शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

छे...छे नैसर्गिक नाले नव्हे...ही तर गटारगंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:21 IST

अमर पाटील : कधीकाळी कात्यायानी टेकड्यातून स्वच्छ पाण्याने खळाळून वाहणारे नैसर्गिक नाले आता गटारगंगा बनल्याचे चित्र आहे. या नाल्यांवर ...

अमर पाटील : कधीकाळी कात्यायानी टेकड्यातून स्वच्छ पाण्याने खळाळून वाहणारे नैसर्गिक नाले आता गटारगंगा बनल्याचे चित्र आहे. या नाल्यांवर झालेले अतिक्रमण, नागरी वस्त्यांमधून सोडणारे सांडपाणी यामुळे नैसर्गिक नाल्यांचे पाणी प्रचंड दूषित बनले आहे. रंकाळा तलावाला येऊन मिळणाऱ्या आसपासच्या परिसरातील बारा नाल्यांचीही हीच अवस्था असल्याने या दोन्ही तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. उपनगरातील विविध प्रभागातून लहान-मोठे नैसर्गिक नाले बारमाही वाहतात. एकेकाळी स्वच्छ पाण्याने ओसंडून वाहणाऱ्या या नैसर्गिक नाल्यांमध्ये आजमितीला अस्ताव्यस्त वाढत्या नागरी वस्त्यांचा घनकचरा, सांडपाणी मिसळत असल्याने हे नाले आहेत की गटारगंगा असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरी वस्त्या अपार्टमेंट व विविध व्यावसायिकांकडून कोणत्याही प्रक्रिया न करता सांडपाणी पाणी थेट नाल्यात सोडले जाते. नाल्यावर अतिक्रमणे करून नैसर्गिक नाले वळविण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी नालेच बुजविण्यात आले आहेत. मात्र, याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या नाल्यांचे अस्तित्व संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

नैसर्गिक नाले प्रदूषित झाल्याने येथील रहिवासी क्षेत्रात प्रचंड दुर्गंधी पसरली असून वर्षभर डासांचे थैमान असते. त्यामुळे या नैसर्गिक नाल्यांची होणारी दुर्दशा दिवसेंदिवस गंभीर होत असून प्रदूषण थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

कोट : अस्ताव्यस्त वाढणाऱ्या नागरी वस्त्यांमधील सांडपाणी नियोजन न केल्याने नैसर्गिक नाल्यांची गटारगंगा झाली आहे. राजलक्ष्मी नगरात तर प्रतिवर्षी नाले तुंबून पावसाळ्यात नागरी वस्तीत पाणी शिरले होते. क्रेशेर चौक ते संभाजीनगर, देवकर पाणंद ते साळोखेनगर रस्त्यावर गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागतो. नाल्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी.

- सुधीर राणे, राजलक्ष्मीनगर