शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

छे...छे नैसर्गिक नाले नव्हे...ही तर गटारगंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:21 IST

अमर पाटील : कधीकाळी कात्यायानी टेकड्यातून स्वच्छ पाण्याने खळाळून वाहणारे नैसर्गिक नाले आता गटारगंगा बनल्याचे चित्र आहे. या नाल्यांवर ...

अमर पाटील : कधीकाळी कात्यायानी टेकड्यातून स्वच्छ पाण्याने खळाळून वाहणारे नैसर्गिक नाले आता गटारगंगा बनल्याचे चित्र आहे. या नाल्यांवर झालेले अतिक्रमण, नागरी वस्त्यांमधून सोडणारे सांडपाणी यामुळे नैसर्गिक नाल्यांचे पाणी प्रचंड दूषित बनले आहे. रंकाळा तलावाला येऊन मिळणाऱ्या आसपासच्या परिसरातील बारा नाल्यांचीही हीच अवस्था असल्याने या दोन्ही तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. उपनगरातील विविध प्रभागातून लहान-मोठे नैसर्गिक नाले बारमाही वाहतात. एकेकाळी स्वच्छ पाण्याने ओसंडून वाहणाऱ्या या नैसर्गिक नाल्यांमध्ये आजमितीला अस्ताव्यस्त वाढत्या नागरी वस्त्यांचा घनकचरा, सांडपाणी मिसळत असल्याने हे नाले आहेत की गटारगंगा असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरी वस्त्या अपार्टमेंट व विविध व्यावसायिकांकडून कोणत्याही प्रक्रिया न करता सांडपाणी पाणी थेट नाल्यात सोडले जाते. नाल्यावर अतिक्रमणे करून नैसर्गिक नाले वळविण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी नालेच बुजविण्यात आले आहेत. मात्र, याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या नाल्यांचे अस्तित्व संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

नैसर्गिक नाले प्रदूषित झाल्याने येथील रहिवासी क्षेत्रात प्रचंड दुर्गंधी पसरली असून वर्षभर डासांचे थैमान असते. त्यामुळे या नैसर्गिक नाल्यांची होणारी दुर्दशा दिवसेंदिवस गंभीर होत असून प्रदूषण थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

कोट : अस्ताव्यस्त वाढणाऱ्या नागरी वस्त्यांमधील सांडपाणी नियोजन न केल्याने नैसर्गिक नाल्यांची गटारगंगा झाली आहे. राजलक्ष्मी नगरात तर प्रतिवर्षी नाले तुंबून पावसाळ्यात नागरी वस्तीत पाणी शिरले होते. क्रेशेर चौक ते संभाजीनगर, देवकर पाणंद ते साळोखेनगर रस्त्यावर गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागतो. नाल्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी.

- सुधीर राणे, राजलक्ष्मीनगर