शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बिहारसाठी कोल्हापुरातून दर रविवारी साप्ताहिक रेल्वे, उन्हाळी सुटीसाठी खास सोय; कधीपासून सुरु.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:50 IST

कोल्हापूर : उन्हाळी सुटीत उत्तर भारतात जाण्यासाठी बिहारीबाबूंच्या सोयीसाठी मध्ये रेल्वेने कोल्हापूर -कटीहार विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू केली आहे. ...

कोल्हापूर : उन्हाळी सुटीत उत्तर भारतात जाण्यासाठी बिहारीबाबूंच्या सोयीसाठी मध्ये रेल्वेनेकोल्हापूर-कटीहार विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू केली आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना बिहारमध्ये जाण्यायेण्यासाठी कोल्हापूर ते कटीहार क्रमांक ०१४०५/०१४०६ ही साप्ताहिक विशेष रेल्वे दि. ६ एप्रिलपासून दर रविवारी सुरू होत आहे. या विशेष रेल्वेचा फायदा प्रवाशांनी घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवरून ६ एप्रिलपासून २७ एप्रिलपर्यंत ही उन्हाळी सुटीच्या कालावधीपुरती एक्स्प्रेस धावणार आहे. बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना ही गाडी सोयीची ठरणार आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून ही विशेष साप्ताहिक रेल्वेसाठी सांगलीचाही थांबा आहे. यामुळे बिहारला जाणाऱ्या किंवा तिकडून येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. बिहारी नागरिक विविध कामासाठी मोठ्या संख्येने पश्चिम महाराष्ट्रात वास्तव्य करीत आहेत. त्यांच्यासाठी बिहारच्या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे गाडीची मागणी गेल्या पन्नास वर्षांपासून होत आहे. या मागणीला प्रतिसाद देत अखेर मध्य रेल्वेने कोल्हापुरातून बिहारला जाणारी ही विशेष रेल्वे गाडी आता सुरू केली आहे. सध्या ही गाडी उन्हाळी विशेष साप्ताहिक रेल्वे म्हणून धावणार असून, या गाडीला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून नंतर ही गाडी कायम होण्याची शक्यता आहे.प्रत्येक रविवारी सुटणारकोल्हापूर रेल्वे स्थानकावरून ६ एप्रिलपासून गाडी क्र. ०१४०५ ही एक्स्प्रेस प्रत्येक रविवारी सकाळी ९:३५ वाजता बिहारमधील कटिहारकडे रवाना होणार आहे. कोल्हापुरातून ही गाडी तिसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी कटिहारला पोहोचेल.

असा असेल परतीचा प्रवासकटिहार-सांगली-कोल्हापूर एक्स्प्रेस गाडी क्र. ०१४०६ ही गाडी ८ एप्रिलपासून २९ एप्रिलपर्यंत दर मंगळवारी परतीच्या प्रवास सुरू करेल. मंगळवारी सायंकाळी ६:१० वाजता कटिहार स्थानकावरून निघून ही गाडी गुरुवारी तिसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर पोहोचेल.असे असतील थांबेमिरज, सांगली, कऱ्हाड, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड केबिन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र (पटना), हाजीपूर, बरौनी, बेगुसराय, खगडिया आणि नौगचिया इथे थांबून मंगळवारी सकाळी ६:१० वाजता कटिहारला पोहोचेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBiharबिहारrailwayरेल्वेpassengerप्रवासी