी वापरत असल्याने चाºयाचा प्रश्न मिटतो. हा हंगाम पाच ते सहा महिने चालत असल्याने हा चारा मिरज, सांगोला तालुक्यातील दुष्काळी भागापर्यंत जातो. त्यामुळे पशुचालक शेतकºयांचे ऊसतोडी सुरू होण्याकडे लक्ष असते.

ऊसतोड करण्यासाठी बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, तर कर्नाटकातील विजापूर, आदी जिल्ह्यांतील दुष्काळी भागातील मजूर येतात. मात्र, ऊस वाहतूकदार, कारखान्यांकडून पैशाची उचल करूनही अनेक मजूर ऊसतोडीसाठी येत नसल्याने ऊस वाहतूक करणाºया वाहनमालकांचे लाखो रुपये बुडत होते. अनेक वाहनमालक आत्महत्येपर्यंत पोहोचले होते. शिवाय मजूर टोळ्यांची संख्या घटल्याने उन्हाळ्यात साखर कारखान्यांना ऊसपुरवठा कमी होत होता. त्यामुळे ‘नो केन’ करावे लागत असल्यानेसाखर कारखान्यांनाही आर्थिक फटका बसता होता.

या मजुरांवर पर्याय म्हणून साखर कारखान्यांनी ऊसतोड मशीन आणली आहेत. प्रारंभीच्या काळात या मशीनच्या तोडीला शेतकरी नकार देत होते. मात्र, गतवर्षी हा प्रयोगसर्वच कारखान्यांनी यशस्वी केल्याने यंदाच्या गळीत हंगामातमशीनचा सर्रास वापर होणार आहे. अनेक गावांत तीन ते चार शेतकºयांनी एकत्र येऊन एक कोटीपर्यंतच्या खर्चाचे ऊसतोडणी मशीनघेतल्याने मशीनव्दारे ऊसतोडणीची मानसिकता शेतकऱ्यांची झाली आहे.तोडणी मजुरांवर पर्यायऊसतोडीसाठी मशीन आल्याने तोडणी मजुरांवर पर्याय निघाला असला तरी मशीनमध्ये उसाचा शेंडा (वाडा) बारीक करून फेकला जात असल्याने चारा मिळणार नाही. त्यामुळे सध्या चाºयाची टंचाई निर्माण झाली आहे. गळीत हंगाम सुरू होण्याकडे पशुपालक शेतकºयांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, मशीनने ऊसतोडीचे प्रमाण वाढणार असल्याने चाºयाचे दरही भडकणार आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणात चारा टंचाई भासणार असल्याने गळीत हंगामातही चाऱ्याची समस्या गंभीर बनणार आहे, हे निश्चित.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी