शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

बिहारसाठी कोल्हापुरातून दर रविवारी साप्ताहिक रेल्वे, उन्हाळी सुटीसाठी खास सोय; कधीपासून सुरु.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:50 IST

कोल्हापूर : उन्हाळी सुटीत उत्तर भारतात जाण्यासाठी बिहारीबाबूंच्या सोयीसाठी मध्ये रेल्वेने कोल्हापूर -कटीहार विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू केली आहे. ...

कोल्हापूर : उन्हाळी सुटीत उत्तर भारतात जाण्यासाठी बिहारीबाबूंच्या सोयीसाठी मध्ये रेल्वेनेकोल्हापूर-कटीहार विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू केली आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना बिहारमध्ये जाण्यायेण्यासाठी कोल्हापूर ते कटीहार क्रमांक ०१४०५/०१४०६ ही साप्ताहिक विशेष रेल्वे दि. ६ एप्रिलपासून दर रविवारी सुरू होत आहे. या विशेष रेल्वेचा फायदा प्रवाशांनी घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवरून ६ एप्रिलपासून २७ एप्रिलपर्यंत ही उन्हाळी सुटीच्या कालावधीपुरती एक्स्प्रेस धावणार आहे. बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना ही गाडी सोयीची ठरणार आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून ही विशेष साप्ताहिक रेल्वेसाठी सांगलीचाही थांबा आहे. यामुळे बिहारला जाणाऱ्या किंवा तिकडून येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. बिहारी नागरिक विविध कामासाठी मोठ्या संख्येने पश्चिम महाराष्ट्रात वास्तव्य करीत आहेत. त्यांच्यासाठी बिहारच्या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे गाडीची मागणी गेल्या पन्नास वर्षांपासून होत आहे. या मागणीला प्रतिसाद देत अखेर मध्य रेल्वेने कोल्हापुरातून बिहारला जाणारी ही विशेष रेल्वे गाडी आता सुरू केली आहे. सध्या ही गाडी उन्हाळी विशेष साप्ताहिक रेल्वे म्हणून धावणार असून, या गाडीला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून नंतर ही गाडी कायम होण्याची शक्यता आहे.प्रत्येक रविवारी सुटणारकोल्हापूर रेल्वे स्थानकावरून ६ एप्रिलपासून गाडी क्र. ०१४०५ ही एक्स्प्रेस प्रत्येक रविवारी सकाळी ९:३५ वाजता बिहारमधील कटिहारकडे रवाना होणार आहे. कोल्हापुरातून ही गाडी तिसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी कटिहारला पोहोचेल.

असा असेल परतीचा प्रवासकटिहार-सांगली-कोल्हापूर एक्स्प्रेस गाडी क्र. ०१४०६ ही गाडी ८ एप्रिलपासून २९ एप्रिलपर्यंत दर मंगळवारी परतीच्या प्रवास सुरू करेल. मंगळवारी सायंकाळी ६:१० वाजता कटिहार स्थानकावरून निघून ही गाडी गुरुवारी तिसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर पोहोचेल.असे असतील थांबेमिरज, सांगली, कऱ्हाड, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड केबिन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र (पटना), हाजीपूर, बरौनी, बेगुसराय, खगडिया आणि नौगचिया इथे थांबून मंगळवारी सकाळी ६:१० वाजता कटिहारला पोहोचेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBiharबिहारrailwayरेल्वेpassengerप्रवासी