शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार : ऊसतोडीसाठी मशीनचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 21:14 IST

ऊस गळीत हंगामात ऊसतोड मजुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने ऊसतोडीसाठी मशीनचा वापर होत आहे. यंदा बहुतेक गावांतील शेतकऱ्यांनी गट करून मशीन घेतल्याने मजुरांच्या समस्येवर

ठळक मुद्देचाऱ्याचे दर भडकण्याची शक्यताऊसतोड मजुरांच्या समस्येवर पर्याय

गणपती कोळी ।कुरुंदवाड : ऊस गळीत हंगामात ऊसतोड मजुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने ऊसतोडीसाठी मशीनचा वापर होत आहे. यंदा बहुतेक गावांतील शेतकऱ्यांनी गट करून मशीन घेतल्याने मजुरांच्या समस्येवर तोडगा निघाला आहे. मात्र, ओल्या चाºयाचा प्रश्न गंभीर बनणार आहे.

शेतकरी शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करतो. हमीभाव व हक्काचे पीक म्हणून उसाचे पीक घेत असला तरी शेतकऱ्याला या पिकातून चारा उपलब्ध होत असल्याने ऊस पिकालाच शेतकरी प्राधान्य देतो.

उसाला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी संपूर्ण शेती ऊस पिकाखालीच आणत आहे. नदीकाठची गवती कुरणाची शेतीही ऊस पिकाखाली आली आहे. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. ऊस गळीत हंगाम सुरू झाला की, उसाचा वाडा (शेंडा) चाऱ्यासाठी वापरत असल्याने चाºयाचा प्रश्न मिटतो. हा हंगाम पाच ते सहा महिने चालत असल्याने हा चारा मिरज, सांगोला तालुक्यातील दुष्काळी भागापर्यंत जातो. त्यामुळे पशुचालक शेतकºयांचे ऊसतोडी सुरू होण्याकडे लक्ष असते.

ऊसतोड करण्यासाठी बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, तर कर्नाटकातील विजापूर, आदी जिल्ह्यांतील दुष्काळी भागातील मजूर येतात. मात्र, ऊस वाहतूकदार, कारखान्यांकडून पैशाची उचल करूनही अनेक मजूर ऊसतोडीसाठी येत नसल्याने ऊस वाहतूक करणाºया वाहनमालकांचे लाखो रुपये बुडत होते. अनेक वाहनमालक आत्महत्येपर्यंत पोहोचले होते. शिवाय मजूर टोळ्यांची संख्या घटल्याने उन्हाळ्यात साखर कारखान्यांना ऊसपुरवठा कमी होत होता. त्यामुळे ‘नो केन’ करावे लागत असल्यानेसाखर कारखान्यांनाही आर्थिक फटका बसता होता.

या मजुरांवर पर्याय म्हणून साखर कारखान्यांनी ऊसतोड मशीन आणली आहेत. प्रारंभीच्या काळात या मशीनच्या तोडीला शेतकरी नकार देत होते. मात्र, गतवर्षी हा प्रयोगसर्वच कारखान्यांनी यशस्वी केल्याने यंदाच्या गळीत हंगामातमशीनचा सर्रास वापर होणार आहे. अनेक गावांत तीन ते चार शेतकºयांनी एकत्र येऊन एक कोटीपर्यंतच्या खर्चाचे ऊसतोडणी मशीनघेतल्याने मशीनव्दारे ऊसतोडणीची मानसिकता शेतकऱ्यांची झाली आहे.तोडणी मजुरांवर पर्यायऊसतोडीसाठी मशीन आल्याने तोडणी मजुरांवर पर्याय निघाला असला तरी मशीनमध्ये उसाचा शेंडा (वाडा) बारीक करून फेकला जात असल्याने चारा मिळणार नाही. त्यामुळे सध्या चाºयाची टंचाई निर्माण झाली आहे. गळीत हंगाम सुरू होण्याकडे पशुपालक शेतकºयांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, मशीनने ऊसतोडीचे प्रमाण वाढणार असल्याने चाºयाचे दरही भडकणार आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणात चारा टंचाई भासणार असल्याने गळीत हंगामातही चाऱ्याची समस्या गंभीर बनणार आहे, हे निश्चित.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी