शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुंबईच्या धर्तीवर कोल्हापूर चित्रनगरीचा विकास करू, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुखांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 12:06 IST

भविष्यात चित्रपट, मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा प्रयत्न करू

कोल्हापूर : मुंबई चित्रनगरीच्या धर्तीवर कोल्हापूर चित्रनगरीचा विकास करू, दुसऱ्या टप्प्याच्या विकासासाठी निधी मंजूर केला आहेच, पण चित्रीकरणासाठी अत्याधुनिक यंत्रणा निर्माण करून ती चोवीस तास सुरू राहील, अशा पद्धतीेने चित्रीकरणासाठी पुन्हा नावारुपाला आणू. भविष्यात चित्रपट, मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी दिली.

राजर्षी शाहू स्मृती शताब्दीनिमित्त केशवराव भोसले नाट्यगृहात होत असलेल्या महाराष्ट्र राज्य हीरक महोत्सवी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, जयंत आसगावकर, राजूबाबा आवळे, जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अभिनेते किशोर कदम उपस्थित होते.अमित देशमुख म्हणाले, कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मुंबईनंतर कोल्हापूर चित्रीकरणासाठी नावारुपाला येईल. येथे रात्रंदिवस चित्रीकरण सुरू राहायचे असेल तर कोल्हापूर - मुंबई, हैदराबाद, चेन्नई विमानसेवा सुरू व्हायला हवी. राज्यातील दुर्मीळ वाद्यांचे जतन होण्यासाठी त्यांचे संग्रहालय उभारण्याचा प्रयत्न आहे.

कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात चित्रीकरण सुरू असून येथील चित्रपट वारसा जपण्यासाठी मुंबईप्रमाणे चित्रनगरीचा विकास व्हावा, अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली. तसेच मंत्री देशमुख यांनी शाहू कृतज्ञता पर्वसाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

विजेत्या संघाचे देशभर प्रयोगयावेळी मंत्री देशमुख म्हणाले, राज्य नाट्य अंतिम स्पर्धेतील विजेत्या संघाचे देश, परदेशात प्रयोग व्हावेत, यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय काम करणार आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बनवलेल्या सांस्कृतिक धोरणाचे पुनरावलोकन करून कला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी योगदान देणार आहेत. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुरातत्व वास्तू असल्याने विभागाने या वारस्याचे संवर्धन करण्यासाठी निधी द्यावा, असेही ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAmit Deshmukhअमित देशमुख